Sunday, October 11, 2015

कोई ख्वाब था शायद , तेरे जाने के बाद मेरे होने का ख्वाब... भला ऐसे ख्वाब कभी सच भी होते है ? और न ही होती है इन ख्वाबोंकी कोई उम्र…… इनसे लम्बी उम्र तो उस कड़कती बिजलीकी थी … पिछले साल बारिश जो तुम्हे अपने साथ ले गयी …… नहीं तो ये ख्वाब .... तेरे जाने के बाद मेरे होने का ख्वाब…दिन दहाड़े ऐसे ख्वाबोंका आँखोंतले पनपना कही उनके सच होने का सबुत तो नहीं .... वैसे भी ख्वाबोंके सच होने का कोई समय नहीं होता और न ही तुम्हारे न होने का… हो सके तो ये वक्त अपने साथ ले जाओ...ये ख्वाब मै रख लुंगी....
.................................................................................................................
पाउलवाटा अशाच तर रेखाटल्या जातात नं ... पावलापावलावर काहीतरी नवीन असतं... टाळता न येणारं अन् म्हणून भिडायला शिकवणारं..कधी उत्सुर्तपणे कवेत घेणारं तर कधी झिडकारणारं..पण नवीन .. कोणाचाही स्पर्श न झालेली पाउलवाट
...........................................................................................................
दरवेळी कारणं असावीच असं नसतं रे.. म्हणजे तू विचारात राहतोस काय झालं ? कोणी काही केलं का ? कोणी काही बोललं का? पण कोणी बोलायची वाट आपण खरंच बघतो का रे ? कधीतरी आपलं मनंच बोलतं आपल्याला आणि विलक्षण दुखावले जातो आपण.. तसं तर मनातलं सगळं आपल्याला ठाऊकच असतं नं.. मी खर्या खोट्याची शहानिशा नाही करणार पण खरं सांगायचं तर हे मनाचे बोलच सगळ्यात जास्त लागट.. म्हणूनच म्हटलं सगळ्याच गोष्टीना कारणं नसावीत आणि असली तरी सांगण्यासारखी नसावीत हो नं
................................................................................................................
शाम की किसी कोनसे आ जाती है रात.. तब याद आते हो तुम.. हाथसे फिसले रेत जैसे वक्त जब दरवाजेपे आके रुक जाता है.. तब याद आते हो तुम.… कही कभी तो ये रात काले बादल ओढ़े आती है.. जैसे कभी तुम आया करते थे.… रंगीन सपने ओढ़े..... ना ये तब बता पायी न अब.… या शायद फिर कभी नहीं.… पर रात की चौखट पे सवेरा अपना पहला कदम रख मुस्कुरा देती है.… तुम अब भी वही उस चौखट पे याद आते हो.……
.....................................................................................................
तळ ढवळला गेला नं कि पाणी गढूळ होणारच रे.. पण म्हणून पाणी वाईट नसतं नं...अवघड असते ती वेळ.. जर ती निवळू द्यावी..वरवरची कील्मिषं निपटून काढावी 
अन तो वर्षानुवर्ष जुना गाळ? त्याचं रे काय करायचं? तोही निपटून काढावा? कि बसू द्यावा त्यला पुन्हा तळाशी... असंच कधीतरी ढवळून यायला... हो नं.. बाकी 
पारदर्शी मन तसंही नकोच नं...
.........................................................................................
एखाद्या क्षणाचं थबकलेलं असणं स्वीकारू शकतो का गं बयो आपण? म्हणजे असा खास वैगरे नाही.. अगदी कुठलाही क्षण..आत्ता तुझ्या माझ्यात घर करतोय तो किंवा असा पटकन निसटतोय तोही... तिथेच थबकला तर... आपण असे राहू शकतो का गं.. त्या क्षणाशी गोठलेले... कदाचित नाही.. कितीही हवेसे असले तरी थांबलेली.. गोठलेली वेळ नाहीच सहन होणार आपल्याला... हो generalise करतेय, कारण ह्या किमान बाबतीत तरी अजून भेदभावाच्या कसोट्या नाहीत... मनुष्य स्वभाव अजून तरी हवा तसा नाही नं मोडता येत.. किमान ह्या बेसिक गोष्टीत तरी...असो.. तर.. तर ह्या वेळेचं थांबणं... का सहन होत नसेल? मी सांगू? म्हणजे चुकीचं असेलही.. पण आपण नं ह्या थांबण्याचा अर्थ सरळ मरणाशी लावतो.. अन घाबरतो...मुळात घाबरणं नं ह्या मरणाला असतं गं , वेळेला नाही.. हो नं? मग विसावायचं का गं ह्या क्षणाशी.. क्षणभर?

No comments:

Post a Comment