Wednesday, June 26, 2013

उगाचच

खूप मेहनतीने, दमत भागत, अगदी जीव गोळा करुन उंचच उंच शिखराच्या शेवटच्या टोकाशी पोहोचाव अन नेमक त्याच क्षणी पायाखालचा दगड खळकन निसटून पुन्हा पायथ्याशी याव... असच काहीस होतंय..

तिला नं सुगंधाचं भारी वेड... पहाटेच्या दवात न्हालेल्या ओंजळभर पारिजातकाचा केशरी रंग त्याच्या मोहक गंधाबरोबरच तिच्या मनावरही चढायचा... देवघरातल्या धुपाचा , आजी उगाळत असलेल्या चंदनाचा, दुर्वांचा,बेलाचा...कशा कशाच्या म्हणून सुवासाने दरवळलेल्या पहाटघरात ती खुळ्यागत बहरायची....नव्या कोर्या वह्या पुस्तकांचा गंध तसा आता मागे सुटला पण त्याची जागा घेतली ती स्वयंमपाक्घरातल्या सुगंधि खजिन्याने.... ताजी ताजी कोथिम्बिर,लाल तिखट कांदा, हिरवागार कढीपत्ता.. निरनिराळे मसाले.... चरचरीत फोडण्या... कितीतरी हवेसे अन नकोसे वास भरलेली हि खोली...आईच्या मागे मागे फिरता फिरता आताशा तीही रमायला लागली ह्या नगरीत... पण संध्याकालि मात्र जराशी हिरमुसायची ती.. दुपारच्या खरपूस उन्हाच्या गंधानंतर उतरत्या सांजेचा हा उदास आसमंत नाही आवडायचा तिला..रात्रीची मात्र ओढ असायची तिला..त्या रातराणीच्या गंधासाठी...तिच्या सोबत मात्र पुन्हा बहरायची ती... तृप्ततेच्या आनंदाने पुन्हा कळिगत मिटायची ती.. पुन्हा उमलण्यासाठि.. खरचं गंधवेडी होती ती..

एक भलाथोरला वाडा .... मजबूत दगडी बांधकामाचा... त्याच्या पोटात तुळशीवृन्दावानाचा आखीव रेखीव चौक... सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात न्हालेला...त्याच्या चारही बाजूना नुकतीच स्वछ पाण्याने धुतलेली काळ्या कातळाची ओसरि... एकीकडे पितळी कड्यांची बंगइ... अन त्यावर ताजी ताजी चांगली ओंजळ भरून मोगर्याची फुल...
हे असाच काहीतरी एखाद्या फोटोफ्रेमसारख डोक्यात उतरतंय...गेले कित्येक दिवस..

"तुझ्या माझ्या घराघरात वावरणारी गृहिणी म्हणजे मध्यमवर्गीय गार्गीच ना गं? अत्यंत हुशार,कर्तबगार अन तरी संसाराला जखडलेली?" 
काल संध्याकाळी टीव्हीवर कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये ऐकलं हे वाक्य.. हि पुराणातली गार्गी म्हणजे हुशारीचं , बुध्हीमत्तेचं प्रतीक...गुहिणी पण अशीच ना गं? सगळ्याच काही उच्चशिक्षित नसतीलही पण कागदावरच्या डिग्र्यांपेक्शाहि १० पात जास्त काही येत असतं त्यांना.. ८ तास काम करून पगार आणणार्या उच्चपदस्थ मेनेजरइतकच काम हि गृहिणी २४X७ करत असते त्याचं भान तरी असतं का रे आपल्याला ? त्याच्या एवढच शिकलेली असताना ही निव्वळ संसाराची गरज म्हणुन स्वखुशीने ती हे गृहिणीपद सांभाळते तेव्हा तिचा आदर करायचा कि तिला महत्वाच्या निर्णयात डावलय्चं? ... मला मान्य आहे कि बर्याच घरात आता असं चित्र नसेलही ... पण तरी आपल्या आईचा जोब जेव्हा मुलांसाठी गोसिप्चा विषय होतो तेव्हा ह्या गार्गीची घुसमट खुपते...जेव्हा तुझी बायको घरीच असते? ह्या प्रश्नावर नवरा खाली मन घालून हो म्हणतो तेव्हा ह्या हुशारीचा अपमान होतोच..... नाही का?

काल महेंद्र काकांच्या ब्लोग वरची ताजी पोस्ट वाचली.. क्षमा...अजून डोक्यात घुमतेय.. आशय असा होता कि आयुष्याश्याच्या उत्तरार्धात जरा निवांतपण मिळालं की मन भूतकाळात डोकावतं... आनंदाचे, सुखाचे, दु:खाचे, अपयशाचे असे कित्येक क्षण सापडतात तिथे.. अन कधीतरी नकळतच का होईना पण काही क्षण पश्चातापाचेही दिसतात... कदाचित मनाच्या तळाशी ती बोच कायम असतेच.. कधीतरी आपण कुणाला तरी दुखावलेलं असतं... कुणाच्यातरी डोळ्यातल्या पाण्याचं कारण आपण असतो, रागाच्या भरात कोणाचा अपमान झालेला असतो... तेव्हा कळत नाही अन जेव्हा चूक उमगते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.. कधीकधी तर ज्याची माफी मागावी तोच ह्या जगात नसतो..तेव्हा उरते फक्त आयुष्यभराची बोचणी.... ह्या माफीचं खूप मोठं ओझं असतं दोस्तहो... उगाच कोण काय म्हणेल, माझा इगो मला परवानगी देईल का? ह्या भानगडीत पश्चाताप नको नं व्हायला हो नं? आज होळी.. सब गिले शिकवे दूर हो जाये दोस्तो.... बस एक मेसेज, एक काल, या फिर एक मुलाकात.... कुछ पुराने रीश्तोको एक मौका तो देके देखो.... शायद दिल को कुछ सुकून मिले जाये..

गच्ची आणि उन्हाळा

गच्ची आणि उन्हाळा... कूछ खास रिश्ता ही दोस्तो.... रणरणतं उन, घामाच्या धारा,परिक्क्षांचं ओझं.. ह्या सगळ्यात काही मोजक्याच गोष्टीची वाट बघितली जायची.. त्यातलंच एक म्हणजे गच्चीवर झोपणं.. होळी झाली कि सुरु व्हायची आमची भुणभुण आईच्या मागे ... पण परीक्षा आटोप्ल्यशिवाय ती कसली दाद देतेय आम्हा पोरांना..अन शेवटच्या पेपरच्या काही दिवस आधी मग ती आमच्या नकळत गच्ची साफ करून घ्यायची .... नको असलेलं सामान, कुलरचे पार्ट्स , रंगांचे डबे डुबे अंगणात दिसले कि एक हुरूप यायचा.. न त्याच आनंदात शेवटचा पेपर एकदम मस्त जायचा..अन मग सुरु व्हायची तयारी गच्चीवर झोपण्याच्या सोहळ्याची....दिवसभर टळ्टळित उन्हामुळे घरात डांबले गेलेली आमची बच्चेकंपनी उन्हं उतरायला लागल्या बरोबर बाहेर धूम ठोकायची.. मनसोक्त पळापळि झाली कि आमची टोळी गच्चीवर पळायची.... दिवसभर तापलेल्या गच्चीवर पाय भाजायचे पण त्या उत्साहात त्याचं काय? ह्या गरमागरम गच्चीवर मग पाणी शिंपलं जायचं... त्या बिचार्या गच्चीवर कमीच अन आमच्या अंगावरच जास्त असायचं पाणी... हि अशी छान शिम्पलेली गच्ची मग थंड होऊ द्यायची.. तोवर मागच्या अंगणात पाणी मारायचं.. कारण उन्ह्याल्यात रात्रीचं जेवणपण असच मागच्या अंगणात... मस्त अंगात पंगत बसायची... आंबट कैरीसोबत सुरु व्हायचे प्लानिंग रात्री जागवाय्चं.... जेवणं आटोपली कि बाबांसोबत गाद्या गच्चीवर नेण्याचा प्रोग्राम.. इतकेदा खालीवर करून तेव्हा पाय नाही दुखायचे पण.. गाद्या पसरून ठेवायच्या अन चुपचाप खाली यायचं.... आता गाडी वळायची ती आईस्क्रीम कडे..... आईस्क्रीम खाउन होईपर्यंत गच्चीवरच्या गाद्यापण वार्याने मस्त गारेगार झालेल्या असायच्या..... गुडुप अंधार असायचा.. आणि सुरु व्हायच्या भुताखेताच्या गोष्टी.. एकदम होरार अन सस्पेन्स असलेल्या.... गोष्ट ऐन रंगात आली असताना चुकून जिन्यावर जर कोणाची पावलं वाजली तर सोलिड फाटायची एकेकाची...पण तरी पुढे काय हा प्रश्न असायचा.... माहित नाही कसा पण ह्या गोष्टीचा अनलिमिटेड साठा आम्हा प्रत्येकाकडे असायचा..रात्रभर पण पुरेल इतका.. पण खालचं आवराआवर करून आई बाबा गच्चीवर आले कि नाईलाजाने झोपावं लागायचं.. काळ्याभोर आकाशाखाली त्या चांदण्या मोजत मोजत लागलेली शांत झोप आता ए.सीत सुद्धा लागत नाही..

इकडंच तिकडंच

आज सकाळी सकाळी एक साक्षात्कार झाला मला... एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जीजान एक करत असतो.. खूप मेहनत घेत असतो.. पण तरी ती गोष्ट साध्य होत नाही..अस का? तर जी गोष्ट आपण मिळवण्यासाठी धडपडत असतो नेमकी तीच गोष्ट आपल्याला मिळू नये म्हणून कोणीतरी खूप धडपडत असत... बस... कधी तो कमी पडतो तर कधी तुम्ही.. फरक इतकाच कि त्याच्या मेहनतीची,धडपडीची तीव्रता कधी कधी काळात नाही... बाकी Its merely a game of positive and negative efforts... Which part is heavier is result of the game..... So enjoy being in game...

काही नात्यांचे धागे असतात असेच सुटे सुटे .. एक बाजू मनात बांधलेली.. फार घट्ट नाही.. अन खूप वरवरची पण नाही... बस्स असणं महत्वाचं ठरतं काही नात्यांसाठी..... कधीतरी जुळून येण्याच्या अपेक्षेत आजही सुटीच राहिलेली काही अनामिक,समंजस नाती...

गिले ख्वाब यु हथेली पे ना सजा ए राही...क्या पता..अगली हि मोड पे शायद तुफ़ानोसे हाथ मिलना पडे...

कांच के डिब्बीया मे बंद हजारो ख्वाहिशे... दिखाई तो देते है उनके अगिनत रंग....बस मेहसूस नही होता वो उनके होने का एहसास...

उर फुटेस्तोवर पळायचं इथे बस्स.... ध्येय बिय सब झूठ रे..बस रेस में होना मंगता... जिंकणं वैगरे नशिबाच्या गोष्टी बॉस.. पण टिकणं महत्वाचं ... उगाचच आपलं ध्येय गाठायचंय ...मुझे मेरी मंझिल पानी है वैगरे च्या नादात मुळ प्रवाहाच्या बाहेर पडलो नाही म्हणजे मिळवलं रे ..जिवाच्या आकांताने ह्या अश्या पळण्याला जर जगणं म्हणायचं तर कठीण आहे बाबा .... कारण असं पळता पाळता एखाद्या तरी वळणाशी जोरदार कोलमडतोच.. अन अस ठेच लागून कोलमडलं कि जोर जोरात बाहेर येणारा आपलाच श्वासही अनोळखी भासतो म्हणे..सोच लो ...बाकी इस रेस में तो भागना है हि....

एखाद्या व्यक्तीला आपण आदर्श मनात असतो... तिचं वागणं, बोलणं, चालनं.. जस्ट अमेझिंग.. आणि आपल्याही नकळत आपण त्याच्या सारखाच वागत असतो... अन सहजच एक दिवस त्या व्यक्तीबद्दल अस काही काळात कि ती एकदम सामान्य वाटू लागते.. आपल्यासारखीच.. नाही तिचं मोठ्ठं होणं नाही कमी होत... बस तूच सामान्य असणं जाणवायला लागतं.. . पण म्हणून आदर्श बदलतो?

लिहिता लिहिता अलगद घरंगळावा नेमका शब्द अन तरी उमटत जावी एकच अर्थ नसलेली अखंड ओळ...तसा तू... अर्थ नसलेला.. अखंड....तरी अगदी नेमका...

आपण स्वत:च आपली एक वाट निवडतो... खड्तर.. हटके....बिकट..अन अशीच बरीच काहीशी....अगदी जिद्दीने ती वेगळी वाट कापायला सुद्धा लागतो...पण नेमक्या त्याच क्षणी बाजूने कोणीतरी सुळ्ळ्कन आपल्या समोर निघून जातो... त्याच त्या गुळगुळीत झालेल्या,वर्षानुवर्षे सगळ्यांनी वापरलेल्या, प्रत्येक वळणावर गाईड करणार्या वाटेवरून.. काय वाटत हो अश्यावेळी? जेलेसी? पश्चाताप? रेग्रेट? का नेमकं? ध्येय दोन्ही वाटांनी मिळणारच असतं... मग हा नव्याकोऱ्या वाटेचा अटाहास का? वेड ह्यालाच म्हणतात बहुदा... असामान्य लोकांचं समान वेड..(हटके करण्याचा अट्टाहास नाही दादा जिद्द असते... ती नवी कोरी वाट मनाला खुणावते अन tya वाटेने ध्येय मिळतेहि.. पण त्या एका क्शनाचं काय? यशाचे मार्ग बरेच असतात... मग आपला मार्ग नवा असताना चुकीचा तर नाही हा संभ्रम मनात येण चुकीचं तर नाही नं? मला तेच म्हणायचं आहे.... मळलेल्या घासुन्घासून गुळगुळीत झालेल्या वाटेवरुन जेव्हा कोणि आपल्या समोर जातो तेव्हा द्विधा मनस्थिती होणे svabhavik नाही का? हाच क्षण महत्वाचा... बरेच जन तिथूनच परततात न नेमके पुढे जातात)


चांगला भरभक्कम पैसा कमवत असतानाही लोक बेसिक गोष्टींसाठीसुद्धा का कंजुषी करतात? कष्टाचा,मेहनतीचा पैसा वैगरे ठीक आहे हो पण म्हणून लहान लहान गोष्टींसाठीसुद्धा मन मारायचं? का? कशासाठी? ऐशो आराम, चैन कोण करायला सांगताय?बस जे सहज शक्य आहे ते तरी उपभोग... सोबतच्या मित्रालाही द्याव लागेल म्हणून स्वत:साठीसुद्धा चोकोलेत न घेणारे बघितल कि वाईट वाटत..

पुन्हा पाउस

एखादं उनाड, मस्तीखोर पोर असतं नं, खूप दंगा करणारं... त्याची आई अगदी साधी, सोशिक.. अन बाबा आतून प्रेमळ पण बाहेरून खूप कडक, रागीट...आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हे लहानसं पोरगं दिवसभर उंडरत असतं.इकडे जा,तिकडे काहीतरी कर, एक ना दोन असंख्य खोड्या.... पण बाबा येईपर्यंतच हं.. ते आले कि सगळं चिडीचूप... पण आज अचानक काय झालं की बाबा जर लवकरच आले ऑफिस मधून, अन बघतात तो काय,दिवसभर खेळून भटकून कळ्कट्ट झालेला आपलाच मुलगा.. जाम चिडले ते.. तसाच फरफटत परसदारात नेउन.. स्वछ आंघोळ घातली.. सोबत आईला ओरडा होताच असं कसं लक्ष देत नाही म्हणून .... अन मुलाला पण चोप देण सुरूच.. बरेच दिवसांनी लाडक्या लेकाला मनसोक्त आंघोळ घालूनच शांत झाले ते.. 
आज अचानक आलेला मुसळधार पाउस मला असा दिसला.. आभाळबाबा अन धरणीमायेचा लेक हा निसर्ग मस्त चकाचक झाला.. घाबरला होता तोही जरा.. अवेळी आलेला बाबा नं.. अन पार्श्वभूमीला आभाळबाबाचा गडगडाट अन विजांचा मार होताच भीती घालायला... आई मात्र हासता होती.. दिलखुलास..

asach

तुला माहीतेय,एकवेळ अशी होती की कळपाच्या बाहेर राहून जीव घुसमटायचा माझा..सतत कोणाचीतरी सोबत हवी असायची...एकटं पडण्याची भीती ठोका चुकवायला पुरेशी असायची ... अन आता....आता शोधत असते पळवाटा .. गर्दीत असली नं की श्वासही असहकार पुकारतात हल्ली...तो मीपणाचा कोष आजकाल वरचेवर पुन्हा पुन्हा खुणावतोय... परतावं का मी ?

मला नं हा असा पाउस पण आवडतो... नुसता ऐकु येणारा...काळ्याकुट्ट अंधार्या रात्रीचा काजळकाळा पाउस... डोळे बंद करुन फ़क्त ऐकत राहावी ही... निसर्गाची रागदारी...

गिली मिट्टी की सौंधी खुशबू में लिपटे ऐेसे कई अनगिनत ख्वाब युंही बिखेर जाती है बारिशें..हरसाल... चलो इस बार उन्ही ख्वाबोंके कुछ बीज उसी गिली मिट्टी मे बोके देखते.. ख्वाहींशोंकी फसल शायद इस साल अच्छी आ जाए...

सरळ साधं सुतासारखं नातं अधुनमधुन डोरावणार्या गाठींशी अडकायला लागलं नं की संपतच रे सारं.. नंतर सुरू असतो फक्त लपंडाव.. मुखवट्यांचा..आपलंही तसंच काहीसं झालयं का रे?

देवा

देवा,
कसा आहेस बाबा? ठीक नक्कीच नसशील.. तेव्हढा दगडाचा नाहीस नं अजून तू... तुझ्याच त्या केदारनाथात काय चाललाय दिसतंय नं रे तुला? तुझ्या दर्शनासाठीच आले होते हजारो लोक देशाच्या कानाकोपर्यातून... तरी बघतोय नं त्यांचं काय झालाय? किती लोक त्या मलब्याच्याखालि समाधिस्थ झालेत तुला तर ठावूकच असेल... असो... जाब वैगरे नाही विचारायचा तुला... आणि विचारायचा तरी कुठल्या तोंडाने विचारू रे? आमचीच कारणी आम्हाला भोगावंच लागेल नं.... तरी मला सांग तू नेमका राहतोस कुठे रे? म्हणजे लहानपणापासून आम्हला शिकवाल जातं कि देव ( म्हणजे तू) सगळ्यांमध्ये असतोस. देवळात असते ती तुझी फक्त मुर्ती.. संकटात तू मदतीला येतो म्हणे ते पण मानवी रूपातच बहुदा.. म्हणजे असं सगळे मोठे लोक सांगायचे...मग तरी केदारनाथला असं का झालं? देशभरातल्या काही मोजक्या ठिकाणी तुझं वास्तव्य कसं रे? आणि मोजकं म्हणून तिथे वाट्टेल तशी गर्दी... भक्तीला ना नाही रे.. पण हि अशी अघोरी भक्ती? तुझा जीव नाही का रे घुसमटत.... असेलच म्हणा.. निसर्गात रमणारा तू.. त्याचीच नासधूस करून आम्ही तुझ्या घरांचा बाझार मांडला... तुझा राग साहजिक आहेच.. आज त्या अलक्नंदचा प्रवाह जागोजागी अडवला म्हणून ती बेभान झाली .. वाट फुटेल तिथे पळाली ... ज्या हिमलायाचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे त्यालाच कोरून कोरून आम्ही पोकळ केलाय .. चुकतोच रे आम्ही..पुन्हापुन्हा .... मरणांचही राजकारण करणार्यांची जात आमची ... अख्खा हिमालय प्लस्टिक्ने झाकायला कमी करणार नाही हे लोक...निसर्ग जपणाची तुझी साधी इच्छा कळत का नाही रे आम्हाला ? 
जाऊ दे सोड .. तू तरी कोणाकोणाला सुधरवणार? असो.. जे झालं ते झालं... paN निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तुझ्यावर पुन्हा अशी अघोरी वेळ न येओ हेच मागणं.. पुन्हा