Monday, August 25, 2014

कित्येक दिवसांनंतर भरकटलेलो आपण पुन्हा आपल्या घरी परतून येतो ..घरादाराच्या पल्याडहून त्यातलं हरवलेलं घरपण शोधत फिरतो ..सगळं कसं जागच्या जागी..तुझ्या माझ्यासकट.. गोठलेल्या काळासारखं अगदी आपल्या निकट..धुळीच्या जाडच जाड थराखाली तरी जुनंच वादळ लपलं असतं ..डोळे भरुन येता अंधूक अंधूक सारं सारं आठवत राहातं.. कसं कोण जाणेआपल्याच घरात त्या क्षणी कसं उपरेपण दाटून येतं..परकेपणाच्या कुशीतून घर वाकूल्या दाखवूनजातं.. इतक्यात कुठून एक झुळूक वार्यावरती स्वार होते.. तुला स्पर्शुन माझ्यामध्ये हलके हलके विरत जाते... बाल्कनीतल्या मोगर्यापासून परसदारातल्या लिंबापर्यंत गंधांचे अवशेष पुसटसे पुन्हा नव्याने गुंफून जाते..बंद पापणीआड अखेर तेव्हा रंगते जुन्या ओळखींचे द्वंद्व...पुराव्यादाखल अन् पाझरत जातं ओल हरवलं नातं .. इथवर आलो कसं म्हणताना मन नकळत भानावर येतं.. सराईत पाऊल अन् अचानक उंबर्याला अडखळतं... निर्जीवतेचे टाकून उसासे जीव सजीवतेत गुंतत जातो..नेमक्या क्षणी शोकेस मधला जीव अलगद फडताळामध्येअडकत जातो..पडवीमध्ये ओथंबलेलं अस्तित्व मग माजघरात विसावतं..काय काय म्हणून सावरायचं असतं अन् काय काय विस्कटत जातं...थबकलेल्या पावलांवर घर जेव्हा नवा डाव मांडत जातं...ऐन सांजेला हे अर्घ्य उन्हाचं अंगणातल्या तुळशीत विरजतं जातं...खुल्या ओंजळीत खुळ्या घराचं घरपण रुजत जातं..

' ये तो एक आदतसी लग गयी थी कि , फोन की घंटी बजे और सिर्फ तुम्हारा नाम फ्लँश हो....
कीतनी ही देर तक तो बस ताकती रहती उसे ..जैसे तुम्हे ताकती रहती कभी, जैसे अभिन्न सी जुडी हु, .. . .
फोन उठाने की जल्दी तो तब भी नही थी और आज..आज भी उठाने को मन नहीं करता, ..
पर कल जब वही नाम कई अरसों बाद फोन ने पुकारा , तो झपट कर उठा लिया था फोन मैंने ..
शायद डर गयी थी, कही नींद न टूटे फिर इस आवाज से और ये सपनाही न टूट जाए ..
फोन तो उठा भी लिया पर बात?
बात तो अब भी वही ठहरी, अटकी सी थीं...
ठीक दो साँसों के बीचो बीच..
किसी अर्ध-सत्य सी।
तूम समझ तो गये थे नं ……


"कसं असतं नं प्रत्येक नात्यात नं एक जण स्थिर हवाच रे... तरच तर दुसरा त्याच्याभोवती नि:संकोच एक नातं विणू शकतो मुक्तपणे... एक comfortable अंतरावर..space म्हणूया हवं तर त्याला....केंद्रबिंदू ते परिघापर्यंतच्या त्रिज्येची space.. हि space तशी बरीच लवचिक रे पण एक क्षण येतोच असा कि जराशी ताणली किंवा सैलावली कि उसवत जातं रे नात्याचं ,वर्तुळ.... सुलगत जातो एक एक बंध... मागे उरल्या वेड्यावाकड्या नागमोडी गुंत्याला मग नातं तरी कसं रे म्हणायचं? म्हणून हवा असतो एक स्थायी कोपरा नेमकं अंतर जपणारा...." ती बोलत होती अविरत... तिच्या त्याच्या नात्यातल्या त्या अचल केंद्राशी...एका श्वासाच्या अंतरावरून...
आठवण..आठवण म्हणजे असतं तरी काय रे... घडून गेलेल्या एका क्षणात असंख्य ठोक्यांचं विनाकारण गुंतणंच ते ..भलं बुरं असं बरंच काही असतं त्यात..आठवतं मात्र जे नेमकं असतं तेच..तुला गम्मत माहीतेय, काही आठवणी नं ह्या पल्याडच्या असतात जरा वेगळ्या..काळाच्या ओघात आपण त्या विसरत असतो किंवा त्या प्रयत्नात तरी असतो..आणि एखाद्या गाफील क्षणी त्या अश्या अचानक समोर येतात...भांबावतं रे मन...अन् शरमतंसुद्धा..मग लागतं स्वतःला कोसायला..जे विसरायचं ठरवलं होतं ते विसरलोच कसं म्हणत जळत राहातं..आठवणी तर ह्याही असतातच नं आठवणीने विसरायच्या तरी आठवणीत जपलेल्या..

लपाछपीचा खेळ तर सूरुच आहे अव्याहतपणे.. अजूनही..फक्त डाव कोणावर अन् लपतोय कोण कोणापासून हेच कळत नाहीये..की एकच आहेत रे दोघंही..नियतीकडे पाठ करुन आपल्याच नादात म्हणतोय आपण १०,२०,३०...१००..येउ का?आपल्यातच लपलेल्या मीपणाला शोधायला...अन् एका गाफील क्षणाला नियती म्हणते ये..अन् निघतो आपण शोध तसाच अर्धवट टाकून...डाव पुढच्या जन्मावर ढकलून..

खोल खोल तळाशी पक्क ठाउक असतं आपल्याला आपण कोण ते...आपल्या जगण्याचे नियम तिथे आपणच असतात कोरलेले..अन् इमानेइतबारे आपण ते पाळतही असतो..अगदी न चुकता..पण कुठल्यातरी एका वळणावर ह्या खोल तळाशी लक्कन काहीतरी हलतं..एक झुळूक होऊन कोणीतरी त्या तळाचा ताबा घेतं..आपल्याही नकळत..आपलेच नियम आपल्यापुरतं मग बदलत जातात..त्या झूळकेच्या तालावर ठरते श्वासांची लय..अन् काळजाच्या ठोक्यावरही जाणवतं त्याचं अधिराज्य..सवयीची होत जाते मग एक खोलवरची जखम अन् त्यावरचा उतारा...भिनत असतं कोणीतरी रंध्रारंध्रात तरी हवीशी असते ती नशा...ह्या धुंदीवर स्वार होउन मध्यावर येता येता मात्र सवयी काचत जातात..हवेहवेसे उसासे सारे उगा मग टाळले जातात.. हरवलेल्या मीपणाची जाणीव जेव्हा अचानक लख्ख होत जाते.. खोडलेल्या जून्या नियमांचा खडबड्या स्पर्शावर अलगद नवे मीपण कोरले जाते..

 अश्या पावसात सकाळ वैगरे होत नसते रे वेड्या..भ्रम आहे तुझा भ्रम..कसंय नं रात्री झोपताना पाउस दिसलेला नसतो नं म्हणून थोडासा उजेड पाडतो देवबाप्पा...डोळे किलकिले करुन खिडकीतून तो बघायचा मनभरुन अन् पून्हा झोपून जायचं..गुडूप..

मनमोहक रागदारीत बरसणारा मंत्रमुग्ध पाउस..

असंख्य संदर्भ असले तरी एकाही स्पष्टीकरणात कधी गुंफताच नाही आलं रे आपलं नातं .. पावसा..
      आठवतंय तुला,माळरानावरच्या त्या आमच्या वाड्याच्या पहील्या मजल्याला एक लहानशी खिडकी होती..आडवे उभे लोखंडी गज लावलेली..पडदा नसलेली..तरी बाहेर रस्त्यावरनं बघितलं की कायम अंधारच दिसायचा तिथे ..अन् आतून तिथे उभं राहीलं की.. बाहेरचं अख्खं माळरान डोळ्यात उतरायचं..हरेक ऋतुतल्या त्याच्या अदा निराळ्या..मोहक...गुंगवून टाकणार्या..उन्हाळ्यातलं पिवळंजर्द ऊन ,हिवाळ्यातलं गुलाबी धुकं..अन् पावसाळा..पावसाळ्यात तर दूरवर पसरलेला त्याचा हिरवा रंग अक्षरशः जादू करायचा...त्या माळरानावरचं काही म्हणजे काही सुटायचं नाही त्या खिडकीच्या नजरेतनं... तासंतास रमायचे तिथे मी... . हरखून जायचे..बाहेरच्या जगापासून अनभिज्ञ...एका अनामिक जादूच्या ग्लानीत..
      भर गर्दीत माझ्या शोधात भिरभिरणारी तरी मला टाळणारी तुझी हळवी नजर बघितली नं की मला हटकून ती खिडकी आठवते..अगदी तुझ्या डोळ्यांसारखीच होती रे ती..गुढ..समोरच्याच्या मनाचा तळ गाठणारी पण स्वतःचा थांगपत्ता कळू न देणारी..


कसंय नं बयो खरंतर आपल्यापुरतंच असतो आपण..आपल्यातलीच गुंतागुंत एव्हढी मोठी असते की सोडवता सोडवता अवघं आयुष्य सरुन जातं..तरी..तरी का गं धडपड आपली कुणा एकात सामावून जायची किंवा उलट कोणाला आपल्यात एकरुप करुन घ्यायची... एकटेपणाची भिती म्हणून..पण ते तरी कुठे नीटसं समजलंय..म्हटलं नं आपल्यातलीच गुंतागुंत मोठ्ठीय फार...

कसला मस्त पाउस सुरुये नाही..अशा पावसाळी दिवसात कुठल्यातरी आडवाटेला असलेल्या माळरानाआडच्या खोल खोल दरीत गेलाय कधी...वर वर दिसतं तिथे सगळं शांत पण असतं तितकंच अस्थिर... हो पण तिथे भय नसतं रे निसरड्या वाटांचं...किंवा शेवाळल्या आधाराचं...आणि आंधळ्या धुक्याचं?..किंवा पागोळ्यांच्या सरींचं??? नाही भीती नसतेच तिथे...असतो तो आजूबाजूला भारलेला हिरवागर्द प्रकाश अन् मनात हळुवार झिरपत जाणारी एकाग्र शांतता.....एव्हढंच काय ते तिथे आपल्या उण्यापुर्या साथीला..एकटंच असावं तिथे खरतरं अन् स्वीकारावं आव्हान मनाला सावरण्याचं..समोरचं काही दिसत नाही म्हटल्यावर मागे न वळण्याचं... सुरुवातीला नाही जमणार कदाचित..गोंधळ उडेल तुझा ..कसल्यातरी अदृश्य धुक्याच्या गर्दीत तू घुसमटशीलसुद्धा... पण तरी रेंगाळशील मात्र तिथेच...खात्री आहे मला... हो कारण अशा प्रत्येक खोल दरीत हमखास असते अशी एक जागा जिथे सहज सोपं पोहचता येतं..परतून येणं मात्र तितकाच अवघड...जीव अडकून पडावा अशी लावून दरी...
तुझ्या माझ्या नात्यातली दरी अशी नाही का रे ?


खुप खुप दिवसांनी अचानक तुझा फोन येतो..मी कामाच्या रगाड्यात गुंगलेले अन् तु..तु माझ्यात(हो नं?)..किती किती बोलायचं असतं इतक्या दिवसाचं साचलेलं...तरी..तरी नेहमीच सुरुवात होते ती "पाउस आहे का गं तुमच्याकडे"ह्या tricky प्रश्नाने.. नाही म्हणावं तर माझ्या आवाजातला गहीवर खरं सांगून जातो अन् हो म्हणावं तर तुझा कोरडा आवंढा मला उसवून जातो..मग टाळतेच मी ते हवामानाचे अंदाज अन् घसरते आपल्या पुढच्या topic वर...विचारत बसते घरचे हाल-हवाल..आई बाबा, दादा वहीनी,छोट्या..अगदी शेजारपाजारचीसुद्धा चौकशी होते..वेळ काढुपणा दोघांचाही...सण वार, जन्म मृत्यू..कोणाची परीक्षा अन् कोणाचे निकाल..काय काय विचारात बसतो..जे विचारायचं असतं ते शिताफीने टाळून.. तू कसा आहेस हा प्रश्नहि शेवटी त्यातच विरुन जातो..उत्तर माहित असलं तरी प्रश्न असतोच नं रे...एकेक करत सगळे विषय संपतातच शेवटी..आणि उरते नेहमीची निरोपाची स्तब्धता...न आवडणारी...पलिकडून येणार्या आवाजाचा वेध घेत, ठेवावा आता फोन म्हणत दोघंही शांत होतो...किती वेळ कोण जाणे दोघंही तिथेच असतो तसेच आजमावत ..अंदाज घेत..खरंखुरं बोलणं तिथे आत्ता कुठे सुरु होतं असतं ..शेवटाकडे सुरु होणारं मौनाचं नवं संभाषण तिथेच रुजू होतं असतं..लक्षात येतंय नं तुझ्या?

तिन्हीसांज अशी झाकोळून आली की एक विलक्षण कालवाकालव होते..घराच्या चार भिंतीतही असुरक्षितता दाटून येते.. आणि सहज एक विचार सलतो..कोणी आपलं घर सोडून कसं काय जात असेल? सकाळी वाणसामान घ्यायला म्हणून गेलेला माणूस परतून आलाच नाही तर...नाही मरण ही वेगळी शक्यता आहे...पण कुठल्यातरी एका क्षणाच्या ओढीने कोणी आपल्या सगळ्या ऐहीकतेचा त्याग कसा करत असेल...दारावर आलेला फकिर म्हणुनच मला नेहमीच त्याचा माग काढायला भाग पाडतो..तो असतो त्याच्याच धुंधीत..विरक्तीच्या.. अन् मी..मी त्याच्या मागे त्याची वाट पहाणार्या त्याच्या माणसांच्या मनात..तिथल्या प्रश्नांमध्ये... जाणारा एका क्षणात सगळ्यांकडे पाठ फिरवून जातो पण मागे राहणारा मात्र आयुष्यभर शोधत राहतो जाणार्याच्या पाउलखुणा... जाणार्याला त्याचं काहीच नसेल?..गुंतवणूक काहीच नसेल त्याची...? की हे बंध सोडवणं नेमकं जमलं असेल त्याला? एखाद्या साधूबाबाला गाठून विचारावंच त्याची घर सोडण्याच्या क्षणाची कथा... उगाचची कालवाकालव थोडीतरी शमेल..

आजकल रोज रात पलकोंतले हडबडीसी मची होती है...हा वही वो कुछ बिगडे ख्वाब.. छोटी छोटी खुषीके बडे बडे ख्वाब..पर पता नही क्यों आजकल रोज आपसमें झगडते हुए ख्वाब...ध्यानसे देखो तो शायद दो संघटनाए बनी है उनमे...एक मेरे और एक तुम्हारे सपनोंकी संघटना...और दोने में एक समान ख्वाब.... बस अब गिनेचुनेही जिंदा है लेकीन..हां पर नेता बने हुए वो दो ख्वाब.. अब भी वैसे के वैसे...कुछ बदला भी तो नही...ना ना याद मत करों उन्हे..भूल नहीं पाओगे फिरसे.. रातभर झगडतेें वो दो प्यारे ख्वाबा... बेमतलब.. बेवजह.. ठीक हमारे तरह..पता नही क्या हासील करना था..
अरे हाँ याद आया..एक बात बताओ,हमनें भी तो साथ बुने थे कुछ ख्वाब..सतरंगी जिंदगी के..वो कही मिले नही..कही तुम अपने साथ ले तो नही गए..."वो"ख्वाब..अपनी यादोंके साथ..


स रात साथ देखे सारे सपने, आज लगातार तिसरे दिन.. दिनदहाडे ..जब फिरसे मुस्कुराने लगे.. तब जाके ये एहसास हुआ..हमारे बीच कुछ तो बाकी रह गया है शायद...है ना?

कल रात पता नही क्या था
पल्कोंके नीचे कुछ बडी तेजीसे चुभ रहा था
हा कुछ यादे हो सकती है
पर उन्हे तो भूलना था...
तुम्ही ने तो बताया था...
या फिर थे वही खुशनसीब ख्वाब..
गिने चुने... साथ देखे हुए...
पर...पर ख्वाब तो कभी चुभते नही...
ये भी तुम्ही ने तो कहा था...
फिर...फिर क्या था ...
पुरी रात बस इस सोचमें गुजर गयी...
और पलकोके नीचे दर्दभारी फिर एक रात सो गयी...
ठक जो गायी थी संभलते.. संभालते...

कल तेरे ना होने कि सालगिराह थी ..
तुम्हे याद तो है नं???
कितनी बार कहा हैं ऐसी बारिश में अपने सारे ख्वाब संभाल के रखा करो...किसी ऐसी जगह जहाँ वो उन्हें छू न सके...बड़ी मिन्नतों के बाद धूप ने चुना था इन्हें..बताया तो था न तुम्हें...अब भला तुम ही बताओं कौन खरीदेंगा ऐसे गिले ख्वाब...सड ही जाएगें न... हरसाल की तरहा... नई फसलों के नये ख्वाब...

पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?

अर्धवट असतं सगळं.. रेघोट्यांच्या नात्यांसारखं..धड गुंतताही येत नाही अन् अलगद पाय काढताही येत नाही..हवं तर असतं त्यातलं सगळंच.. प्रेम..ओढ..पण नकोसं असतं ते हवं तेव्हा हवं तिथे तत्पर असणं..
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल

हातचा घ्यायचा म्हणून बाजूला ठेवलेली नाती हिशोबातून सुटलीच तर रे काय करायचं... उत्तरांची टाळाटाळ... कि प्रश्नांचा फेरविचार...

पावसाळी रंगाचं भरगच्च आभाळ त्याचा हक्काचा पाउस मिरवत असतं..वरवर सारं शांत शांत...एकसंध... तरी आतून सगळंच हललेलं असतं..अगदी कुठल्याही क्षणी तुटेल आता इतकी कवाडं तटतटलेली....पण आभाळ मात्र तटस्थ..थिजलेलं.. जागच्या जागी..
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ... 
पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो

रात्रभर मोठ्या प्रयत्नाने कसंबसं एकवटलेल्या सैरभैर मनाला पुन्हा मुक्तहस्ते उधळणारी खट्याळ सकाळ

Saturday, August 2, 2014

मिट्ट काळ्या अमावसेच्या ओटीत अलगद कोणीतरी तान्ह्या चंद्राचा गर्भ टाकावा , भाबड्या तिने तोही अगदी असोशीने रुजवावा, दिवसादिवसाच्या हिशोबाने त्याला वाढवावा...गोंजारावा...न्हाहू माखू घालावा...हळूहळू बाळसं धरणार्या त्याचं तेज अंगावर पांघरुन त्याला अवघ्या आभाळभर मिरवावा...त्याच्या कौतुकाने इतकं हरखून जावं की पौर्णिमेचाही विसर पडावा...चांदण्याच्या चमचमत्या नजरेत फक्त आणि फक्त हेवा दिसत राहावा..
देहभर पसरलेल्या सुखाच्या खुणांनी इतकं भारुन जावं की जगरहाटीच्या नियमाने त्याच गर्भातल्या चंद्राचं कोमेजणंही दिसू नये...इतकं खोलवर भिनत जावं हे आंधळेपण की एक आवर्तन पुर्ण होता होता उन्मळून पडलेली रिकामी कूस बघूनच खडबडून जाग यावी...करावा म्हटलं तरी अश्या वांझोट्या स्वप्नांचा आक्रोश तरी कसा रे करावा...दुःखाचाही अवसर न देता तोवर दारात उभा असतोच आणखी एक याचक तश्याच तान्हुल्या चंद्राचा गर्भ कुशीत घेउन...पुन्हा रुजण्यासाठी..कोमेजण्यासाठी...तेच आवर्तन पुन्हा पुन्हा...