तनहां सी एक शाम कल रात के मेले में आई थी... सहमीसी घाबरायीसी... जरासी डरी भी थी वो ... पर भला मेले में कोई खुदको कैसे रोक पाये... हा अब अरामानो कि बहोत भीड थी वहा... लेकिन वो देखो वो दूर उस सबसे उंचे झुले के सबसे आखरी मुक़ामसे कुछ परेशानियाँ भी तो झाँक रही थी.. पागल थी बेचारी ... आज नही तो कल उन्हे मिट्टी में तो मिलना ही हैं पता नही उन्हे शायद ...ठीक भी ही... उसके ठीक बगलमें में यादोकी मिठी दुकान जो थीं ... हर एक याद बडी दिलचस्पी से सजाके ..चाशनी में घोले.. इस कडवे मुंहकी मुस्कान बनती ये यादोंकी दुकान ....हाँ हाँ अब जरा संभलके...जरा आगे बधोगे तो सपने मिलेंगे... कहीं कुचल न देना उन्हें कांच के ये रंगीन ख्वाब...नहीं नहीं इन्हे यहाँ तो बेचा नही जाता... हाँ पूजा ज़रूर जाता हैं .. हर सपना यहाँ बेशक़ीमती माना जाता हैं .... इस मेले कि जान ही तो हैं ये सपने... हर और बिखरें ऐसे अनगिनत लम्हे बटोरें जब वो शाम गुजरी यहाँसे तो वो भी भूल गयी अपनी तन्हाई और सुबह कि पहली किरण का हाथ थामे पगली निकाल पड़ी ... नये ख्वाब चुनने .. बस तबसे रातका ये मेला मुस्कराने लगा हैं
......................................................................................
पावसासारखा पाऊस तरी रोज नवा नवा...स्थळाकाळाचे संदर्भ बदलले की पाउसही बदलतो हो नं...ठराविक लयीतली त्याची तीच ती रिपरिप तरी दरवेळी एक नवा सुर गवसतोच अन् निदान त्या क्षणाचा पाऊस तरी वेगळा होऊन जातो नाही का?असा पाउस सखा होणं जमेल का रे तुला ?...
.......................................................................................
जीव विसावण्याचं एक एक ठिकाण काळाच्या ओघात जसंजसं दृष्टीआड होत जातं तसंतसं नकळत insecurity वाढत जाते का रे आपल्या जिवंत असण्याची....
......................................................................................
तु मघा खिडकी म्हणालास नं तर मला माझी गच्ची आठवली..प्रत्येकाची असते नं आपआपल्या घरातली एक खास जागा..तशी ही माझी गच्ची..माझं घर म्हणजे बंगला catagory आहे त्यामुळे छान मोठ्ठ्या गच्चीचं सुख अगदी चालत आलंय.. पण लहान असताना धडपडायच्या भितीने मोठ्यांनी तिकडे जाउ दिलं नाही इतकंच..मोठं होता होता मात्र गच्ची आपली वाटायला लागली..Just college मध्ये जायला लागले तेव्हा ही खर्या अर्थाने भेटली...10 वी 12वी असल्यामुळे अभ्यास अती..अन् त्यामुळे बाहेर फिरायला जाणं व्हायचं नाही मग पावलं आपोआप गच्चीवर वळायची.. नव्याने उमजलेलं तारुण्य,नवीन college..freedom,मैत्रिणी, मित्र(?) gossip.. secrets..First crush , braek up..काय न काय इथे ह्या गच्चीशी share केलंय..कारण काय नं तर तिथे प्रत्युत्तर नसायचं ..प्रतिप्रश्नही नसायचे..खरंतर insecurityचा काळ होता तो..सुरवंटाचं फूलपाखरु होण्याचा..तो ह्या गच्चीने जपला...माझी स्वप्नं जपली..मला जपलं..त्या वयात जे कोणालाच सांगता येत नाही ते सारं ह्या गच्चीने ऐकलं..
आजही इथे घरी आली की मी काही नं काही निमित्ताने जाते गच्चीवर..तिच्या कठड्यावर हात फिरवला नं की काहीतरी जाणवतं खास... तसं तिला सांगण्यासारखं अजूनही आहेच बरंच काही..
............................................................................
रात्रीच्या मिट्ट अंधारात.. दूर दूर... गावा गावांचे सारे संदर्भ जिथे संपतात, तिथे चोरुन भेटतं म्हणे ते आभाळ ह्या जमिनीला.. कशासाठी??चांदण्यांच्या लिलावासाठी..चंद्राच्या उधारीसाठी...अन् असं बर्याच कशाकशासाठी..स्वप्न वैगरेच्याही पल्याडचं जे असतं नं बहुतेक त्यासाठी...असण्या नसण्याच्या सीमेवरचं.. शेवटी काय तर अंधाराच्या ह्या व्यवहारासाठी अवसेची एक रात्र पुन्हा एकदा गहाण.. ठरल्याप्रमाणे..,
.......................................................................................
रडणार्याला खांदा देण्याची किती घाई असते नं लोकांना... आपण स्वत: भलेही किती का हळव्या नाजूक मनाचे असो, कोणी आधार शोधायला आलं कि लगेच आपला खांदा पुढे... सवय होत जाते रे मग असं वरवरचं strong असण्याची... सगळं आहे तसं सहन करण्याची नशा चढत जाते... आपल्याही नकळत मग हे लोकांनी आपल्याकडे आधार म्हणून बघणं, आपल्याशी सगळे problem share करणं हवहवंसं वाटायला लागतं.... पण एक दिवस.. फक्त एक दिवस असाही येतोच नं, जेव्हा आपल्यालाही हवं असतं कोणीतरी...काहीतरी भयंकर उलथापालथ झाली असते तळाशी... अन सावरायला कोणीतरी हवं असतं... तेव्हा रे काय करायचं? आधारवडाचा आधार कोणी होतं का रे?
......................................................................................
पावसासारखा पाऊस तरी रोज नवा नवा...स्थळाकाळाचे संदर्भ बदलले की पाउसही बदलतो हो नं...ठराविक लयीतली त्याची तीच ती रिपरिप तरी दरवेळी एक नवा सुर गवसतोच अन् निदान त्या क्षणाचा पाऊस तरी वेगळा होऊन जातो नाही का?असा पाउस सखा होणं जमेल का रे तुला ?...
.......................................................................................
जीव विसावण्याचं एक एक ठिकाण काळाच्या ओघात जसंजसं दृष्टीआड होत जातं तसंतसं नकळत insecurity वाढत जाते का रे आपल्या जिवंत असण्याची....
......................................................................................
तु मघा खिडकी म्हणालास नं तर मला माझी गच्ची आठवली..प्रत्येकाची असते नं आपआपल्या घरातली एक खास जागा..तशी ही माझी गच्ची..माझं घर म्हणजे बंगला catagory आहे त्यामुळे छान मोठ्ठ्या गच्चीचं सुख अगदी चालत आलंय.. पण लहान असताना धडपडायच्या भितीने मोठ्यांनी तिकडे जाउ दिलं नाही इतकंच..मोठं होता होता मात्र गच्ची आपली वाटायला लागली..Just college मध्ये जायला लागले तेव्हा ही खर्या अर्थाने भेटली...10 वी 12वी असल्यामुळे अभ्यास अती..अन् त्यामुळे बाहेर फिरायला जाणं व्हायचं नाही मग पावलं आपोआप गच्चीवर वळायची.. नव्याने उमजलेलं तारुण्य,नवीन college..freedom,मैत्रिणी, मित्र(?) gossip.. secrets..First crush , braek up..काय न काय इथे ह्या गच्चीशी share केलंय..कारण काय नं तर तिथे प्रत्युत्तर नसायचं ..प्रतिप्रश्नही नसायचे..खरंतर insecurityचा काळ होता तो..सुरवंटाचं फूलपाखरु होण्याचा..तो ह्या गच्चीने जपला...माझी स्वप्नं जपली..मला जपलं..त्या वयात जे कोणालाच सांगता येत नाही ते सारं ह्या गच्चीने ऐकलं..
आजही इथे घरी आली की मी काही नं काही निमित्ताने जाते गच्चीवर..तिच्या कठड्यावर हात फिरवला नं की काहीतरी जाणवतं खास... तसं तिला सांगण्यासारखं अजूनही आहेच बरंच काही..
............................................................................
रात्रीच्या मिट्ट अंधारात.. दूर दूर... गावा गावांचे सारे संदर्भ जिथे संपतात, तिथे चोरुन भेटतं म्हणे ते आभाळ ह्या जमिनीला.. कशासाठी??चांदण्यांच्या लिलावासाठी..चंद्राच्या उधारीसाठी...अन् असं बर्याच कशाकशासाठी..स्वप्न वैगरेच्याही पल्याडचं जे असतं नं बहुतेक त्यासाठी...असण्या नसण्याच्या सीमेवरचं.. शेवटी काय तर अंधाराच्या ह्या व्यवहारासाठी अवसेची एक रात्र पुन्हा एकदा गहाण.. ठरल्याप्रमाणे..,
.......................................................................................
रडणार्याला खांदा देण्याची किती घाई असते नं लोकांना... आपण स्वत: भलेही किती का हळव्या नाजूक मनाचे असो, कोणी आधार शोधायला आलं कि लगेच आपला खांदा पुढे... सवय होत जाते रे मग असं वरवरचं strong असण्याची... सगळं आहे तसं सहन करण्याची नशा चढत जाते... आपल्याही नकळत मग हे लोकांनी आपल्याकडे आधार म्हणून बघणं, आपल्याशी सगळे problem share करणं हवहवंसं वाटायला लागतं.... पण एक दिवस.. फक्त एक दिवस असाही येतोच नं, जेव्हा आपल्यालाही हवं असतं कोणीतरी...काहीतरी भयंकर उलथापालथ झाली असते तळाशी... अन सावरायला कोणीतरी हवं असतं... तेव्हा रे काय करायचं? आधारवडाचा आधार कोणी होतं का रे?
No comments:
Post a Comment