काहीही कारण नसताना एखादा क्षण अचानक अधोरेखित केला जातो… कुठले संदर्भ, कुठले प्रसंग कशाचीच परवा नसलेला हा क्षण न सांगताही ध्यानीमनी जपला जातो.
सामान्यांचं असामान्य असंच होतं नं…
.....................................................................................................
खूप दिवसांनी खूप कौतुक..मन आनंदाने ओतप्रोत.. त्यातूनच चेहऱ्यावर रेंगाळणारा आत्मविश्वास.. आणि डोळ्यात? डोळ्यात तेच निरागस हसू.. ओळखीचं..
...................................................................................................
सोसवेल तेव्हढंच वेडं असावं गं बयो... निसटलेल्या एक एक क्षणाचं हसं व्हायला नाहीतरी वेळ लागत नाहीच हो नं
...........................................................................................................
घरं मोठी होत गेली कि त्यात स्वतःशी स्वतःला जोडले जाण्याच्या जागाही वाढत जातात...आपसूक..
..................................................................................................................
आभाळाला आभाळाचं आभाळ होता येत असेल का रे ?
.............................................................................................................
सवय वाईटच... कोणाच्या असण्याची.. नसण्याची...प्रेम करण्याची ..अव्हेरलं जाण्याची..टाळण्याची .... टाळलं जाण्याची.... टाळलं जाण्याची?ह्याचीही खरंच सवय होते का रे?
...............................................................................
अंधार म्हटलं कि हरवणं येतं ओघाने... पण हि रात्र मात्र हरवलेलं काहीतरी अलगद ओंजळीत ठेऊन गेलीय.. हि जादू अंधाराची कि शांततेची रे... बाहेरचं जग शांत होत गेलं कि आतला कोलाहल ऐकू यायला लागतो.. एकेक आवाज स्पष्ट होत जातो.. सूर सारेच निराळे.. तक्रारीचा, बंडाचा, प्रेमाचा, रागाचा, काळजीचा... उजळ होत जातो अन नकळत विझतही जातो an शेवटी उरतो तो शांततेचा सूर... ओळखीचा..... रात्रीच्या मिट्ट गाभाऱ्यात उमटलेला मीपणाचा सूर.. पवित्र..नितळ सूर माझा...
...............................................................................................
चहुबाजूंनी वेढून येता अंधारालाच घर म्हणावे...
...............................................................................
भर उन्हात निर्मनुष्य रस्त्याच्या पार टोकाला चमकलं काहीतरी... आणि सोबतच त्या माणसाचे डोळे ही... वाट सापडल्यागत... बाईचं चित्त मात्र अजूनही शून्यात.... रस्त्यालगतच्या माळरानाला पिंगा घालणारी नजर... लक्कन चमकलं काही आणि माणूस हपापला.. केविलवाण्या जगण्याला सन्मान मिळावा तसा.. झेपावणार तिकडे इतक्यात.. थबकला... बाईने न बघता ओळखलेले मृगजळाचे भास माणसाला कळायला वेळ गेला इतकचं...
........................................................................................
सामान्यांचं असामान्य असंच होतं नं…
.....................................................................................................
खूप दिवसांनी खूप कौतुक..मन आनंदाने ओतप्रोत.. त्यातूनच चेहऱ्यावर रेंगाळणारा आत्मविश्वास.. आणि डोळ्यात? डोळ्यात तेच निरागस हसू.. ओळखीचं..
...................................................................................................
सोसवेल तेव्हढंच वेडं असावं गं बयो... निसटलेल्या एक एक क्षणाचं हसं व्हायला नाहीतरी वेळ लागत नाहीच हो नं
...........................................................................................................
घरं मोठी होत गेली कि त्यात स्वतःशी स्वतःला जोडले जाण्याच्या जागाही वाढत जातात...आपसूक..
..................................................................................................................
आभाळाला आभाळाचं आभाळ होता येत असेल का रे ?
.............................................................................................................
सवय वाईटच... कोणाच्या असण्याची.. नसण्याची...प्रेम करण्याची ..अव्हेरलं जाण्याची..टाळण्याची .... टाळलं जाण्याची.... टाळलं जाण्याची?ह्याचीही खरंच सवय होते का रे?
...............................................................................
अंधार म्हटलं कि हरवणं येतं ओघाने... पण हि रात्र मात्र हरवलेलं काहीतरी अलगद ओंजळीत ठेऊन गेलीय.. हि जादू अंधाराची कि शांततेची रे... बाहेरचं जग शांत होत गेलं कि आतला कोलाहल ऐकू यायला लागतो.. एकेक आवाज स्पष्ट होत जातो.. सूर सारेच निराळे.. तक्रारीचा, बंडाचा, प्रेमाचा, रागाचा, काळजीचा... उजळ होत जातो अन नकळत विझतही जातो an शेवटी उरतो तो शांततेचा सूर... ओळखीचा..... रात्रीच्या मिट्ट गाभाऱ्यात उमटलेला मीपणाचा सूर.. पवित्र..नितळ सूर माझा...
...............................................................................................
चहुबाजूंनी वेढून येता अंधारालाच घर म्हणावे...
...............................................................................
भर उन्हात निर्मनुष्य रस्त्याच्या पार टोकाला चमकलं काहीतरी... आणि सोबतच त्या माणसाचे डोळे ही... वाट सापडल्यागत... बाईचं चित्त मात्र अजूनही शून्यात.... रस्त्यालगतच्या माळरानाला पिंगा घालणारी नजर... लक्कन चमकलं काही आणि माणूस हपापला.. केविलवाण्या जगण्याला सन्मान मिळावा तसा.. झेपावणार तिकडे इतक्यात.. थबकला... बाईने न बघता ओळखलेले मृगजळाचे भास माणसाला कळायला वेळ गेला इतकचं...
........................................................................................
काय नाकारत असतो आपण हे कधी कधी आपल्यालाच कळू नये रे..कारण ते तेवढ्यावरच थांबत नाही... आणि कारणांचा शोध असा न कळून संपत नाही... नाकारणं तेवढं आपलं आपल्यापुरता.. आपण आखलेलं... कारणांची सक्ती नसलेलं
..............................................................................................
|
No comments:
Post a Comment