संवादाची किती हाव असते रे मनाला...कधी माणसांशी, कधी निर्जीव वस्तूंशी ,तर कधी चक्क स्वत:च्या मनाशी... जरा कुठे संधी मिळाली कि भरकटण आलच...पण तरी गर्दीत जीव गुदमरतो..मग मला सांग ह्या संवादाची नेमकी व्याख्या तरी काय? जे सभोवताली आहेत त्यांच्याशी एका लिमिट नंतर बोलताच येत नाही रे...अस का व्हाव?आणि हे अस बोलन खुंटलं कि घुसमट वाढते..सतत मनावर काही न काही उमटत असत... भल बुर काहीपण..अन हे काहीपण कोणाला तरी सांगून तपासून बघायची असते मनाची लवचिकता ...पण हे तपासून बघन हि योग्य ठिकाणी असायला हव न? गर्दी खुपते ती इथे.. अन साचत जात सगळ तळाशी.. जीव अडकतो तो इथे....माणसाने प्रक्टिकल असाव म्हणजे असे प्रश्न बोचत नाही म्हणे ... हम्म.. संवेदना माराव्याच लागतील आता बहुदा...
No comments:
Post a Comment