Sunday, May 6, 2012

सरत्या काळानुसार लोकं बदलतात,त्यांच्यांशी जोडलेली नात्यांची समिकरणं बदलतात... भावना बदलतात... आणि खरच हा बदल एक अविभाज्य भाग बनत जातो आपल्या जगण्याचा..आपण ही सवयीचे गुलाम..स्वीकरतो हे सारे बदल... रोजचाच दिवस उगवतो अन् तसाच मावळतो...आपण पुढे सरकत राहतो..पण अचानक एक दिवस स्वतःलाच स्वतःची ओळख अनोळखी भासते..त्या नेमक्या क्षणाला बदलांची सवय झालेलं आपलं मन हा बदल मात्र स्वीकारायला तयार नसतं... आपल्या आप्तांकडुन जेव्हा ह्या बदलाला नाकारलं जातं तेव्हा खरतरं मुळापासुन हादरतो आपण.. आणि त्याच सुन्न मनस्थितीत विचारत बसतो स्वतःलाच.. नेमकं कुठल्या वळणावर हरवलं ते माझं हवंहवसं मीपण.. खरखुरं.. मुखवट्याशिवायचं... अन् मग सुरु होतो तो हा शोध.. भविष्याच्या वाटेवर चालताना भुतकाळात डोकावुन हरवलेलं गवसतयं का ते शोधायचा अविरत चालणारा खेळ.. तुम्हा आम्हा सार्यांचाच...

No comments:

Post a Comment