आपल्या माणसाची... त्या नात्याची... काळजी वाटण्याचा हक्कही कमवावा लागतो का गं बयो??
..............................................................
छोट्या छोट्या सध्या अपेक्षा बाळगून असतो रे माणूस.. दरवेळी पूर्ण होतीलच असं मागणं नसतंच.. उलट त्यातल्या काही अपेक्षा अवास्तव आहेत हेही कुठे न कुठेतरी मान्य केलं असतं मनाने.. पण तरी दुखावले जातोच नं .. वाईट वाटतंच नं .. ते नाहीच रे नाकारता येत...
सोबत असताना संवाद घडावा हि फार मोठी अपेक्षा नव्हती न रे ?
.........................................................................
नावडतीच्या गोष्टीतही आवडणारं असतंच कि काहीतरी.. फक्त ते ओळखता यायला हवं.. जपता यायला हवं हो नं बयो...
.............................................................................
तू एक निरागस स्वप्न ह्या काजळ काळ्या राती
मी होऊन काजव माळ ते क्षितीज गोंदवत असतो
.............................................................................
माणसाचं अनुभवणं थांबलं कि त्याचा पुतळा व्हायला वेळ नाही लागत गं बयो...
........................................................................
जरासं समजूतदार शहाण्यासारखं वागावं अन समोरून त्याची वारेमाप दखल घेतली जावी इतकं साधं सोपं असतं कौतुक... हवंहवंसं... ह्या अखंड गर्दीत कोणीतरी असं नोटीस करणंच किती खास असतं नं... अन त्यात जर हे शहाणपण नोटीस करणं असेल तर क्या कहना... आपल्या आतलं एक पिटुकलं लहान मुल ह्या कौतुकासाठीच तर जपलेलं असतं... एवढ्याश्या शहाणपणाचं एवढं मोठ्ठं कौतुक... मज्जाच नं
.......................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..........................................................................
ह्याच एका ओळीसाठी जन्म असावा अन तिच्या पाठलागात थेट शेवट व्हावा इतकंच काय ते आयुष्य एका लेखणीचं
.........................................................................
रात्र नं कायम प्रौढ वाटत आलीय..तिला जोडल्या गेलेल्या संदर्भामुळे असेल कदाचित, पण तिचं असणं कायमच समजुतीच्या पातळीवरचं...अल्लड असण्याचा अधिकार तिला नाहीच जणू.. पण तरी.. क्वचित कधीतरी अपवादानेच का होईना एखादी बाल्यावस्थेतील रात्र अचानक सापडते.. निरागस नितळ रात्र.. अवखळ हसू पांघरलेली मोकळ्या माळरानावरची रात्र...मिट्ट काळी रात्र... चांदण्याचं गोंदण, गर्भगार शांतता, गूढ ओढ.. अशा विशेषणांची तिला गरजच नाही...तिला असतं फक्त लाघवी वेडाचं वरदान.. जे ती जपत असते... न जाणो कित्येक युगं लोटली.. पण आजही वयात येण्याआधी एक रात्र अशीच हळवी होते.. हो नं
......................................................................................'
तुटायला नं बयो एक क्षण पुरेसा असतो.. किंवा कदाचित तो saturation point येईपर्यंत आपण दुर्लक्ष करतो.. सगळ्याकडेच... अन हा शेवटचा point... सगळंच संपवणारा... ह्या तुटण्याची intencity नं त्यानंतर होणार्या त्रासावर अवलंबून असावी का गं... तसं असेल तर जोडले गेले होतो कधीकाळी ह्यावर विश्वास तरी कसा गं ठेवावा...
..............................................................
छोट्या छोट्या सध्या अपेक्षा बाळगून असतो रे माणूस.. दरवेळी पूर्ण होतीलच असं मागणं नसतंच.. उलट त्यातल्या काही अपेक्षा अवास्तव आहेत हेही कुठे न कुठेतरी मान्य केलं असतं मनाने.. पण तरी दुखावले जातोच नं .. वाईट वाटतंच नं .. ते नाहीच रे नाकारता येत...
सोबत असताना संवाद घडावा हि फार मोठी अपेक्षा नव्हती न रे ?
.........................................................................
नावडतीच्या गोष्टीतही आवडणारं असतंच कि काहीतरी.. फक्त ते ओळखता यायला हवं.. जपता यायला हवं हो नं बयो...
.............................................................................
तू एक निरागस स्वप्न ह्या काजळ काळ्या राती
मी होऊन काजव माळ ते क्षितीज गोंदवत असतो
.............................................................................
माणसाचं अनुभवणं थांबलं कि त्याचा पुतळा व्हायला वेळ नाही लागत गं बयो...
........................................................................
जरासं समजूतदार शहाण्यासारखं वागावं अन समोरून त्याची वारेमाप दखल घेतली जावी इतकं साधं सोपं असतं कौतुक... हवंहवंसं... ह्या अखंड गर्दीत कोणीतरी असं नोटीस करणंच किती खास असतं नं... अन त्यात जर हे शहाणपण नोटीस करणं असेल तर क्या कहना... आपल्या आतलं एक पिटुकलं लहान मुल ह्या कौतुकासाठीच तर जपलेलं असतं... एवढ्याश्या शहाणपणाचं एवढं मोठ्ठं कौतुक... मज्जाच नं
.......................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..................................................................................
आपलं हक्काचं माणूस असो किंवा त्याच्याशी असलेलं तितकंच हक्काचं नातं...त्यांच्यातलं नेमकं काय जपायचं हे स्पष्ट असावं बयो.. कायम...
..........................................................................
ह्याच एका ओळीसाठी जन्म असावा अन तिच्या पाठलागात थेट शेवट व्हावा इतकंच काय ते आयुष्य एका लेखणीचं
.........................................................................
रात्र नं कायम प्रौढ वाटत आलीय..तिला जोडल्या गेलेल्या संदर्भामुळे असेल कदाचित, पण तिचं असणं कायमच समजुतीच्या पातळीवरचं...अल्लड असण्याचा अधिकार तिला नाहीच जणू.. पण तरी.. क्वचित कधीतरी अपवादानेच का होईना एखादी बाल्यावस्थेतील रात्र अचानक सापडते.. निरागस नितळ रात्र.. अवखळ हसू पांघरलेली मोकळ्या माळरानावरची रात्र...मिट्ट काळी रात्र... चांदण्याचं गोंदण, गर्भगार शांतता, गूढ ओढ.. अशा विशेषणांची तिला गरजच नाही...तिला असतं फक्त लाघवी वेडाचं वरदान.. जे ती जपत असते... न जाणो कित्येक युगं लोटली.. पण आजही वयात येण्याआधी एक रात्र अशीच हळवी होते.. हो नं
......................................................................................'
तुटायला नं बयो एक क्षण पुरेसा असतो.. किंवा कदाचित तो saturation point येईपर्यंत आपण दुर्लक्ष करतो.. सगळ्याकडेच... अन हा शेवटचा point... सगळंच संपवणारा... ह्या तुटण्याची intencity नं त्यानंतर होणार्या त्रासावर अवलंबून असावी का गं... तसं असेल तर जोडले गेले होतो कधीकाळी ह्यावर विश्वास तरी कसा गं ठेवावा...
No comments:
Post a Comment