काही गाणी कधीही ऐकली कि काळजात प्रचंड उलथापालथ घडवतात.. काही ठराविक संदर्भ असावेच असा काही अट्टाहास नसतो त्यांचा तरी दरवेळी एक नवा अर्थ लागतो अन आभाळ दाटून येतं..
चिठ्ठी ना कोइ संदेस ..
हे असच एक गाणं... काहीही न सांगता अचानक कोणी पुढे निघून जाणं अन माघारी उरलेल्याला एक ठसठसता सल देऊन जाणं.. अशक्य घुसमटायला करतं...त्याची जातानाची ती एकमेव आर्त हाक आपल्याला ऐकू कशी आली नाही.. हा जो गिल्ट असतो नं तो कसा बारा सांभाळता येत असेल आयुष्यभर...
एक आह भरी होगी, हम ने ना सूनी होगी
जाते जाते तुम ने आवाज तो दी होगी
हर वक्त यही हैं गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए
......................................................................................
स्वप्नं पाहणं कितीही सुंदर आणि हवसं वाटलं तरी बंद पापणी आडची रात्र कायमस्वरूपी नकोच नं.... गोठलेल्या स्वप्नांना वास्तवाचं भान देणारी सकाळ अशी जागं करते आताशा
..........................................................................................
पहाटेच्या ह्या नितळ प्रहरी अवचित जाग येते... आजूबाजूला निरव शांतता अन त्यातच मिसळलेले आरतीचे अस्पष्ट सूर ...हवेत एक ओलसर गंध पारिजात ल्यालेला अन त्याच्या एका झुळूकेसरशी देह नखशीकांत मोहोरलेला.. अन् त्या क्षणाची ती हवीशी लाज लेऊन अलगद कुशीवर वळणार तितक्यात जाणवलेलं तुझं अस्तित्व.. मला बिलगलेलं... त्या घटकेची निरागस शांतता तुझ्या चेहऱ्यावर दाटलेली... विस्कटलेल्या केसांच्या आडून कपाळावर एक समाधानी रेघ ओढलेली.. बंद पापणीमागे असंख्य स्वप्नांची चलबिचल अन कोण जाणे कशाने पण ओठांवर उमललेलं अस्फुट हसू... ह्या क्षणाचा तू वेगळाच असतो रे.. लख्ख आरशासारखा तरी दरवेळी नव्याने उलगडणारा...
पहाटेच्या ह्या भारावल्या क्षणाची एकदा द्रुष्ट काढावी का रे?
...............................................................................................
नुकत्याच न्हालेल्या नितळ शुभ्र डोळ्यांच्या पाणीदार किनारी काजळाची दाट रेघ ओढताना आताशा जाणवते एक अनामिक थरथर... पापणीच्या पल्याडच्या स्वप्नांच्या गावाला कोणी काजळाची वेस घालावी तसा हुरहुरतो जीव... अन नेमकं त्याच वेळी आराश्या मधल्या माझ्याच प्रतिबिंबात मला तुझा भास होतो.... इतका जवळून असतो तो आभास कि.. एका क्षणी लक्कन चुकतो ठोका.. खोल काळजाचा.. तुला कळणारा... हो नं..
कित्येक दिवसांनी काल पुन्हा काजळ रेखाताना पाणावले रे मी
...............................................................................................
पौर्णिमेच्या रात्री गावाबाहेरच्या त्या रस्त्यालगतच्या माळरानी गेला आहेस का रे कधी? एकात एक गुंतत गेलेली ती सपाट जमीन चांदण्यात न्हाहून निघताना निरखून कधी पाहिलंयस ? हवेत पसरलेला हलका गारवा.. हवाहवासा.. लपेटून घेणारा अन आजूबाजूला पसरलेली ती नीरव शांतता इतकी कि तिला तडा द्यायला झाडाच्या पानांची साधी सळसळ सुद्धा नाही..अवघं वातावरण असं भारलेलं...दैवत्व लाभलेलं... ह्या अश्या माळरानी गवताळ जमिनीच्या कुशीत शिरून हे चांदण्याचं आभाळ मला एकदा तुझ्या डोळ्यात निरखायचं आहे रे..इथे भेट तू ..असाच इतकाच..नेमका
चिठ्ठी ना कोइ संदेस ..
हे असच एक गाणं... काहीही न सांगता अचानक कोणी पुढे निघून जाणं अन माघारी उरलेल्याला एक ठसठसता सल देऊन जाणं.. अशक्य घुसमटायला करतं...त्याची जातानाची ती एकमेव आर्त हाक आपल्याला ऐकू कशी आली नाही.. हा जो गिल्ट असतो नं तो कसा बारा सांभाळता येत असेल आयुष्यभर...
एक आह भरी होगी, हम ने ना सूनी होगी
जाते जाते तुम ने आवाज तो दी होगी
हर वक्त यही हैं गम उस वक्त कहा थे हम कहा तुम चले गए
......................................................................................
स्वप्नं पाहणं कितीही सुंदर आणि हवसं वाटलं तरी बंद पापणी आडची रात्र कायमस्वरूपी नकोच नं.... गोठलेल्या स्वप्नांना वास्तवाचं भान देणारी सकाळ अशी जागं करते आताशा
..........................................................................................
पहाटेच्या ह्या नितळ प्रहरी अवचित जाग येते... आजूबाजूला निरव शांतता अन त्यातच मिसळलेले आरतीचे अस्पष्ट सूर ...हवेत एक ओलसर गंध पारिजात ल्यालेला अन त्याच्या एका झुळूकेसरशी देह नखशीकांत मोहोरलेला.. अन् त्या क्षणाची ती हवीशी लाज लेऊन अलगद कुशीवर वळणार तितक्यात जाणवलेलं तुझं अस्तित्व.. मला बिलगलेलं... त्या घटकेची निरागस शांतता तुझ्या चेहऱ्यावर दाटलेली... विस्कटलेल्या केसांच्या आडून कपाळावर एक समाधानी रेघ ओढलेली.. बंद पापणीमागे असंख्य स्वप्नांची चलबिचल अन कोण जाणे कशाने पण ओठांवर उमललेलं अस्फुट हसू... ह्या क्षणाचा तू वेगळाच असतो रे.. लख्ख आरशासारखा तरी दरवेळी नव्याने उलगडणारा...
पहाटेच्या ह्या भारावल्या क्षणाची एकदा द्रुष्ट काढावी का रे?
...............................................................................................
नुकत्याच न्हालेल्या नितळ शुभ्र डोळ्यांच्या पाणीदार किनारी काजळाची दाट रेघ ओढताना आताशा जाणवते एक अनामिक थरथर... पापणीच्या पल्याडच्या स्वप्नांच्या गावाला कोणी काजळाची वेस घालावी तसा हुरहुरतो जीव... अन नेमकं त्याच वेळी आराश्या मधल्या माझ्याच प्रतिबिंबात मला तुझा भास होतो.... इतका जवळून असतो तो आभास कि.. एका क्षणी लक्कन चुकतो ठोका.. खोल काळजाचा.. तुला कळणारा... हो नं..
कित्येक दिवसांनी काल पुन्हा काजळ रेखाताना पाणावले रे मी
...............................................................................................
पौर्णिमेच्या रात्री गावाबाहेरच्या त्या रस्त्यालगतच्या माळरानी गेला आहेस का रे कधी? एकात एक गुंतत गेलेली ती सपाट जमीन चांदण्यात न्हाहून निघताना निरखून कधी पाहिलंयस ? हवेत पसरलेला हलका गारवा.. हवाहवासा.. लपेटून घेणारा अन आजूबाजूला पसरलेली ती नीरव शांतता इतकी कि तिला तडा द्यायला झाडाच्या पानांची साधी सळसळ सुद्धा नाही..अवघं वातावरण असं भारलेलं...दैवत्व लाभलेलं... ह्या अश्या माळरानी गवताळ जमिनीच्या कुशीत शिरून हे चांदण्याचं आभाळ मला एकदा तुझ्या डोळ्यात निरखायचं आहे रे..इथे भेट तू ..असाच इतकाच..नेमका
No comments:
Post a Comment