जीव लावावा तो तुझ्यासारख्या माणसावरच.... माणसातलं हे हरवत चाललेलं माणुसपण जेव्हा तुझ्या एका नजरेत दिसतं नं तेव्हा वाटतो एक विश्वास..ह्या प्रेतांच्या वस्त्य़ांमध्ये जिवंतपणा शिल्लक असण्याचा.. असंकसं रे सुचतं तुला नेमक्या वेळी नेमकं बोलत नेमकेपणाने नेमक्या व्यक्तीच्या मनात शिरणं..खरं सांगायचं तर तुला एकदा भेटल्यावर तुला विसरणं तसं अशक्यच.. तसंही तुला ओळखायला लागल्यापासुन तुझ्या तनामनात वसलेला तुझा सच्चेपणाच तर तुझी ओळख बनला होता..अन् माझी ओळख?हं..खरयं तुझं..काही नात्यांच्या ओळखीही त्यांच्या नावांप्रमाणे पुसट होत जातात आणि मागे उरतात काही सुगंधी आठवणींचे हळवे ओले ओरखडे.जाउ दे पुन्हा नकोच ते..पण हो जीव लावा तो तुझ्यासारख्या माणसावरच...कारण... कारण हे असलं जीवघेणं नातं तुच पेलु शकतो..तेही अगदी सहजच.. चेहर्यावरची रेषही न बदलता मनातली सारी अखंड वादळं लपवणं तुलाच शक्य...
No comments:
Post a Comment