Saturday, March 24, 2012

जागतिक महिला दिन

राहुन राहुन आज एक विचार मनात येतोय.. जागतिक महिला दिन.. वर्षभर ज्या स्त्रीला अबला,दुय्यम म्हणुन वागवायचं आज एक दिवस तिचं गुणगान.. आणि हा एक दिवस तरी कोणासाठी हो..फक्त् तुमच्या आमच्या सारख्या उच्च मध्यम वर्गातल्या महिलांचा.. कारण हातावर पोट असणार्या मजुर बायकांना असले थेरं परवडणारे नाहीत आणि गडगंज श्रीमंत बायकांना असल्या दिवसांचं सोयरसुतक नाही... आणि आपण तरी काय असं करतो खास? बाप,भाउ,नवरा, मित्र ह्यांच्या आजचा दिवस मिळणार्या कौतुकाच्या नजरा झेलायच्या.. जरा आजचा दिवस तुमचा म्हणत सेल च्या नावाखाली शोपिंग करायची... आणि..आणि अजुन काय? काहीच नाही.. तुम्ही म्हणाल एक मुलगी असुन असं का बोलतेय? आणि तु असं काय गं वेगळं करते? तर खरच सांगते मीपण तुमच्यातलीच एक.. पण आज सकाळी ताईच्या एक मेसेजने विचार करायला भाग पाडलं...खरच जरा विसावुयात आपण सगळ्याजणी ह्या वळणावर... वर्षभर नुसती धावपळ असतेच नं मागे मग आज थोडावेळ माझा. माझ्या हक्काचा..काय करायचं आजच्या दिवसात? अगदी जे मनात येईल ते.. एखादी राहुन गेलेली गोष्ट... अर्धवट राहिलेली आवड..गप्पा-टप्पा स्वतःच्याच स्वतःशी..करुयात आजपासुन एक नवी सुरुवात...जसं जमेल तसं पण नियमितपणे आपला आपल्यासाठीचा वेळ काढण्याची सुरुवात... तसा एक क्षणही पुरेसा असतो नं गं सखे आपल्याला आपला हक्काचा? जरा सारुयात आपला आपणच हा कोश..आणि डोकाउ जरा ह्या जगात.. कोण जाणे आपल्यातच लपल्या असतील कित्येक लता, कल्पना, आणि अश्या कित्येक... कोणाला दाखवुन देण्यासाठी नाही गं काही.. हे सगळं फक्त माझं माझ्यासाठी... मग कराल नं एवढं? द्याल नं दुसर्यांना झोकलेल्या आयुश्यातला फक्त एक क्षण स्वतःच्या विसाव्यासाठी? 

आभाळ

माझ्या गावातलं हे स्वच्छ मोकळं आभाळ..असंख्य तार्यांनी गच्च भरलेलं ..टिमटिमणारे..लुकलुकणारे... काही आपल्याच मस्तीत आपल्याच तेजाने चमकणारे.. अन् काही ह्या मस्तवाल तार्यांच्या खाली मिणमिणणारे... पण मला मात्र हे सगळे सारखेच वाटतात.. हे सगळे तारे नं बोलत असतात आपल्याशी..त्यांचं हे लुकलुकणं काहितरी सांगत असतं आपल्याला..काहीतरी खास..मनातलं..जरा कान देउन ऐकलं नं की कळतात त्यांच्या कथा..त्यांच्या व्यथा...ह्या एकाकी रात्री ज्यांना खायला उठतात त्यांनी बोलावं ह्या चांदण्यांशी..ह्या खुळ्या ऐकत्तात सगळ्यांची गार्हाणी ..आणि देतात साथ ह्या रात्रीला..बघा जमलं तर..एका रात्री तरी ह्या वेड्या चांदण्यांशी बोलुन बघा..खुप् खुप् मोकळं वाटतं..त्या खुल्या आभाळासारखं.. 

Friday, March 2, 2012

असचं काहीसं..

आयुष्याकडे बघण्याचा अन्गल जरा बदलला की आपणच आपल्यासाठी आखलेल्या जगण्याच्या चौकटीसुध्दा खरच बदलतात का? कदाचित फ़क्त हे कोन बदलतात.. चौकट काही सुटत नाही.. बंधनं झुगारण्याच्या नादात उलट कधीतरी  मुक्त होण्यापेक्षा घुसमटच वाढते.कोणी म्हणतं जगणं हे चौकट नसुन वर्तुळ आहे पण त्या वर्तुळालाही अर्थ तेव्हाच जेव्हा त्याचा केंद्रबिंदु स्थिर असतो.. इथे तर नेमकं तेच हरवलयं..परिघ तरी कसा  शोधायचं मग? कधीतरी वाटतं की ह्या सगळ्याचाही काही अंत असेलच.. एकदा भरारी घेतली की क्षितीजपर्यंतचं अवघं मोकळ आकाश माझच.. पण क्षितीज काय किंवा आकाश काय..दोन्ही आभासीच नं.. खोट्या गोष्टींचा खर्या जगण्याला दिलासा कसा मिळेल? आपल्याही नकळत लहानपणापासुन आपण बांधत असतो स्वतःचं मीपण एका चौकटीत... आणि मोठं होता होता विसरत जातो त्या चौकटीचे नियम.. मग अशा एखाद्या वळणावर ही चौकट टोचायला लागते.. मनाला दिसतं ते शुन्याचं रिंगणं.. पण म्हणुन चौकट मोडायचीच का?इतकं साधंसोपं असतं का गं सगळं? चौकट काय किंवा वर्तुळ काय... सीमारेषा आल्याच नं.. त्याच झुगारायचा प्रयत्न असतो..आणि शेवटी जर एक चौकट तोडताना दुसर्या चौकटीत अडकणार असु तर पहिली काय वाईट? आता फक्त त्या आभाळाचीही चौकट व्ह्ययला नको म्हणजे मिळवलं..किती प्रश्न  ह्या सार्या अनुत्तरीत प्रश्नांची कधीतरी सुंदर वीण होईल.. कदाचित कधीतरी आपलंच आपल्याला हसु येईल.. पण आत्ताचं काय? पण आत्ताचं काय?नुसतं लढत राहायचं? तसं लढण्याला ना नाहीच माझी.. पण श्वासाचीही उसंत नको का ? कारण इथे जो तो शर्यतीत जगण्याच्या... जरा थांबुन जगण्याचा आनंद घ्यायचाही हक्क नाहि का? मला तर वाटतय.. कदाचित ह्या शर्यती जिंकण्याच्या नादात ध्येयही आपल्याला कळणार नाही... कदाचित ते कधिच गाठलं असेलही..एकदा क्षणभर थांबुन मागे वळुन बघायला हवं..भुतकाळात डोकावलं की मला कधी कधी हेवा वाटतो.. त्या प्रत्येक बर्या-वाईट क्षणांचा... कारण त्या हरेक क्षणाची भली-बुरी का होईना पण एक आठवण असते.. आणि असं भुतकाळात रमताना अचानक जाणवतं.. अरेच्चा हा आजचा क्षणही उद्याचा भुतकाळच की.. ह्या नुकत्याच जन्मलेल्या क्षणाचीही एक ताजी आठवण आपल्याही नकळत आपण बनवतोच नं... त्या नुसत्या विचारानेही नवा जोम येतो.. आणि मनं उत्साहानं नव्या आठवणी जमवायला सुरु करतं.. उद्याच्या भुतकाळासाठी वर्तमानाच्या आठवणी बनवणंच तर उरतं नं आपल्या हाती?