Sunday, October 21, 2012

मध्यरात्री अवचित जाग आली कसल्याश्या घनगंभीर आवाजने.. खिडकिबाहेर डोकावले तर हा दिसला.. एका अनामिक ओढीने मातिकडे झेपावणारा...किती तीव्र होती ती भेटीची आस.... थोडावेळ नुसतचं अनुभवलं त्याचं कोसळणं..बरसणं.. तर पठ्ठा आला न लगेच गप्पा मारायला.. किती किती अन् काय काय बोलायचं होतं त्याला..थेंबा-थेबांची कथा..व्यथा.. त्या काळ्याकुट्ट ढगांआड आजवर दडवलेलं... लख्खकन चमकणार्या विजेची तगमग.. अन् गडगडणार्या त्या प
ोकळ ढगांचा त्रागाही.. बिनकामाचा शिक्का मारला होता नं त्यांच्या माथी... सारं सारं बोलायचं होतं त्याला... अविरत बरसत होत्या सरीवर सरी.. आणि उलगडत होता माझा पाउससखा.... किती रंगांनी, किती ढंगांनी व्यक्त होता वेडा रात्रभर.. त्याची एकेक अदा बघत, ऐकत कधी रात्र सरली समजलचं नाही.. पहटेसच हाही थकला बहुदा.. त्यालाही एका क्षणाची उसंत हवीच नं... अन् गेला बापडा आला तसाच... तो गेल्यावर मात्र उमगलं आता कसं सारं स्वच्छ, ताजं तवानं.. नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखं निरागस...कसल्याश्या त्रुप्ततेने ती धरणीही सुखावलेली.. अन् मी? मी मात्र त्याच्या बरसण्यातच हरवलेली.. अजुनही..

काळभोर आभाळ

दिवसभरात साचून साचून घुसमटलेल काळभोर आभाळ ऐन मावळतीला जेंव्हा धाय मोकलून बरसायला लागत तेंव्हा कोण जाणे का पण मनात एका अनामिक, अस्पष्ट भीतीची रेष उमटते...नकळतच कुठल्यातरी अशुभाची चाहूल मनात काळजीच काहूर उठवत... उतरत्या सांजेचा हा पाउस मग रात्रभर रडत बसतो...एकट्या रात्री एकटाच मोकळा होत....
रिमझिम बरसती इन बुंदोंने भी इक किस्सा सुनाया था कभी...बादलों के बिच हुए गडगडाते झगडे का किस्सा.... इसी दौरान चंचल बिजली का चुपकेसे धरती मां के पैर छुनेका किस्सा....सात रंग मे नहाये सतरंगी का किस्सा.. और..और.. और हां कुछ दिवानो के किस्से भी तो थे उसमे.... एक किस्सा सुनाते सुनाते न जाने कितना कुछ बता गयी वो बारीश....और बहोत कुछ अनकहा भी शायद.. सहमे हुए दिलमे टपटपाते हजारो ख्वाईंशोंकी आवाज शायद इसी रिमझिम ने तो सुनी थी...शायद आज ये किस्सा भीसुनायेगी और कही..

श्रावण

एका टोकाला गच्च दाटलेलं आभाळ.... कोसळण्याच्या बेतात... अन दुसर्या टोकाला निखळ लख्ख उन्हाचे भास...दरवेळी निरोपाच्या क्षणी कसा रे हा श्रावण तुझ्या चेहऱ्यावर बहारायचा..
रात्रभराच्या मुसळधार पावसानंतर उगवणारी पहाट किती प्रसन्न वाटते न... नुकत्याच आंघोळ केलेल्या बाळासारखी..स्वच्च..निरागस.... सृष्टीच गात्रनगात्र ताजतवान...ओलीचिंब हिरवीगार धरती सूर्याची पहिली कोवळी किरण झेलण्यासाठी आतुरलेली..दूरवर कुठल्यातरी मंदिरातून ऐकू येणारी काकडारती... नकळतच नाकाला जाणवलेला धुपाचा वास... अन त्या दिशेला आपसूकच जोडलेले हात..सगळच विलक्षण...पुढे मांडून ठेवलेला अवघा दिवस सुंदर जाणार ह्याची ग्वाही देणारी पहाट..
खूप शहाण्यासारखं वागतो न आपण..तेही अगदी रोजच्या रोज... कधीतरी अगदी चुकुनही थोड वेड्यागत, निर्धास्त, नाहीच न जमत वागायला...काल 'बर्फी' बघताना नेमक हेच डोक्यात घोळत होत.. हा काय म्हणेल तो काय म्हणेल इस चक्कर मे साला खुदके दिल कि सुनना तो रह हि गया.... काहीतरी निसटत असत नेहमीच हातून..तरी हक्काच बरचस नाहीच सांभाळता येत न.... खर सांगायचं तर बर्फी अन झिलमीलचा हेवा वाटत राहतो पूर्ण वेळ तो ह्याचसाठी....... ह्याच जगात राहताना, दुनियादारी पाळताना, स्वत:चच एक खास विश्व उभारता आल तर किती बर होईल न....

म्रुण्मयी

पुस्तकाचं नाव-म्रुण्मयी
लेखक- गो.नी.दांडेकर
नुकतच गो.नि.दांडेकरांच ' मृण्मयी' वाचल.... अतिशय सुंदर अनुभव... एखाद पुस्तक वाचल्यानंतर येणार भारावलेपण मला तस सवयीच...पण हि मृण्मयी खूप खोलवर परिणाम करून गेली... कथा फिरते ती 'मनु' भोवती....गरीब,सोशिक, सध्या सरळ मनाची मनु ... तरी स्वाभिमानी, मानिनी मनु...तस तर कुठल्याही कादंबरीची नायिका अशीच असते न..एकदम आदर्श स्त्री? मग मनुत अस काय वेगळ? मनुच वेगळेपण सिद्ध करते ती 'ध्यानेश्वरी'... मनु म्हणजे चालती बोलती ध्यानेश्वरी... ध्यानेश्वरीच पठन करन आणि ती समजन ह्यात बराच फरक...पण मनु लहान वयातच ध्यानेश्वरी जगली..कदाचित तिथेच तीच दैवत्व उमगत.. दैवी वाटतानाच मनु सर्वसामान्यहि वाटते ते तिची जन्मभूमीची ओढ बघून, जोडलेल्या प्रत्येक नात्याला जपण्याची तिची धडपड बघून...कदाचित म्हणूनच मनु मनात रेंगाळत राहते...

जन्मठेप

पुस्तकाचं नाव- जन्मठेप
लेखिकेचं नाव- गिरिजा किर
गिरिजा कीर... आजपर्यंत ह्यांच्या लेखनापासुन मी कशी काय अनभिध्न्य होते कोण जाणे... त्यांचं 'जन्मठेप' वाचलं अन मी सुन्न..तुमच्या आमच्या जीवाचा निव्व्ळ ज्या शब्दानेच थरकाप उडतो त्या ज्न्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांचं भावविश्व किती सहज मांडलयं लेखिकेनी... सगळेच कैदी हे अट्ट्ल गुन्हेगार नसतात नं, मान्य आहे की एखाद्या रागाच्या क्षणी त्यांच्याहातुन चुक घड्ते.. सुधारता न येणारी चुक.. पण म्हणुन त्यांचा जगण्याचा हक्कच नाहीसा होतो का? आणि चुक कोणाच्याही हातुन होउ शकते नं?? खरे जन्मठेपेचे असे कितीतरी कैदी देशाचा कारभार चालवत आहेत.. प्रत्यक्ष कीवा अप्रत्यक्ष.. जाउ दे तो वेगळा विशय झाला.. शिक्षा व्ह्यायलाच हवी हे मान्य ( संविधान तसच सांगतं नं) पण जन्मठेपेच्या 14-15 वर्षांनंतरही त्यांना जगण्याचा हक्क असु नये.. एका चुकलेल्या क्षणाची आयुश्य ही किंमत??? समा
जाने नाकारलेल्या,कुटुंबाने हाकललेल्या ह्या तरुणांनी करायचं तरी काय? पश्चाताप तर त्यांना कधीच झालेला असतो अन त्याची शिक्षा पण भोगलेली.. मग पुढे काय?कैदेतुन बाहेर पड्ल्यावर जर मरेपर्यंत ही अशी वाळित टाकण्याची शिक्षाच होणार असेल तर पुन्हा गुन्हा करुन हक्काची कारग्रुहातली शिक्षा का नं भोगावी?? असा विचार ह्या 'जन्मठेपेच्या' कैद्यांनी केला तर खरच काय चुकलं त्यांचं?? त्यांनाही मन असतं.. जाणीवा असतात हे कधी समजणार समाज??? काराग्रुहात गुन्हे घडायला लागल्यावर बहुदा उघड्तील डोळे... गिरिजा किर नावाच्या ह्या माणुसकीचा मात्र अभिमान वाटतो.. उतारवयातही ह्या तरुणांना समजुन घेण्याची त्यांची माई बनण्याची जी जिद्द त्यांनी दाखवली त्याला तोड नाही... बाकि पुस्तकाची भाषा,व्यक्तीरेखा(खर्या), प्रसंग.. सारं सारं गौण ह्यापुढे..