Sunday, October 21, 2012

श्रावण

एका टोकाला गच्च दाटलेलं आभाळ.... कोसळण्याच्या बेतात... अन दुसर्या टोकाला निखळ लख्ख उन्हाचे भास...दरवेळी निरोपाच्या क्षणी कसा रे हा श्रावण तुझ्या चेहऱ्यावर बहारायचा..
रात्रभराच्या मुसळधार पावसानंतर उगवणारी पहाट किती प्रसन्न वाटते न... नुकत्याच आंघोळ केलेल्या बाळासारखी..स्वच्च..निरागस.... सृष्टीच गात्रनगात्र ताजतवान...ओलीचिंब हिरवीगार धरती सूर्याची पहिली कोवळी किरण झेलण्यासाठी आतुरलेली..दूरवर कुठल्यातरी मंदिरातून ऐकू येणारी काकडारती... नकळतच नाकाला जाणवलेला धुपाचा वास... अन त्या दिशेला आपसूकच जोडलेले हात..सगळच विलक्षण...पुढे मांडून ठेवलेला अवघा दिवस सुंदर जाणार ह्याची ग्वाही देणारी पहाट..
खूप शहाण्यासारखं वागतो न आपण..तेही अगदी रोजच्या रोज... कधीतरी अगदी चुकुनही थोड वेड्यागत, निर्धास्त, नाहीच न जमत वागायला...काल 'बर्फी' बघताना नेमक हेच डोक्यात घोळत होत.. हा काय म्हणेल तो काय म्हणेल इस चक्कर मे साला खुदके दिल कि सुनना तो रह हि गया.... काहीतरी निसटत असत नेहमीच हातून..तरी हक्काच बरचस नाहीच सांभाळता येत न.... खर सांगायचं तर बर्फी अन झिलमीलचा हेवा वाटत राहतो पूर्ण वेळ तो ह्याचसाठी....... ह्याच जगात राहताना, दुनियादारी पाळताना, स्वत:चच एक खास विश्व उभारता आल तर किती बर होईल न....

म्रुण्मयी

पुस्तकाचं नाव-म्रुण्मयी
लेखक- गो.नी.दांडेकर
नुकतच गो.नि.दांडेकरांच ' मृण्मयी' वाचल.... अतिशय सुंदर अनुभव... एखाद पुस्तक वाचल्यानंतर येणार भारावलेपण मला तस सवयीच...पण हि मृण्मयी खूप खोलवर परिणाम करून गेली... कथा फिरते ती 'मनु' भोवती....गरीब,सोशिक, सध्या सरळ मनाची मनु ... तरी स्वाभिमानी, मानिनी मनु...तस तर कुठल्याही कादंबरीची नायिका अशीच असते न..एकदम आदर्श स्त्री? मग मनुत अस काय वेगळ? मनुच वेगळेपण सिद्ध करते ती 'ध्यानेश्वरी'... मनु म्हणजे चालती बोलती ध्यानेश्वरी... ध्यानेश्वरीच पठन करन आणि ती समजन ह्यात बराच फरक...पण मनु लहान वयातच ध्यानेश्वरी जगली..कदाचित तिथेच तीच दैवत्व उमगत.. दैवी वाटतानाच मनु सर्वसामान्यहि वाटते ते तिची जन्मभूमीची ओढ बघून, जोडलेल्या प्रत्येक नात्याला जपण्याची तिची धडपड बघून...कदाचित म्हणूनच मनु मनात रेंगाळत राहते...

जन्मठेप

पुस्तकाचं नाव- जन्मठेप
लेखिकेचं नाव- गिरिजा किर
गिरिजा कीर... आजपर्यंत ह्यांच्या लेखनापासुन मी कशी काय अनभिध्न्य होते कोण जाणे... त्यांचं 'जन्मठेप' वाचलं अन मी सुन्न..तुमच्या आमच्या जीवाचा निव्व्ळ ज्या शब्दानेच थरकाप उडतो त्या ज्न्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांचं भावविश्व किती सहज मांडलयं लेखिकेनी... सगळेच कैदी हे अट्ट्ल गुन्हेगार नसतात नं, मान्य आहे की एखाद्या रागाच्या क्षणी त्यांच्याहातुन चुक घड्ते.. सुधारता न येणारी चुक.. पण म्हणुन त्यांचा जगण्याचा हक्कच नाहीसा होतो का? आणि चुक कोणाच्याही हातुन होउ शकते नं?? खरे जन्मठेपेचे असे कितीतरी कैदी देशाचा कारभार चालवत आहेत.. प्रत्यक्ष कीवा अप्रत्यक्ष.. जाउ दे तो वेगळा विशय झाला.. शिक्षा व्ह्यायलाच हवी हे मान्य ( संविधान तसच सांगतं नं) पण जन्मठेपेच्या 14-15 वर्षांनंतरही त्यांना जगण्याचा हक्क असु नये.. एका चुकलेल्या क्षणाची आयुश्य ही किंमत??? समा
जाने नाकारलेल्या,कुटुंबाने हाकललेल्या ह्या तरुणांनी करायचं तरी काय? पश्चाताप तर त्यांना कधीच झालेला असतो अन त्याची शिक्षा पण भोगलेली.. मग पुढे काय?कैदेतुन बाहेर पड्ल्यावर जर मरेपर्यंत ही अशी वाळित टाकण्याची शिक्षाच होणार असेल तर पुन्हा गुन्हा करुन हक्काची कारग्रुहातली शिक्षा का नं भोगावी?? असा विचार ह्या 'जन्मठेपेच्या' कैद्यांनी केला तर खरच काय चुकलं त्यांचं?? त्यांनाही मन असतं.. जाणीवा असतात हे कधी समजणार समाज??? काराग्रुहात गुन्हे घडायला लागल्यावर बहुदा उघड्तील डोळे... गिरिजा किर नावाच्या ह्या माणुसकीचा मात्र अभिमान वाटतो.. उतारवयातही ह्या तरुणांना समजुन घेण्याची त्यांची माई बनण्याची जी जिद्द त्यांनी दाखवली त्याला तोड नाही... बाकि पुस्तकाची भाषा,व्यक्तीरेखा(खर्या), प्रसंग.. सारं सारं गौण ह्यापुढे..

Tuesday, August 28, 2012

रितेपण

कशी ही अवस्था 
कुणाला कळावी
कुणाला पुसावी 
कुणी उत्तरावी..
(संदिप खरे)
मुसळधार पावसातलं हे असं अव्यक्त अस्वस्थ साचलेपण....बघ नं भर दुपारचा तो असा कोसळतोय अन् माझा मात्र प्रयत्न एकवटण्याचा... असलेलं..नसलेलं.. सारं सारं....वहावत जाण्याला जणू अचानक ब्रेक लागावा तसं झालयं....
वाटेवर ह्या भविश
्याच्या
हवाहवासा सोबती भुतकाळ
डोळ्यात स्वप्न जिंकण्याची
मनी रेंगाळतो गतकाळ
रोजचं एक रुटीन... सकाळपासुन संध्याकाळ.. अन् त्यानंतरची रात्र...पण ह्या दोहोंच्या मधली ही मावळण?... अनामिक हुरहुरीची ही सायंकाळची वेळ मात्र उतरत जाते..साचत जाते मनात......आणि आपण सोडतो एक निःश्वास ह्या वाढलेल्या साचलेपणासाठी..की रितेपणासाठी रे?
वरवरचे भारलेपण
खरा रिकामाच गं गाभारा
डोकव तिथे जरा खोल
ऐक रितेपणाचा हुंदका
उगाचच आपलं मनात एक खुळ.. भर गर्दीत आपण एकटं असण्याचं.... लहानपणापासुनचे सखे अचानक ह्या गर्दीत जणु हरवुन गेलेले... पण जगाची रित गं कशी विसरायची? वाहत राहा.. थांबला तो संपला.. अन् माझं तर हे असं.. साचलेपण.... वेड्यागत सरल्या क्षणांना पुन्हा जगण्याची धडपड.... वरवर सगळं सामान्या..रुटिन जगणं.. अन् आत मात्र धगधगता ज्वालामुखी...थंडावण्याची वाट बघत...

"पाउसवेळा"

छपराआडुन कोसळणारा पागोळ्यांचा पाउस....
बरसुन बरसुन थकलेला अन् मग डबक्यात पहुड्लेला पाउस...
मातकट लाल पाण्यातल्या कागदी होड्यांमधला पाउस...
गच्च काळ्या रातीचा फ़क्त कानांनी झेललेला पाउस...
उनाड भटकत्या वार्याच्या ओल्या स्पर्शातला पाउस...
.
.
.
ह्या आणि अश्या असंख्य "पाउसवेळा" अगदी घट्ट जपल्यात उराशी..
..
पाउस हरवला तर रे????