कितनी बार कहा हैं ऐसी बारिश में अपने सारे ख्वाब संभाल के रखा करो...किसी ऐसी जगह जहाँ वो उन्हें छू न सके...बड़ी मिन्नतों के बाद धूप ने चुना था इन्हें..बताया तो था न तुम्हें...अब भला तुम ही बताओं कौन खरीदेंगा ऐसे गिले ख्वाब...सड ही जाएगें न... हरसाल की तरहा... नई फसलों के नये ख्वाब...
पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?
अर्धवट असतं सगळं.. रेघोट्यांच्या नात्यांसारखं..धड गुंतताही येत नाही अन् अलगद पाय काढताही येत नाही..हवं तर असतं त्यातलं सगळंच.. प्रेम..ओढ..पण नकोसं असतं ते हवं तेव्हा हवं तिथे तत्पर असणं..
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल
हातचा घ्यायचा म्हणून बाजूला ठेवलेली नाती हिशोबातून सुटलीच तर रे काय करायचं... उत्तरांची टाळाटाळ... कि प्रश्नांचा फेरविचार...
पावसाळी रंगाचं भरगच्च आभाळ त्याचा हक्काचा पाउस मिरवत असतं..वरवर सारं शांत शांत...एकसंध... तरी आतून सगळंच हललेलं असतं..अगदी कुठल्याही क्षणी तुटेल आता इतकी कवाडं तटतटलेली....पण आभाळ मात्र तटस्थ..थिजलेलं.. जागच्या जागी..
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ...
पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो
रात्रभर मोठ्या प्रयत्नाने कसंबसं एकवटलेल्या सैरभैर मनाला पुन्हा मुक्तहस्ते उधळणारी खट्याळ सकाळ
पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?
अर्धवट असतं सगळं.. रेघोट्यांच्या नात्यांसारखं..धड गुंतताही येत नाही अन् अलगद पाय काढताही येत नाही..हवं तर असतं त्यातलं सगळंच.. प्रेम..ओढ..पण नकोसं असतं ते हवं तेव्हा हवं तिथे तत्पर असणं..
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल
हातचा घ्यायचा म्हणून बाजूला ठेवलेली नाती हिशोबातून सुटलीच तर रे काय करायचं... उत्तरांची टाळाटाळ... कि प्रश्नांचा फेरविचार...
पावसाळी रंगाचं भरगच्च आभाळ त्याचा हक्काचा पाउस मिरवत असतं..वरवर सारं शांत शांत...एकसंध... तरी आतून सगळंच हललेलं असतं..अगदी कुठल्याही क्षणी तुटेल आता इतकी कवाडं तटतटलेली....पण आभाळ मात्र तटस्थ..थिजलेलं.. जागच्या जागी..
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ...
पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो
रात्रभर मोठ्या प्रयत्नाने कसंबसं एकवटलेल्या सैरभैर मनाला पुन्हा मुक्तहस्ते उधळणारी खट्याळ सकाळ
No comments:
Post a Comment