इथे घरी आले नं की एक मज्जा असते.. म्हणजे पुण्याला,नागपूरला कुठेही असले नं की मी 'रुचिरा कुळकर्णी'असते.. ओळख वैगरे असते का ती माहीत नाही पण इथे यवतमाळला आली नं की मी अचानक फक्त आणि फक्त बाबांची मुलगी असते.. किमान अर्ध शहर तरी त्यांना ओळखतं आणि मला त्यांची मुलगी म्हणूनही..कुठल्याही कामासाठी, खरेदीसाठी बाहेर पडलं की ही जी ओळख देतात नं लोक.. world's best feeling असतं ते.. हीच ओळख जपायची असते नं.. आयुष्यभर लहानच असल्याची जाणीव करुन देणारी ओळख...
.................................................................
रोज नवीन अनुभव..रोज नवीन भेटीगाठी.. रोजचा दिवस तसाही नवीन असतोच नं.. तरी एखादा दिवस असाही असतो स्वतःला तपासून बघण्याचा.. एखाद्या प्रसंगाला, व्यक्तीला , अडचणीला किंवा आनंदी सोहळ्याला आपण कसं सामोरं जातो हे आपल्याही नकळत आपण तपासत असतो.. काही तर्क आपले आपणच बांधलेले आपल्याच वागण्याचे.. कधी चुकतात अडखळतात.. पण जेव्हा अगदी बरोबर येतात नं तेव्हा जग जिंकल्यासारखं वाटतं.. स्वतःवर पुन्हा स्वतःचा ताबा मिळवल्यासारखं..किंवा एखाद्या परीक्षेत पहीलं आल्यासारखं... :) :)... Some surprises are too good and life is full of them
................................................................
कुणासाठी तरी हक्काचं एक आभाळ होता यावं ह्यासारखं भाग्य नाही... निळंभोर आभाळ.. कुठेही असलीस तरी मी असेलच.. ताठ मानेने वर बघ मी आहेच हा दिलासा देणारं... जरा उदास असता पिंजारल्या ढगांचे चित्रविचित्र आकार बनवून खळखळून हसवणारं...हो कधीतरी भरुनही येणारं आणि पावसाची सोबत देत त्यात मोकळं करणारं काळंभोर आभाळ.. प्रत्येक छटा निराळी प्रत्येक अदा निराळी असणारं.. कवेत घेता न येणारं तरी मनात साठवलेलं आभाळ... हक्काचं
.................................................................
विझणं असं अचानक नसतं कधीच.. Process असते ती एक.. कधी स्वतःलाच उमगलेली तर कधी लादली गेलेली... अविरत धगधगणारं अग्निहोत्र होणं नसतंच सगळ्यांच्या नशीबी पण विझणं मात्र टळत नाही.. एक ठिणगी तशी असतेच कायम.. पेटलेली..पण प्रत्येकीचाच वणवा नाही नं होत.. प्रत्येकीचं वेगळेपण अधोरेखित करतोच हा वणवा.. हो पण हे विझणं मात्र समान पातळीवर आणतं सगळ्यांनाच.. म्हटलं नं process असते ती.. दुर्लक्ष ही सुरुवात असणारी
...................................................................
जीव लावणं... किती विचित्र असतो नं हा प्रकार.. ओळख, सवय, नातं.. एकेक टप्पा पार करत करत अलगद जीव जडण्याचा हा टप्पा कधी पार होतो कळतही नाही नं.. हे खरं pure..व्हर्जिन.. भौतिकतेच्या नियमांच्या पार गेलेलं.. स्वत्वाचीही अपेक्षा नसलेलं.. जीव लावणं..जीव गुंतणं..
.............................................................
ह्या मातकट पायवाटा नं भरकटणार्याच असतात.. चकव्यासारख्या.. मागे वळून जुन्या खुणा चाचपडाव्या तर रस्ता रेंगाळतो अन् नव्या स्वप्नांच्या गंधाचा माग ठेवावा तर हमखास चुकामुक... गंधाळल्या वाटांचे मोह तसेही बरे नाही रे.
............................................................
.................................................................
रोज नवीन अनुभव..रोज नवीन भेटीगाठी.. रोजचा दिवस तसाही नवीन असतोच नं.. तरी एखादा दिवस असाही असतो स्वतःला तपासून बघण्याचा.. एखाद्या प्रसंगाला, व्यक्तीला , अडचणीला किंवा आनंदी सोहळ्याला आपण कसं सामोरं जातो हे आपल्याही नकळत आपण तपासत असतो.. काही तर्क आपले आपणच बांधलेले आपल्याच वागण्याचे.. कधी चुकतात अडखळतात.. पण जेव्हा अगदी बरोबर येतात नं तेव्हा जग जिंकल्यासारखं वाटतं.. स्वतःवर पुन्हा स्वतःचा ताबा मिळवल्यासारखं..किंवा एखाद्या परीक्षेत पहीलं आल्यासारखं... :) :)... Some surprises are too good and life is full of them
................................................................
कुणासाठी तरी हक्काचं एक आभाळ होता यावं ह्यासारखं भाग्य नाही... निळंभोर आभाळ.. कुठेही असलीस तरी मी असेलच.. ताठ मानेने वर बघ मी आहेच हा दिलासा देणारं... जरा उदास असता पिंजारल्या ढगांचे चित्रविचित्र आकार बनवून खळखळून हसवणारं...हो कधीतरी भरुनही येणारं आणि पावसाची सोबत देत त्यात मोकळं करणारं काळंभोर आभाळ.. प्रत्येक छटा निराळी प्रत्येक अदा निराळी असणारं.. कवेत घेता न येणारं तरी मनात साठवलेलं आभाळ... हक्काचं
.................................................................
विझणं असं अचानक नसतं कधीच.. Process असते ती एक.. कधी स्वतःलाच उमगलेली तर कधी लादली गेलेली... अविरत धगधगणारं अग्निहोत्र होणं नसतंच सगळ्यांच्या नशीबी पण विझणं मात्र टळत नाही.. एक ठिणगी तशी असतेच कायम.. पेटलेली..पण प्रत्येकीचाच वणवा नाही नं होत.. प्रत्येकीचं वेगळेपण अधोरेखित करतोच हा वणवा.. हो पण हे विझणं मात्र समान पातळीवर आणतं सगळ्यांनाच.. म्हटलं नं process असते ती.. दुर्लक्ष ही सुरुवात असणारी
...................................................................
जीव लावणं... किती विचित्र असतो नं हा प्रकार.. ओळख, सवय, नातं.. एकेक टप्पा पार करत करत अलगद जीव जडण्याचा हा टप्पा कधी पार होतो कळतही नाही नं.. हे खरं pure..व्हर्जिन.. भौतिकतेच्या नियमांच्या पार गेलेलं.. स्वत्वाचीही अपेक्षा नसलेलं.. जीव लावणं..जीव गुंतणं..
.............................................................
ह्या मातकट पायवाटा नं भरकटणार्याच असतात.. चकव्यासारख्या.. मागे वळून जुन्या खुणा चाचपडाव्या तर रस्ता रेंगाळतो अन् नव्या स्वप्नांच्या गंधाचा माग ठेवावा तर हमखास चुकामुक... गंधाळल्या वाटांचे मोह तसेही बरे नाही रे.
............................................................
No comments:
Post a Comment