मैसूर सोप आणि शेगाव काही सुगंधांचं काही जगांशी, घटनांशी, व्यक्तींशी एक खास नातं असतं.. म्हणजे जोन्सन बेबी पावडरचा वास अगदी भर गर्दीत आला तरी समोर गुटगुटीत स्वच्छ बाळ येतं... आईच्या आजीच्या ओलसर पदराचा वास तर कुठेही ओळखू शकतो... काही लोकं तर त्यांच्या खास अत्तरांमुळे ओळखले जातात... तसंच मैसूर सोप आणि शेगाव.. अगदी लहान असल्यापासून मी शेगावला जाते.. kind of routine... मंदिराच्या जवळचं ते भक्तनिवास...त्यातली ठराविक एक खोली आणि नेमकी त्याच्याच जवळून धावणारी धडधडती आगगाडी...थंडीतली पहाट आणि मैसूर सोपचा सुगंध... तेंव्हा न ती खुप महाग असायची.. मोती साबणा सारखी.. म्हणून अश्या खास वेळी वापरली जाणारी ... त्याचा तो मस्त कागदी खोका... आत कागदात लपेटलेली ती चंदनाची वडी... अहाहा... तो कागद कित्येक दिवस पुस्तकात जपला जायचा... अन दरवर्षी नेमाने तो बदललाही जायचा.. एक दिवस वापरलेला साबण मग कित्येक दिवस सोबत करायचा... सणासुदीला पुन्हा पुन्हा निघायचा... पण वर्षभरात दुसर्यांदा काही आणला जायचा नाही .. कदाचित म्हणूनच...ती पहाटेची वेळ.. भक्तीने भारलेलं सभोवताल आणि श्रीमंत मैसूर सोपने केलेली आंघोळ... पावित्र्य.. मंगलमय... शुध्द... ह्या शब्दांचा अर्थ आजही माझ्यासाठी ह्या सगळ्याशीच जोडलेला आहे...
Sunday, October 11, 2015
काल काही कामासाठी बाजारात गेले होते.. टिपिकल रिपेअर मार्केट... लहान मोठ्ठ्या एलेक्ट्रीकल, मेक्यानिकल, इलेक्ट्रोनिक्स गोष्टी, त्यांचे स्पेअर पार्ट्स, त्यांचे सर्विस वोर्कशोप्स... असा सगळा माहोल... काल पहिल्यांदाच आले इथे असं नाही पण नेहमीच जाणवणारी एक गोष्ट पुन्हा जाणवली.. ह्या फिल्ड मधलं पुरुषांचं वर्चस्व... ह्या भागात कधीही गेलं तरी मोजून 3-4 बायका दिसतात माझ्यासारख्या... आणि जाणवते ती आपल्यावर खिळलेली नजर पुरुषाची... नाही दरवेळी ती घाण नसते, इथे तर नाहीच...हि नजर असते कौतुकाची, आदराची, आणि कुतूहलाची सुद्धा... खोटं वाटेल कदाचित पण नं कामाची तत्परता सर्वात जास्त मला इथे दिसते... किंवा मी मुलगी म्हणून असेल कदाचित .. पण कधीच इथे मला वाट पहावी लागत नाही... आणि जितका वेळ असते तिथे तितका वेळ मला माझ्या मुलगी असण्याची जाणीव खूप चांगल्या पद्धतीने होत राहते.... thanks to these male dominated industries...बाहेरचं जग मुलींसाठी इतकही वाईट नाही हे पुन्हा माझ्यात रुजवल्याबद्दल....
.................................................................................................................
BRT... आमच्या ह्या भागात गेले वर्षभर हे BRT चं काम सुरु आहे... रस्त्याच्या मधोमध एक मोठ्ठा नीट कुंपण घातलेला रस्ता... आणि मुख्य म्हणजे त्यावर कुठे खोदकाम नाही कि रेतीचे ढिगारे नाही.. मस्त मोकळा गुळगुळीत रस्ता.. चारपदरी.. तर ह्या रस्त्याचं मेन प्रयोजन काही का असेना, लोकांनी त्याचे जे उपयोग शोधून काढलेत त्याला तोड नाही.. म्हणजे सकाळी त्यावर मोर्निंग वॉक होतं, योगासनाचे क्लासेस होतात, हास्य क्लब तर प्रत्येक चौकात... पहाटेच्या वेळी रहदारीच्या मधोमध भर रस्त्यात प्राणायाम कसं काय करतात लोकं हा प्रश्नच आहे म्हणा.... दुपारी हि जागा कामगारांची... कामवाल्या बायका, फेरीवाले, बिनधास्त तिथल्या BRT बस stop च्या शेड मध्ये विसावतात.. आणि जवळपासच्या ऑफिसेसची हि हक्काची पार्किंग स्पेस बरं का.. ऐसपैस.. संध्याकाळच्या वेळी मात्र ह्या जागेचा नूर बदलतो.. दिवसाच्या गुढतेची कात टाकून हा रस्ता रंगीबेरंगी होतो..यंगिस्तान चा कट्टा होतो.. मस्ती मज्जेने गजबजून जातो... त्या पिवळ्या प्रकाशाच्या खाली कधी वाढदिवस साजरा होतो तर कधी फेअरवेल.... एखाद्या गाडीच्या टपावर चढून कधी नाचत असतं कोणी तर कधी बाईकवर कोणीतरी स्टंट मारत कोणाला तरी इम्प्रेस करत असतं... धमाल असते एकूणच.. रात्र चढत जाता बाजूचा मुख्य रस्ता हळूहळू शांत होत जातो... आणि गप्पांमध्ये रंगलेला हा BRT लेन त्या चहाच्या कपात विरघळत जातो...
........................................................................................................
टाळायचा म्हणत जाणून बुजून बदललेला रस्ता जेव्हा पुन्हा त्याच नकोश्या मुक्कामी पोहोचतो नं... तेव्हा लागत जातात अर्थ सवयींचे.. पावलांच्या... मनाच्या... सवयींचे अर्थ...
.......................................................................
काल बरेच दिवसांनी ऐन घाईच्या वेळी भर रस्त्यात फतकल मारून बसलेलं हट्टी पिल्लू बघितलं... शाळेचा ड्रेस, गळ्यात waterbag , पाठीवर दप्तर आणि हे ध्यान रस्त्यात पाय पसरून भोकाड पसरतंय... त्याची आई बिच्चारी कानकोंडी आणि रागावलेली... पिल्ल्याची नेमकी डिमांड नाही कळली पण अजूनतरी आईला त्रास देण्याची, हट्ट करण्याची जुनीच पद्धत हि पोरं वापरताहेत हे बघून बरं वाटलं...
..............................................................................
.................................................................................................................
BRT... आमच्या ह्या भागात गेले वर्षभर हे BRT चं काम सुरु आहे... रस्त्याच्या मधोमध एक मोठ्ठा नीट कुंपण घातलेला रस्ता... आणि मुख्य म्हणजे त्यावर कुठे खोदकाम नाही कि रेतीचे ढिगारे नाही.. मस्त मोकळा गुळगुळीत रस्ता.. चारपदरी.. तर ह्या रस्त्याचं मेन प्रयोजन काही का असेना, लोकांनी त्याचे जे उपयोग शोधून काढलेत त्याला तोड नाही.. म्हणजे सकाळी त्यावर मोर्निंग वॉक होतं, योगासनाचे क्लासेस होतात, हास्य क्लब तर प्रत्येक चौकात... पहाटेच्या वेळी रहदारीच्या मधोमध भर रस्त्यात प्राणायाम कसं काय करतात लोकं हा प्रश्नच आहे म्हणा.... दुपारी हि जागा कामगारांची... कामवाल्या बायका, फेरीवाले, बिनधास्त तिथल्या BRT बस stop च्या शेड मध्ये विसावतात.. आणि जवळपासच्या ऑफिसेसची हि हक्काची पार्किंग स्पेस बरं का.. ऐसपैस.. संध्याकाळच्या वेळी मात्र ह्या जागेचा नूर बदलतो.. दिवसाच्या गुढतेची कात टाकून हा रस्ता रंगीबेरंगी होतो..यंगिस्तान चा कट्टा होतो.. मस्ती मज्जेने गजबजून जातो... त्या पिवळ्या प्रकाशाच्या खाली कधी वाढदिवस साजरा होतो तर कधी फेअरवेल.... एखाद्या गाडीच्या टपावर चढून कधी नाचत असतं कोणी तर कधी बाईकवर कोणीतरी स्टंट मारत कोणाला तरी इम्प्रेस करत असतं... धमाल असते एकूणच.. रात्र चढत जाता बाजूचा मुख्य रस्ता हळूहळू शांत होत जातो... आणि गप्पांमध्ये रंगलेला हा BRT लेन त्या चहाच्या कपात विरघळत जातो...
........................................................................................................
टाळायचा म्हणत जाणून बुजून बदललेला रस्ता जेव्हा पुन्हा त्याच नकोश्या मुक्कामी पोहोचतो नं... तेव्हा लागत जातात अर्थ सवयींचे.. पावलांच्या... मनाच्या... सवयींचे अर्थ...
.......................................................................
काल बरेच दिवसांनी ऐन घाईच्या वेळी भर रस्त्यात फतकल मारून बसलेलं हट्टी पिल्लू बघितलं... शाळेचा ड्रेस, गळ्यात waterbag , पाठीवर दप्तर आणि हे ध्यान रस्त्यात पाय पसरून भोकाड पसरतंय... त्याची आई बिच्चारी कानकोंडी आणि रागावलेली... पिल्ल्याची नेमकी डिमांड नाही कळली पण अजूनतरी आईला त्रास देण्याची, हट्ट करण्याची जुनीच पद्धत हि पोरं वापरताहेत हे बघून बरं वाटलं...
..............................................................................
म्हैस
म्हैस.. अहं हि पुलंची म्हैस नाही.. ह्या म्हशी.. काळ्या तुकतुकीत अंगाच्या, वेलांटीदार शिंगांच्या आणि कळकट्ट शेपटीच्या... तर ह्या म्हशींच घर माझ्या ऑफिसच्या वळणावर.. आणि ते वळण म्हणजे बॉटल नेक... रोजचा ट्राफिक जॅम... आणि त्यात ह्या म्हशींची ही मोर्निंग वाक ची वेळ... झोपाळलेल्या डोळ्यांनी, शेपटीने चिप्पाड काढत आल्सवात ऐन मोक्याच्या वेळी ह्या म्हशी रस्त्यावर उतरतात...बर एका बाजूने चालावं नं तर नाही त्या आपल्या मधोमध... चालली वरात ऑफिसच्या वेळेत रमत गमत... ... गब्दुल म्हशी हॉर्न वाजला कि बिथरणार...दुडूदुडू पळणार.. आज नेमकी मी फ्रंट ला... समोर गुटगुटीत म्हैस.. मी हंड्ल डावीकडे केलं कि तीपण शिंग वळवणार.. अन मी जर गाडी रेज केली कि तिच्या घाऱ्या डोळ्यांनी असं काही बघणार कि मी आहे त्याजागी गाडी बंद करून उभी.. तिच्या बाजूची तिची मैत्रीण अजूनही जर झोपेत अन माझ्या डोक्यातला प्लान चेंज.. आता मी ह्या प्रेमळ झोपाळू म्हशीच्या बाजूने गाडी टाकणार.. मी आगेकूच करणार इतक्यात.. इतक्यात हिची झोप उडवायला त्या तिच्या गलेलठ्ठ मैत्रिणीने हंबरडा फोडला... हम्माआ... त्याचा मला लागलेला अर्थ असा " अग ए उठ, ती सटवी तुला घासून जातेय बघ, तिला जाऊ देऊ नको".. कारण नेमक्या त्या क्षणी मी बरोबर त्यांच्या मध्ये.. खिंडीत अडकल्यासारखी.. दोन्ही बाजूला काळ्या म्हशी अन मध्ये माझी काळी गाडी.. त्या दोन पावलं पुढे.. मी चार चाकं मागे.. त्यामागे मी पुढे... कासवगती सारखं मी म्हैस गतीने समोर सरकत होती. अन सवयीने लक्ष घड्याळाकडे... च्यायला ह्या म्हशींमुळे लेटमार्क? खपणार नाही.. खिंडीत अडकल्या मुळे अंगात बाजीप्रभू संचारले .. अन हंड्लरुपी तलवारीचे चहुबाजूनी वार करत मी शत्रूपक्षावर तुटून पडले... शत्रुपक्ष बिथरला... अचानक झाल्या हमल्यामुळे वाट फुटेल तिथे घुसायला लागला.. पण आमची एकी होती.. माझ्या मागे माझ सैन्य होतंच.. मी धैर्याने पुढे सरकत होते.. आणि ऐन मोक्याच्या क्षणी मला सुटकेचा मार्ग दिसला..नेमका तोच त्या ढूस म्हशीला पण दिसला.. मी गाडीचा वेग वाढवला तसा ती जॉगिंग मोड वर..मी पुढे ती मागे..ती पुढे मी मागे.. चुरशीचा लढा.. त्वेष.. इर्षा.. अन डोक्यात लेटमार्क...टिंग... लेटमार्कच्या विचाराने मी मुसंडी मारली.. एक हात होर्न वर आणि दुसरा स्पीडवर...डोळ्यासमोर लेटमार्क ... अन खिंड पार...हुश...मी जिंकले होते.. विश्वास बसत नव्हता म्हणून मागे वळून बघितलं तर तिच्या डोळ्यात बघून घेईन तुला असा भाव. अन ते बघून घाबरलेल्या माझं ऑफिसकडे प्रयाण...
कोई ख्वाब था शायद , तेरे जाने के बाद मेरे होने का ख्वाब... भला ऐसे ख्वाब कभी सच भी होते है ? और न ही होती है इन ख्वाबोंकी कोई उम्र…… इनसे लम्बी उम्र तो उस कड़कती बिजलीकी थी … पिछले साल बारिश जो तुम्हे अपने साथ ले गयी …… नहीं तो ये ख्वाब .... तेरे जाने के बाद मेरे होने का ख्वाब…दिन दहाड़े ऐसे ख्वाबोंका आँखोंतले पनपना कही उनके सच होने का सबुत तो नहीं .... वैसे भी ख्वाबोंके सच होने का कोई समय नहीं होता और न ही तुम्हारे न होने का… हो सके तो ये वक्त अपने साथ ले जाओ...ये ख्वाब मै रख लुंगी....
.................................................................................................................
पाउलवाटा अशाच तर रेखाटल्या जातात नं ... पावलापावलावर काहीतरी नवीन असतं... टाळता न येणारं अन् म्हणून भिडायला शिकवणारं..कधी उत्सुर्तपणे कवेत घेणारं तर कधी झिडकारणारं..पण नवीन .. कोणाचाही स्पर्श न झालेली पाउलवाट
...........................................................................................................
दरवेळी कारणं असावीच असं नसतं रे.. म्हणजे तू विचारात राहतोस काय झालं ? कोणी काही केलं का ? कोणी काही बोललं का? पण कोणी बोलायची वाट आपण खरंच बघतो का रे ? कधीतरी आपलं मनंच बोलतं आपल्याला आणि विलक्षण दुखावले जातो आपण.. तसं तर मनातलं सगळं आपल्याला ठाऊकच असतं नं.. मी खर्या खोट्याची शहानिशा नाही करणार पण खरं सांगायचं तर हे मनाचे बोलच सगळ्यात जास्त लागट.. म्हणूनच म्हटलं सगळ्याच गोष्टीना कारणं नसावीत आणि असली तरी सांगण्यासारखी नसावीत हो नं
................................................................................................................
शाम की किसी कोनसे आ जाती है रात.. तब याद आते हो तुम.. हाथसे फिसले रेत जैसे वक्त जब दरवाजेपे आके रुक जाता है.. तब याद आते हो तुम.… कही कभी तो ये रात काले बादल ओढ़े आती है.. जैसे कभी तुम आया करते थे.… रंगीन सपने ओढ़े..... ना ये तब बता पायी न अब.… या शायद फिर कभी नहीं.… पर रात की चौखट पे सवेरा अपना पहला कदम रख मुस्कुरा देती है.… तुम अब भी वही उस चौखट पे याद आते हो.……
.....................................................................................................
तळ ढवळला गेला नं कि पाणी गढूळ होणारच रे.. पण म्हणून पाणी वाईट नसतं नं...अवघड असते ती वेळ.. जर ती निवळू द्यावी..वरवरची कील्मिषं निपटून काढावी
अन तो वर्षानुवर्ष जुना गाळ? त्याचं रे काय करायचं? तोही निपटून काढावा? कि बसू द्यावा त्यला पुन्हा तळाशी... असंच कधीतरी ढवळून यायला... हो नं.. बाकी
पारदर्शी मन तसंही नकोच नं...
.........................................................................................
एखाद्या क्षणाचं थबकलेलं असणं स्वीकारू शकतो का गं बयो आपण? म्हणजे असा खास वैगरे नाही.. अगदी कुठलाही क्षण..आत्ता तुझ्या माझ्यात घर करतोय तो किंवा असा पटकन निसटतोय तोही... तिथेच थबकला तर... आपण असे राहू शकतो का गं.. त्या क्षणाशी गोठलेले... कदाचित नाही.. कितीही हवेसे असले तरी थांबलेली.. गोठलेली वेळ नाहीच सहन होणार आपल्याला... हो generalise करतेय, कारण ह्या किमान बाबतीत तरी अजून भेदभावाच्या कसोट्या नाहीत... मनुष्य स्वभाव अजून तरी हवा तसा नाही नं मोडता येत.. किमान ह्या बेसिक गोष्टीत तरी...असो.. तर.. तर ह्या वेळेचं थांबणं... का सहन होत नसेल? मी सांगू? म्हणजे चुकीचं असेलही.. पण आपण नं ह्या थांबण्याचा अर्थ सरळ मरणाशी लावतो.. अन घाबरतो...मुळात घाबरणं नं ह्या मरणाला असतं गं , वेळेला नाही.. हो नं? मग विसावायचं का गं ह्या क्षणाशी.. क्षणभर?
.................................................................................................................
पाउलवाटा अशाच तर रेखाटल्या जातात नं ... पावलापावलावर काहीतरी नवीन असतं... टाळता न येणारं अन् म्हणून भिडायला शिकवणारं..कधी उत्सुर्तपणे कवेत घेणारं तर कधी झिडकारणारं..पण नवीन .. कोणाचाही स्पर्श न झालेली पाउलवाट
...........................................................................................................
दरवेळी कारणं असावीच असं नसतं रे.. म्हणजे तू विचारात राहतोस काय झालं ? कोणी काही केलं का ? कोणी काही बोललं का? पण कोणी बोलायची वाट आपण खरंच बघतो का रे ? कधीतरी आपलं मनंच बोलतं आपल्याला आणि विलक्षण दुखावले जातो आपण.. तसं तर मनातलं सगळं आपल्याला ठाऊकच असतं नं.. मी खर्या खोट्याची शहानिशा नाही करणार पण खरं सांगायचं तर हे मनाचे बोलच सगळ्यात जास्त लागट.. म्हणूनच म्हटलं सगळ्याच गोष्टीना कारणं नसावीत आणि असली तरी सांगण्यासारखी नसावीत हो नं
................................................................................................................
शाम की किसी कोनसे आ जाती है रात.. तब याद आते हो तुम.. हाथसे फिसले रेत जैसे वक्त जब दरवाजेपे आके रुक जाता है.. तब याद आते हो तुम.… कही कभी तो ये रात काले बादल ओढ़े आती है.. जैसे कभी तुम आया करते थे.… रंगीन सपने ओढ़े..... ना ये तब बता पायी न अब.… या शायद फिर कभी नहीं.… पर रात की चौखट पे सवेरा अपना पहला कदम रख मुस्कुरा देती है.… तुम अब भी वही उस चौखट पे याद आते हो.……
.....................................................................................................
तळ ढवळला गेला नं कि पाणी गढूळ होणारच रे.. पण म्हणून पाणी वाईट नसतं नं...अवघड असते ती वेळ.. जर ती निवळू द्यावी..वरवरची कील्मिषं निपटून काढावी
अन तो वर्षानुवर्ष जुना गाळ? त्याचं रे काय करायचं? तोही निपटून काढावा? कि बसू द्यावा त्यला पुन्हा तळाशी... असंच कधीतरी ढवळून यायला... हो नं.. बाकी
पारदर्शी मन तसंही नकोच नं...
.........................................................................................
एखाद्या क्षणाचं थबकलेलं असणं स्वीकारू शकतो का गं बयो आपण? म्हणजे असा खास वैगरे नाही.. अगदी कुठलाही क्षण..आत्ता तुझ्या माझ्यात घर करतोय तो किंवा असा पटकन निसटतोय तोही... तिथेच थबकला तर... आपण असे राहू शकतो का गं.. त्या क्षणाशी गोठलेले... कदाचित नाही.. कितीही हवेसे असले तरी थांबलेली.. गोठलेली वेळ नाहीच सहन होणार आपल्याला... हो generalise करतेय, कारण ह्या किमान बाबतीत तरी अजून भेदभावाच्या कसोट्या नाहीत... मनुष्य स्वभाव अजून तरी हवा तसा नाही नं मोडता येत.. किमान ह्या बेसिक गोष्टीत तरी...असो.. तर.. तर ह्या वेळेचं थांबणं... का सहन होत नसेल? मी सांगू? म्हणजे चुकीचं असेलही.. पण आपण नं ह्या थांबण्याचा अर्थ सरळ मरणाशी लावतो.. अन घाबरतो...मुळात घाबरणं नं ह्या मरणाला असतं गं , वेळेला नाही.. हो नं? मग विसावायचं का गं ह्या क्षणाशी.. क्षणभर?
सिग्नलपासून साधारण 100 मी वरचा गाड्यांचा वेग हा बघण्यासारखा असतो... हिरवा दिवा पिवळा आणि पिवळा ते लाल होईपर्यंतची त्यांची धावपळ विलक्षण... पण खरा कस कुठे लागतो माहितेय? सिग्नल लाल होताना योग्य ठिकाणी थांबण्यात... करकचून ब्रेक मारावा लागतो.. धक्का बसतो.. चार शिव्याही निघतात..पण अति घाईत होणारा पुढचा अपघातही टळतो... आपले बरेचसे निर्णयही असेच असतात नं ... नेमक्या क्रोसिंगला थांबलेले... नाहीतर अपघात अटळ
..........................................................................................
उत्स्फुर्तपणे लिहिता लिहिता अचानक शाई संपत कागदावर चर्रर कोरडा ओरखडा उमटावा तसा संपतो एखादा दिवस.. भर दुपारी...
..............................................................................................
इथून तिथून सारंच तसं सारखं असतं.. दिवस अन रात्र त्यामधल्या दुपारसकट...एकेकटी ... धावपळ सगळी फक्त वेगळेपण शोधण्याची अन हे सारखेपण टाळण्याची...हो नं?
............................................................................................
समाधान म्हणजे नेमकं काय असतं गं बयो? खूप दिवसांपासून मेहनत घेऊन आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडते तेंव्हा मिळतं ते? कि ध्यानीमनी नसताना कोणाच्या तरी असण्याने कुठल्या तरी एका क्षणाचं सोनं होणं म्हणजे समाधान?? नाही नं सांगता येत? हम्म... ठाऊक आहे मला.. जसं कोणाच्या असण्यावर.. नसण्यावर... एखाद्या क्षणाच्या त्या घटनेच्या घड्ण्यावर आपला ताबा नसतो नं.. तसच असतं समाधान...
.........................................................................................
पहिला पाऊस पडून गेल्यानंतरचा फुललेला मोगरा काही औरच... आसमंतातल्या प्रसन्न ओल्या वातावरणात मोगऱ्याचा नितळ गंध... हा गंध न ऋतू नुसार बदलतो रे...उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोवळा नाजूक गंध... भर रणरणत्या उन्हाळ्यातल्या तापलेल्या रात्रीचा मादक मोगरगंध...अन हा असा पावसाळ्याच्या तोंडावरचा परतीचा गंध.... समजूतदार.... मला मात्र नेहमी गोंधळात टाकणारा... नुकत्याच उमललेल्या ओल्या मातीच्या मृदगंधाचं स्वागत कि ह्या मोगऱ्याला निरोप...
..........................................................................................
पाउस म्हटलं कि कविता येणार.. नको नको म्हटलं छतावरून ओघळणार्या पागोळ्यांतुन शब्द तळहाती येणार... हाती कॉफीचा मग..त्यात पावसाचा एखादा थेंब.. अन पुढ्यात कुर्कुर्णारी भजी...एक कोरा कागद.. आखीव रेखीव रेघ हरवलेला.. सोबत तितकंच रिकामं पेन..आसुसलेलं... पावसाची शाई करण्याची आयडिया तशी तितकीही वाईट नाही नं... ऐकू येणारा समोरच्या तळ्यातला तो पावसाचा ऑर्केस्ट्रा.. अन त्यात जर पाउस रात्रीचा असेल तर स्ट्रीट लाईट मध्ये रंगलेला त्या सरींचा लाईट शो... पाउस म्हटलं कि ग्यालरीतल्या कठड्याला रेलून उभा ध्यानस्त तू अन तळहाती साचलेल्या शब्दांना मुक्त करणारी मी.. अन नुकत्याच जन्माला आलेल्या ह्या नव्या कवितेसोबत.. आपण...एकरूप..
.................................................................................................
क्षण म्हणजे नक्की काय रे असतं? हे वेळेचं परिमाण म्हणावं तर ह्याचं मोजमाप काय? किती सेकंदांचा, मिनिटांचा, तासांचा एक क्षण? सांगू शकतोस? नाही नं.. मी सांगू? क्षण म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हासोबत सारवलेल्या ओल्या अंगणात उतरलेली भूपाळीची मंतरलेली ओळ... क्षण म्हणजे श्वासांच्या अंतरावर घुसमटलेली अन तरी निसटलेली ती नितळ पावसाची सर... क्षण म्हणजे दव भारल्या धुक्यातली ती गर्भरेशमी ऊब...क्षण म्हणजे... खरं सांगू ? क्षण म्हणजे अनुभव... जिवंत असण्याचा जिवंत असण्याला आलेला जिवंतपणाचा अनुभव !
..........................................................................................
उत्स्फुर्तपणे लिहिता लिहिता अचानक शाई संपत कागदावर चर्रर कोरडा ओरखडा उमटावा तसा संपतो एखादा दिवस.. भर दुपारी...
..............................................................................................
इथून तिथून सारंच तसं सारखं असतं.. दिवस अन रात्र त्यामधल्या दुपारसकट...एकेकटी ... धावपळ सगळी फक्त वेगळेपण शोधण्याची अन हे सारखेपण टाळण्याची...हो नं?
............................................................................................
समाधान म्हणजे नेमकं काय असतं गं बयो? खूप दिवसांपासून मेहनत घेऊन आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडते तेंव्हा मिळतं ते? कि ध्यानीमनी नसताना कोणाच्या तरी असण्याने कुठल्या तरी एका क्षणाचं सोनं होणं म्हणजे समाधान?? नाही नं सांगता येत? हम्म... ठाऊक आहे मला.. जसं कोणाच्या असण्यावर.. नसण्यावर... एखाद्या क्षणाच्या त्या घटनेच्या घड्ण्यावर आपला ताबा नसतो नं.. तसच असतं समाधान...
.........................................................................................
पहिला पाऊस पडून गेल्यानंतरचा फुललेला मोगरा काही औरच... आसमंतातल्या प्रसन्न ओल्या वातावरणात मोगऱ्याचा नितळ गंध... हा गंध न ऋतू नुसार बदलतो रे...उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोवळा नाजूक गंध... भर रणरणत्या उन्हाळ्यातल्या तापलेल्या रात्रीचा मादक मोगरगंध...अन हा असा पावसाळ्याच्या तोंडावरचा परतीचा गंध.... समजूतदार.... मला मात्र नेहमी गोंधळात टाकणारा... नुकत्याच उमललेल्या ओल्या मातीच्या मृदगंधाचं स्वागत कि ह्या मोगऱ्याला निरोप...
..........................................................................................
पाउस म्हटलं कि कविता येणार.. नको नको म्हटलं छतावरून ओघळणार्या पागोळ्यांतुन शब्द तळहाती येणार... हाती कॉफीचा मग..त्यात पावसाचा एखादा थेंब.. अन पुढ्यात कुर्कुर्णारी भजी...एक कोरा कागद.. आखीव रेखीव रेघ हरवलेला.. सोबत तितकंच रिकामं पेन..आसुसलेलं... पावसाची शाई करण्याची आयडिया तशी तितकीही वाईट नाही नं... ऐकू येणारा समोरच्या तळ्यातला तो पावसाचा ऑर्केस्ट्रा.. अन त्यात जर पाउस रात्रीचा असेल तर स्ट्रीट लाईट मध्ये रंगलेला त्या सरींचा लाईट शो... पाउस म्हटलं कि ग्यालरीतल्या कठड्याला रेलून उभा ध्यानस्त तू अन तळहाती साचलेल्या शब्दांना मुक्त करणारी मी.. अन नुकत्याच जन्माला आलेल्या ह्या नव्या कवितेसोबत.. आपण...एकरूप..
.................................................................................................
क्षण म्हणजे नक्की काय रे असतं? हे वेळेचं परिमाण म्हणावं तर ह्याचं मोजमाप काय? किती सेकंदांचा, मिनिटांचा, तासांचा एक क्षण? सांगू शकतोस? नाही नं.. मी सांगू? क्षण म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हासोबत सारवलेल्या ओल्या अंगणात उतरलेली भूपाळीची मंतरलेली ओळ... क्षण म्हणजे श्वासांच्या अंतरावर घुसमटलेली अन तरी निसटलेली ती नितळ पावसाची सर... क्षण म्हणजे दव भारल्या धुक्यातली ती गर्भरेशमी ऊब...क्षण म्हणजे... खरं सांगू ? क्षण म्हणजे अनुभव... जिवंत असण्याचा जिवंत असण्याला आलेला जिवंतपणाचा अनुभव !
मावळतीच्या पाउलखुणा काही तितक्याश्या बऱ्या नसाव्या.. कुठेतरी काहीतरी निसट ल्याची हि बोच कोरत बसते मनाचा कोपरा न कोपरा... एक शोध अखंड मागे ठेऊन जाते हि सांज... शोध परतीचा... शोध ' मी' चा... अंधुकश्या वाटेवरचा अंधुक प्रवास अधोरेखित करणारी मावळण... माझी...
....................................................................................................
त्येकाला एक काठ नेमून दिलेला असतो बयो अन जो तो तिथूनच घेत असतो अंदाज तळाचा.. त्या स्तब्ध डोहाच्या.. प्रश्न इतकाच कि ज्याला तळ गवसला त्याचा काठ कोणता..
..................................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..................................................................................................
खूप बोलायचं असतं बरेचदा ... पण घशातून आवाज मात्र शून्य ... नाही म्हणजे अडखळायला वैगरे नाही रे होत पण ओठांवर उमटलेले शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतील का? हि धास्ती .. भीती नाही रे .. insecurity सुद्धा नाही... फक्त धास्ती.. अन ती ह्या पोहोचू न शकण्याची... धास्ती तुझ्यापर्यंत न पोहोचलेले माझेच शब्द माझ्याकडे परत आले तर हि...पेलवेल का रे ? मीच मला...
...............................................................................................
जसं जन्मापासून कोणी वाईट नसतं तसंच कोणी इतकंही चांगलं नसतं गं बयो... पहिल्यातली गरज अन दुसऱ्यातला स्वार्थ तेवढा समजून घे...
.....................................................................................................
सुंदर सुग्रास जेवणाने सजलेलं ताट समोर यावं आणि नेमका त्यातच एक केस दिसावा.. तसा असतो एखादा दिवस...अन एखादा क्षण त्या केसासारखा... लगेच निपटून काढला तरी मनात रेंगाळणारा... दिवसभराची धावपळ दगदग संपवत रात्र अशी उशाशी आली न कि अनाहूतपणे तो क्षणही येतो... खरतरं इतकं काही नसतं त्या क्षणात...न प्रश्न न उत्तर... पण मन गढूळ करण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच... असे किती साचलेले गाळ.. हे क्षण... किती काळ जपायचे रे
.....................................................................................................
तळ्याच्या काठाकाठाने फिरताना अंदाज घेत राहावा त्याच्या खोलीचा... स्वतःला जपत.. हळुवार सावधतेने पावलं उचलत कुतूहलाने डोकावावं अन अचानक तोल निसटून सरळ तळ गाठावा..बस इतकाच सहज असतो प्रवास .. मनापासून...मनाचा
.........................................................................................................
काहीतरी छान वाचायचं यार.. एखादा छान मूवी बघून जमाना झालाय रे... ए एक छान गाणं ऐकव नं... कितीदा वापरतो आपण हा छान शब्द... पण हे छान म्हणजे नक्की काय हे कळतं का रे आपल्याला कधी... कि नुसताच पाठलाग... मला काय वाटतं माहितेय? छान म्हणजे काय वाईट नाही ह्याची जाणीव... ती जाणीव अनुभवातून निर्माण झालेली.. शेवटी काय.. काय नको हे कळलं कि काय हवंय हे नेमकं कळतं.. नाही का?
............................................................................................................
काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...
....................................................................................................
त्येकाला एक काठ नेमून दिलेला असतो बयो अन जो तो तिथूनच घेत असतो अंदाज तळाचा.. त्या स्तब्ध डोहाच्या.. प्रश्न इतकाच कि ज्याला तळ गवसला त्याचा काठ कोणता..
..................................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..................................................................................................
खूप बोलायचं असतं बरेचदा ... पण घशातून आवाज मात्र शून्य ... नाही म्हणजे अडखळायला वैगरे नाही रे होत पण ओठांवर उमटलेले शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतील का? हि धास्ती .. भीती नाही रे .. insecurity सुद्धा नाही... फक्त धास्ती.. अन ती ह्या पोहोचू न शकण्याची... धास्ती तुझ्यापर्यंत न पोहोचलेले माझेच शब्द माझ्याकडे परत आले तर हि...पेलवेल का रे ? मीच मला...
...............................................................................................
जसं जन्मापासून कोणी वाईट नसतं तसंच कोणी इतकंही चांगलं नसतं गं बयो... पहिल्यातली गरज अन दुसऱ्यातला स्वार्थ तेवढा समजून घे...
.....................................................................................................
सुंदर सुग्रास जेवणाने सजलेलं ताट समोर यावं आणि नेमका त्यातच एक केस दिसावा.. तसा असतो एखादा दिवस...अन एखादा क्षण त्या केसासारखा... लगेच निपटून काढला तरी मनात रेंगाळणारा... दिवसभराची धावपळ दगदग संपवत रात्र अशी उशाशी आली न कि अनाहूतपणे तो क्षणही येतो... खरतरं इतकं काही नसतं त्या क्षणात...न प्रश्न न उत्तर... पण मन गढूळ करण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच... असे किती साचलेले गाळ.. हे क्षण... किती काळ जपायचे रे
.....................................................................................................
तळ्याच्या काठाकाठाने फिरताना अंदाज घेत राहावा त्याच्या खोलीचा... स्वतःला जपत.. हळुवार सावधतेने पावलं उचलत कुतूहलाने डोकावावं अन अचानक तोल निसटून सरळ तळ गाठावा..बस इतकाच सहज असतो प्रवास .. मनापासून...मनाचा
.........................................................................................................
काहीतरी छान वाचायचं यार.. एखादा छान मूवी बघून जमाना झालाय रे... ए एक छान गाणं ऐकव नं... कितीदा वापरतो आपण हा छान शब्द... पण हे छान म्हणजे नक्की काय हे कळतं का रे आपल्याला कधी... कि नुसताच पाठलाग... मला काय वाटतं माहितेय? छान म्हणजे काय वाईट नाही ह्याची जाणीव... ती जाणीव अनुभवातून निर्माण झालेली.. शेवटी काय.. काय नको हे कळलं कि काय हवंय हे नेमकं कळतं.. नाही का?
............................................................................................................
काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...
मित्रा,
हि दिवेलागणीची वेळ आणि रिमझिमता पाउस.. संततधार.. उसंत अशी नाहीच.. तसंही कलत्या दिवसाबरोबर थांबायला तो तुझ्या-माझ्यासारखा चाकरमानी नाही नं..तो मुक्त.. मोकळा.. स्वत:च्या धुंदीत हरवलेला..आपली मात्र धांदल.. सांज आणि पाउस ह्या दोघा साख्यंचा मनासारखा मेळ घालायची धांदल...दिवसभराच्या कामाने शिणलेला देह अन पावसाच्या ओल्याचिंब स्पर्शाने फुललेलं मन.. कशी रे सांगड घालायची? .. ह्या अश्या गडबडीत हे मन नं गावाची वाट पकडतं..
अशा पावसात हटकून गावाकडची संध्याकाळ आठवते.. आषाढ लागला नं कि अचानक एक दिवस संपर्क तुटायचा गावाचा... हे चार महिने गाव म्हणजे स्वत:तच मिटलेल एक स्वप्नं असावं... हिरवंगार स्वप्न.. अन अख्खं गाव ह्या स्वप्नात रमलेलं.. जो तो घरात बंद..कारण बाहेर पडायचं म्हटलं तरी पावसाचा हा पडदा कोणं नं बाजूला सारणार? संध्याकाळ मात्र हे धाडस करायची..वेशीवर उभ्या दिवसाला ओलांडून सांज अंगणात यायची..उंबरठ्यावरून हाक मारत रात्र ओटीत ठेवायची..नेहमीची कलतीची सोनसळी उन्हं नसायची म्हणा सोबतीला, पण न चुकता एखादी लख्ख वीज मात्र देऊन जायची.. इवल्या रात्रीला सोबत म्हणून... देवघरात तेवणाऱ्या मंद नंदादीपाच्या प्रकाशात मग पावसाची सर न सर उजळून निघायची.. आणि शुभांकरोतीच्या सुरात हि सांजवेळ नकळत पसार व्हायची..
मिट्ट काळोख्या रात्री मनभर ऐकलेला तो गावातला पाउस कधी शहरात आलाच नाही रे..
हि दिवेलागणीची वेळ आणि रिमझिमता पाउस.. संततधार.. उसंत अशी नाहीच.. तसंही कलत्या दिवसाबरोबर थांबायला तो तुझ्या-माझ्यासारखा चाकरमानी नाही नं..तो मुक्त.. मोकळा.. स्वत:च्या धुंदीत हरवलेला..आपली मात्र धांदल.. सांज आणि पाउस ह्या दोघा साख्यंचा मनासारखा मेळ घालायची धांदल...दिवसभराच्या कामाने शिणलेला देह अन पावसाच्या ओल्याचिंब स्पर्शाने फुललेलं मन.. कशी रे सांगड घालायची? .. ह्या अश्या गडबडीत हे मन नं गावाची वाट पकडतं..
अशा पावसात हटकून गावाकडची संध्याकाळ आठवते.. आषाढ लागला नं कि अचानक एक दिवस संपर्क तुटायचा गावाचा... हे चार महिने गाव म्हणजे स्वत:तच मिटलेल एक स्वप्नं असावं... हिरवंगार स्वप्न.. अन अख्खं गाव ह्या स्वप्नात रमलेलं.. जो तो घरात बंद..कारण बाहेर पडायचं म्हटलं तरी पावसाचा हा पडदा कोणं नं बाजूला सारणार? संध्याकाळ मात्र हे धाडस करायची..वेशीवर उभ्या दिवसाला ओलांडून सांज अंगणात यायची..उंबरठ्यावरून हाक मारत रात्र ओटीत ठेवायची..नेहमीची कलतीची सोनसळी उन्हं नसायची म्हणा सोबतीला, पण न चुकता एखादी लख्ख वीज मात्र देऊन जायची.. इवल्या रात्रीला सोबत म्हणून... देवघरात तेवणाऱ्या मंद नंदादीपाच्या प्रकाशात मग पावसाची सर न सर उजळून निघायची.. आणि शुभांकरोतीच्या सुरात हि सांजवेळ नकळत पसार व्हायची..
मिट्ट काळोख्या रात्री मनभर ऐकलेला तो गावातला पाउस कधी शहरात आलाच नाही रे..
Subscribe to:
Posts (Atom)