Friday, March 22, 2013

भिंगरी

"काय की नुसत्या भटकत असता. आज ह्या शहरात उद्या त्या शहरात.. पायाला भिंगरी लावलीय जशी." इति आज्जी 
"अगं आजी कामं असतात गं, मिटींग साठी जावंच लागतं" मी 
" हो हो माहितेय मोठी कामाची ते.. आमच्यावेळी नव्ह्तं असं" आजी थोडी वैतागून अन थोडी काळजीत निघून गेली.. मला मात्र प्रश्न, कस काय आजीच्या काळात लोकं वर्षानुवर्ष एकाच गावी राहायचे? बाहेरच्या जगात काय चाललय ह्याचं काहीच सोयारसुतुक नसावं त्यांना? दळणवळणाची साधनं कमी होती, प्रसारमाध्यम कमी.. मान्य.. पण उत्सुकता पण कमी? नाही नं? आज आपण अगदी कमी वेळात जगाच्या ह्या टोकावरून त्या टोकावर जातो तरी असे अनेक भाग आहेत जिथपर्यंत माणसाचे पाय पोहचले नाहीत.. त्या भागातल्या लोकांचंही आयष्य असंच असेल मर्यादित? आपल्या पल्याडही एक जिवंत जग आहे ह्याची त्यांना जाणीव असेल? की ते ही आजी-आजोबांच्या काळात वावरत असतील अजूनही? हुश्श.. विचार विचार फक्त विचार..आजीला मात्र आता समजावून सांगावं लागेल ह्या भिंगरी लागल्या पायाची गरज..

No comments:

Post a Comment