Sunday, October 21, 2012

जन्मठेप

पुस्तकाचं नाव- जन्मठेप
लेखिकेचं नाव- गिरिजा किर
गिरिजा कीर... आजपर्यंत ह्यांच्या लेखनापासुन मी कशी काय अनभिध्न्य होते कोण जाणे... त्यांचं 'जन्मठेप' वाचलं अन मी सुन्न..तुमच्या आमच्या जीवाचा निव्व्ळ ज्या शब्दानेच थरकाप उडतो त्या ज्न्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांचं भावविश्व किती सहज मांडलयं लेखिकेनी... सगळेच कैदी हे अट्ट्ल गुन्हेगार नसतात नं, मान्य आहे की एखाद्या रागाच्या क्षणी त्यांच्याहातुन चुक घड्ते.. सुधारता न येणारी चुक.. पण म्हणुन त्यांचा जगण्याचा हक्कच नाहीसा होतो का? आणि चुक कोणाच्याही हातुन होउ शकते नं?? खरे जन्मठेपेचे असे कितीतरी कैदी देशाचा कारभार चालवत आहेत.. प्रत्यक्ष कीवा अप्रत्यक्ष.. जाउ दे तो वेगळा विशय झाला.. शिक्षा व्ह्यायलाच हवी हे मान्य ( संविधान तसच सांगतं नं) पण जन्मठेपेच्या 14-15 वर्षांनंतरही त्यांना जगण्याचा हक्क असु नये.. एका चुकलेल्या क्षणाची आयुश्य ही किंमत??? समा
जाने नाकारलेल्या,कुटुंबाने हाकललेल्या ह्या तरुणांनी करायचं तरी काय? पश्चाताप तर त्यांना कधीच झालेला असतो अन त्याची शिक्षा पण भोगलेली.. मग पुढे काय?कैदेतुन बाहेर पड्ल्यावर जर मरेपर्यंत ही अशी वाळित टाकण्याची शिक्षाच होणार असेल तर पुन्हा गुन्हा करुन हक्काची कारग्रुहातली शिक्षा का नं भोगावी?? असा विचार ह्या 'जन्मठेपेच्या' कैद्यांनी केला तर खरच काय चुकलं त्यांचं?? त्यांनाही मन असतं.. जाणीवा असतात हे कधी समजणार समाज??? काराग्रुहात गुन्हे घडायला लागल्यावर बहुदा उघड्तील डोळे... गिरिजा किर नावाच्या ह्या माणुसकीचा मात्र अभिमान वाटतो.. उतारवयातही ह्या तरुणांना समजुन घेण्याची त्यांची माई बनण्याची जी जिद्द त्यांनी दाखवली त्याला तोड नाही... बाकि पुस्तकाची भाषा,व्यक्तीरेखा(खर्या), प्रसंग.. सारं सारं गौण ह्यापुढे..

No comments:

Post a Comment