मावळतीच्या पाउलखुणा काही तितक्याश्या बऱ्या नसाव्या.. कुठेतरी काहीतरी निसट ल्याची हि बोच कोरत बसते मनाचा कोपरा न कोपरा... एक शोध अखंड मागे ठेऊन जाते हि सांज... शोध परतीचा... शोध ' मी' चा... अंधुकश्या वाटेवरचा अंधुक प्रवास अधोरेखित करणारी मावळण... माझी...
....................................................................................................
त्येकाला एक काठ नेमून दिलेला असतो बयो अन जो तो तिथूनच घेत असतो अंदाज तळाचा.. त्या स्तब्ध डोहाच्या.. प्रश्न इतकाच कि ज्याला तळ गवसला त्याचा काठ कोणता..
..................................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..................................................................................................
खूप बोलायचं असतं बरेचदा ... पण घशातून आवाज मात्र शून्य ... नाही म्हणजे अडखळायला वैगरे नाही रे होत पण ओठांवर उमटलेले शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतील का? हि धास्ती .. भीती नाही रे .. insecurity सुद्धा नाही... फक्त धास्ती.. अन ती ह्या पोहोचू न शकण्याची... धास्ती तुझ्यापर्यंत न पोहोचलेले माझेच शब्द माझ्याकडे परत आले तर हि...पेलवेल का रे ? मीच मला...
...............................................................................................
जसं जन्मापासून कोणी वाईट नसतं तसंच कोणी इतकंही चांगलं नसतं गं बयो... पहिल्यातली गरज अन दुसऱ्यातला स्वार्थ तेवढा समजून घे...
.....................................................................................................
सुंदर सुग्रास जेवणाने सजलेलं ताट समोर यावं आणि नेमका त्यातच एक केस दिसावा.. तसा असतो एखादा दिवस...अन एखादा क्षण त्या केसासारखा... लगेच निपटून काढला तरी मनात रेंगाळणारा... दिवसभराची धावपळ दगदग संपवत रात्र अशी उशाशी आली न कि अनाहूतपणे तो क्षणही येतो... खरतरं इतकं काही नसतं त्या क्षणात...न प्रश्न न उत्तर... पण मन गढूळ करण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच... असे किती साचलेले गाळ.. हे क्षण... किती काळ जपायचे रे
.....................................................................................................
तळ्याच्या काठाकाठाने फिरताना अंदाज घेत राहावा त्याच्या खोलीचा... स्वतःला जपत.. हळुवार सावधतेने पावलं उचलत कुतूहलाने डोकावावं अन अचानक तोल निसटून सरळ तळ गाठावा..बस इतकाच सहज असतो प्रवास .. मनापासून...मनाचा
.........................................................................................................
काहीतरी छान वाचायचं यार.. एखादा छान मूवी बघून जमाना झालाय रे... ए एक छान गाणं ऐकव नं... कितीदा वापरतो आपण हा छान शब्द... पण हे छान म्हणजे नक्की काय हे कळतं का रे आपल्याला कधी... कि नुसताच पाठलाग... मला काय वाटतं माहितेय? छान म्हणजे काय वाईट नाही ह्याची जाणीव... ती जाणीव अनुभवातून निर्माण झालेली.. शेवटी काय.. काय नको हे कळलं कि काय हवंय हे नेमकं कळतं.. नाही का?
............................................................................................................
काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...
....................................................................................................
त्येकाला एक काठ नेमून दिलेला असतो बयो अन जो तो तिथूनच घेत असतो अंदाज तळाचा.. त्या स्तब्ध डोहाच्या.. प्रश्न इतकाच कि ज्याला तळ गवसला त्याचा काठ कोणता..
..................................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..................................................................................................
खूप बोलायचं असतं बरेचदा ... पण घशातून आवाज मात्र शून्य ... नाही म्हणजे अडखळायला वैगरे नाही रे होत पण ओठांवर उमटलेले शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतील का? हि धास्ती .. भीती नाही रे .. insecurity सुद्धा नाही... फक्त धास्ती.. अन ती ह्या पोहोचू न शकण्याची... धास्ती तुझ्यापर्यंत न पोहोचलेले माझेच शब्द माझ्याकडे परत आले तर हि...पेलवेल का रे ? मीच मला...
...............................................................................................
जसं जन्मापासून कोणी वाईट नसतं तसंच कोणी इतकंही चांगलं नसतं गं बयो... पहिल्यातली गरज अन दुसऱ्यातला स्वार्थ तेवढा समजून घे...
.....................................................................................................
सुंदर सुग्रास जेवणाने सजलेलं ताट समोर यावं आणि नेमका त्यातच एक केस दिसावा.. तसा असतो एखादा दिवस...अन एखादा क्षण त्या केसासारखा... लगेच निपटून काढला तरी मनात रेंगाळणारा... दिवसभराची धावपळ दगदग संपवत रात्र अशी उशाशी आली न कि अनाहूतपणे तो क्षणही येतो... खरतरं इतकं काही नसतं त्या क्षणात...न प्रश्न न उत्तर... पण मन गढूळ करण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच... असे किती साचलेले गाळ.. हे क्षण... किती काळ जपायचे रे
.....................................................................................................
तळ्याच्या काठाकाठाने फिरताना अंदाज घेत राहावा त्याच्या खोलीचा... स्वतःला जपत.. हळुवार सावधतेने पावलं उचलत कुतूहलाने डोकावावं अन अचानक तोल निसटून सरळ तळ गाठावा..बस इतकाच सहज असतो प्रवास .. मनापासून...मनाचा
.........................................................................................................
काहीतरी छान वाचायचं यार.. एखादा छान मूवी बघून जमाना झालाय रे... ए एक छान गाणं ऐकव नं... कितीदा वापरतो आपण हा छान शब्द... पण हे छान म्हणजे नक्की काय हे कळतं का रे आपल्याला कधी... कि नुसताच पाठलाग... मला काय वाटतं माहितेय? छान म्हणजे काय वाईट नाही ह्याची जाणीव... ती जाणीव अनुभवातून निर्माण झालेली.. शेवटी काय.. काय नको हे कळलं कि काय हवंय हे नेमकं कळतं.. नाही का?
............................................................................................................
काही गाणी काही सुरावटी वेड्याच असतात नाही.. एखादा साधासाच प्रसंग तर कधी एखादी खासमखास कुणीतरी नकळत विणत जातात त्यांच्या सुरात.. मग भर गर्दीत अगदी कुठूनही नेमक्या कानावर येतात अन् अख्ख्या पब्लिकच्या नजरेत वेडपट ठरवतात रे ..नकळत उमटलेलं एक निसटतं हलकं स्माइल..एक लाजलेली पापणी..उगाचच एक उसासा..तर कधी एक ओघळता थेंब.... अन् सुखावलेलं एक बावरं मन..खरंच येडीच असतात रे काही गाणी .स्थळाकाळाचं भान सोडलेली...
No comments:
Post a Comment