Thursday, February 16, 2012

कधी कधी आपण स्वतःबद्दलच अनेक भ्रामक कल्पना करुन घेतो. मी सुंदर्, मी गुणी ते अगदी मी स्वर्थी, मी वाईटही.. अश्या टोकाच्या विचारांनी खरतर आपण आपल्यालाच गोंजारत असतो. आणि त्यला नेत असतो एका वेगळ्या जगात तेपण अगदी दुसर्या टोकाच्या जगात...खरतर काय् मिळतं ह्या सगळ्यातुन? मुळात मनाला असं फसवायचं का? कदाचित सतत समोर येणार्या प्रश्नांमधुन तेव्ढीच उसंत..पण ही खरच विश्रांती असते का? की असतो एक थांबा विरंगुळ्याचा पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यायला ताकद आजमावायचा थांबा... म्हणजे आतापर्यंतचे सगळे प्रश्न संपले असं नाही नं होत.. मग त्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय?मनाला असं भुलवुन प्रश्न थोडीच संपतात न त्यांची उकल होते... हे सगळं राहतच मनाच्या तळाशी नेहमी साचलेल्या चिवट शेवाळा सारखं.. आजही मागे वळुन पाहिलं तर दिसतो विविधरंगांनी नटलेला भुतकाळ.... काळा रंग अगदीच नावाला बाकी सगळ कसं रंगबेरंगी..स्वतःच्याच मस्तीत रमलेला भुतकाळ..आणि समोर बघितलं की दिसतो मिट्ट् काळोखाचा भविष्यकाळ..वर्तमानात इतकं झटुनही भविष्य इतकं अंधारं कसं..पुन्हा प्रश्नच... सगळा गुंता होत जातो..ह्या समाजाचा, ह्या माणसांच्या गर्दिचा, ह्या प्रश्नांचा अन त्यांच्या न् सापडलेल्या उत्तरांचाही.. मग ह्या अशा आड्वळणावर थकतच मन् ..तसे त्याला मिळतात अनेक संकेत..भविष्याचे..भुतकाळाशी जोडलेल्या वर्तमानाचे आणि मग सुरु होतो पुन्हा खेळ ह्या संकेताचा पाठलागचा अन त्यातच ह्या वेड्या मनाला गोंजारण्याचा....

No comments:

Post a Comment