१ मे... महाराष्ट्र दिन... कामगार दिन.. माझ्यासाठी मात्र अजून एक खास आठवण..निकाल दिन... शाळेत असताना परीक्षा संपली कि आम्ही उंडारायला मोकळे... भर उन्हात खेळायचं, आंब्याचा रस, मलई कुल्फी , सापशिडी, अस काय काय आठवत उन्हाळ्याची सुट्टी म्हटल कि... ह्या सगळ्यात भीती फक्त निकालाची...रोज १० वाजेपर्यंत लोळत पडलेलो आम्ही निकालाच्या दिवशी मात्र पहाटेपासूनच जागे... मनातल्या मनात देवाचा धावा..रात्री स्वप्नातदिसलेले आपलेच सोडवलेले पेपर.. गेल्या पूर्ण सुट्टीत साध्या विशायांचे नावही विसरले असताना , स्वप्नात हे दिसतच कस हे आजही न उमगलेलं... रोज आईचा ओरडा खाईपर्यंत जागचे न हलणारे आम्ही आजच्या दिवशी मात्र गपगुमान शाळेत जायची तयारी करायचो.. आणि मग आईच्या डोळ्यातली काळजी आणि बाबांच्या नजरेतली जरब चुकवत आमची स्वारी शक्य तितक्या लवकर शाळेत हजर... आज एकाच दिवशी शाळेतल चित्र पालटलेल असायचं... तमाम मुल शांत, बडबड न करता गप्प .... अन तमाम शिक्षक.. मस्तीच्या मूडमध्ये... अब आया उंट पहाड के निचे....असा काहीसा मिश्कील भाव...प्रार्थना, रांगा, मोठ्या बाईंच भाषण ( उपदेश)..ह्या सगळ्या सोपस्कारानंतर निकाल.... पास नापास.. एका मार्काची चढाओढ ..काही आनंदी तर काही पडलेले चेहरे... पण एकूणच सुटकेचा निश्वास.. आणि मनात चाहूल पुढच्या वर्गाची...
इतकी वर्ष लोटली... पण अजूनही निकाल पाठ सोडत नाही....प्रश्न निराळे... उत्तर वेगळी... शाळा कधीच सुटली ... हुरहुरत्या मनात निकालाची वाट मात्र अजूनही...
इतकी वर्ष लोटली... पण अजूनही निकाल पाठ सोडत नाही....प्रश्न निराळे... उत्तर वेगळी... शाळा कधीच सुटली ... हुरहुरत्या मनात निकालाची वाट मात्र अजूनही...
No comments:
Post a Comment