Sunday, December 15, 2013

..

एक पल की जिंदगी और एकही पल की तो मौत, पता नही इस दौरान लोग जीना कब सिखते है

कौतुकाची शिसारी आलीय का रे तुला कधी? नाही म्हणजे तू केलेलं काम, तुझा आत्मविश्वास, तू लहान वयात यशस्वीपणे पेललेल्या सगळ्या जबाबदार्या.. सगळंच अगदी सगळंच काबिले तारीफ..खरच.. पण.. पण ह्या कौतुकाच्या लाखो क्षणात एक क्षण तरी हेच कौतुक बोचलंच नाही तुला असं नाही नं? कसंय नं वरवर दिसतं ते त्याग,समर्पण, अभ्यास, आणि बरंच काही... पण दिसत नाहीत अचानक आलेल्या जबाबदारीने कायमचे झुकून गेलेले खांदे... घरच्यांचा धीर खचू नये म्हणून एकट्याने रडून घालवलेल्या रात्री... समोरच्या आव्हानांनी दडपून डोळ्यात चमकून गेलेली भीती... कोणी पाहिली? नाही न? मग नाहीच त्यांना अधिकार कौतुक करायचा... ध्येय..करिअर.. सगळं बोलायच्या गोष्टी राव... आणि हो मला माहितेय कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है.. पण काहीही ठरवलं नसताना हातून एका क्षणात अनेक वर्षं ओढुन नेली जातात नं तेव्हा, इवल्याश्या वयातल्या एवढ्या समुजुतदार मनाच्या अखंड कौतुकाची शिसारी येतेच.. तुलापण हो नं?

Ganesh Bagal गणोबाच्या पोस्ट्वरुन डोक्यात हेच काय ते भरभर येत गेलं.. पटेलच असं नाही.. तरी.

लोक एकाचवेळी काय काय करत असतात नं .... काम , छंद, कर्तव्य, आवड.. मस्त सांगड घालत असतात.... आणि आपलं मात्र तेच ते रडगाणं.. वेळ मिळत नाही.... दिवसाचे २४ तास सगळ्यांचे सारखेच नं हो ... तरी रोज चिडचिड आणि ह्यांची हसरी संध्याकाळ... हेवा वाटतो मला सगळं काही मस्त म्यानेज करणाऱ्या ह्या लोकांचा.. श्या जमायला हवं यार हे... क्लासेस असतात का हो ह्याचे कुठे.... हो आणि कौतुकहि वाटतं हं सगळं करून ह्यात काय मोठसं म्हणणार्या ह्या जनतेचं...

टीपकागद हो... बटर पेपर नाही.... भलं बुरं...काहीही.. अगदी काहीही...कशाचाच काही वाटत नाही असं खरच नसतं गं? अगं तुझं अनुभवणं जर थांबलं नाही , तर जगणं तरी कसं थांबेल.. नाही का?

नात्यांमध्ये किती गुरफटून जातो नं आपण..इतकं की त्यापलीकडे त्या व्यक्तीचं माणुस असणं नकळतपणे विसरत जातो..रादर गृहीत धरत जातो..नाही का? खासकरून आई बाबांबद्दल... नेहमीच... हो नं?

Wednesday, November 6, 2013

ए तू कधी ऋतुबदल अनुभवलंय?..रिमझिमणार्या पहाटेची सवय होतेय न होतेय तोच एका पहाटे अचानक हा पाउस जाऊन हलक्याश्या धुक्याने होणारं स्वागत अनुभवलंय? गणपती-नवरात्रीच्या धामधुमीत दमलेलं अन पहाटेच्या गारव्यात शांत गाढ झोपलेलं शहर अनुभवलंय? नाही? मग अनुभव हे.. सगळेच बदल जीवघेणे नसतात रे.... 


Whts on ur mind? हम्म... रोज वाटतं रे ह्या मनाशी किमान एकदातरी संवाद साधावा..विचारावं त्याला की बाबारे हे जे काय मी करतेय ते तुला पटतयं नं... तर्काने घेतलेले निर्णय भावनेला मान्य नसतीलही कदाचित पण त्यात नेमकं काय खटकतंय हे तरी कळावं... पण... हम्म हा पण मध्ये येतोच भीतीचं वावटळ घेउन... अन् मग नाहीच होत धीर मनाची चाचपणी करायचा.....उत्तरं माहीत असलेले प्रश्न नेहमीच असे टाळायचे असतात हो नं?


कहते है भीड का एक चेहरा होता है...और अकेलेपन कि खामोशी... हम्म.. भीड में छुपा सन्नाटा भी कभी सून लिया करो यारो...शायद ये अकेलपन तब बोल पडे...


"ब्रूम ब्रूम"
"झु$$$$$म्म"
"बाबा अजून जोरात चालवा...ब्रूम ब्रूम"
"ये ये... मस्त बाबा.. बाबा आता त्या काकांना मागे टाका.. आपणच रेस जिंकणार"
बाबांच्या स्कूटरवर समोर उभी त्यांची चिमुरडी ...बाजारातल्या गच्च गर्दीत बाबांच्या स्कूटरला रेस लावायला सांगत होती .. त्यांना गाईड करत होती ... जेमतेम ९-१० वर्षांची लेक...अनुभवलंय हे कधी ? स्कूटरच्या पुढच्या चिंचोळ्या भागात आपला इवलासा फ्रोक सांभाळत ताठ उभं राहणं? एका हाताने ह्यांडल घट्ट पकडत दुसर्या हाताने डोळ्यावर येणारे केस सावरणं?दोन्ही बाजुंनी बाबांच्या आश्वासक हातांची साखळी आणि पाठीशी त्यांचं कवच असणं? ... थोडक्यात काय तर जगातली सगळ्यात सुखी, भाग्यवान, (अति)आत्मविश्वासू मुलगी होणं... अनुभवलंय?


कोणी नेमकं कुठे थांबायचं हे एकदा नक्की करायला हवं बयो आता...परतायचं आहेच म्हटल्यावर शेवटाची किमान भीती तरी जाइल गं... आणि निरर्थक तुडवल्या गेल्या वाटेचा कदाचित नवा अर्थही लागेल...सारा जर तरचा खेळ बघ.. पण तरीही थांबायला मात्र हवंय गं बयो आता... थांबायला हवंय


अजनबी?... तुम कहते हो तो बन जाते हैं..अजनबी.. वैसे भी अब जानने के लिये रहा ही क्या है... बस एक आखरी बात... जीन सवालों के गुंचे मे अपनी मासुमीयत समेटे बैठे हो क्या उसी सवालोंके साथ मेरे जवाब भी जोड दोगे?... अजनबी जो बन रहे हैं..कही ये सवाल जवाबोंकी लडी मे फिरसे दिल न अटक जायें..करोगे इतना? अपने लिये?


" घर काय फक्त तिचं आहे? नवरा असला तरी माझाही मुलगा आहे तो"
"अगं पण आपलं ठरलाय नं ह्यावेळी बाहेर पडायचं?"
"म्हणुन काय झालं? आणि रोज भटकतोच कि आपण निरर्थक..आज जरा कणकण होती म्हणूनच थांबले नं?"
"अगं पण तिची अडचण माहितेय नं तुला? क्लास असतो तिचा ह्या वेळात"
"अहो पण म्हणून आपण घराबाहेर का? जाऊ द्या तुम्ही तिचीच बाजू घेणार.. मी आता पुन्हा नाही जाणार त्या घरी.. आजच आपण आपल्या घरी जाऊ"
"कुठल्या घरी?कोणाच्या घरी जायचं गं? मुलाच्या ह्या फ्ल्याटसाठी गावाकडंचं घर विकलं विसरलीस?"सकाळी सकाळी बसस्टोपवर उभी असता कानावर पडलेला हा संवाद..तुटक तुटक ऐकू आलेला.. कारणं माहित नाही पण रोज ठराविक वेळी हे ५०-५५ वयाचं जोडपं न चुकता दिसतं इथे...-----------------------------------------------------------------ऑफिसला जाताना रक्षक चौकात आज जाम गर्दी.. आधीच उशीर झालेला आणि त्यात हि गर्दी.. चिडचिड नुसती.... ट्राफिक मध्ये अडकल्यावर सहज नजर आजूबाजूला वळली.. आणि कुतुहल जागं झालं.. साधारण १८-३० वयोगटातल्या मुलांच्या झुंडिच झुंडी.. खरं सांगते इतकी पोरं एकावेळी कॉलेज नंतर बघितलीच नव्हती..गर्दीचं कारण शोधता कळालं कि पोलिस भरती ची काही परीक्षा आहे... ट्राफिकमध्ये टाईमपास करता करता लक्ष त्या मुलांकडे गेलं... कोण कुठून कुठून आलेलं कोण जाणे.. पाठीवर स्याक...आणि हातात एक फॉर्म.. १००-५०० जागांसाठी २०००-२५०० हजार अप्लिकेशन...-----------------------------------------------------------------काय होतं ह्या डोळ्यात..काका काकुंच्या आणि ह्या हजारो मुलांच्या..अगतिकता.. परिस्थिती... स्वप्न... कि भविष्य... सगळचं अधांतरी...
काही नात्यांचे धागे असतात असेच सुटे सुटे .. एक बाजू मनात बांधलेली.. फार घट्ट नाही.. अन खूप वरवरची पण नाही... बस्स असणं महत्वाचं ठरतं काही नात्यांसाठी..... कधीतरी जुळून येण्याच्या अपेक्षेत आजही सुटीच राहिलेली काही अनामिक,समंजस नाती...

आज माझे बाबा रेटायर्ड होत आहेत... कमीतकमी ३० वर्षांची नोकरी करून.... इथे मला ३ वर्षात कंटाळा आलाय त्याच त्या कामाचा जागेचा... अन बाबांनी ३० वर्ष? कमाल आहे खरच.. सकाळी त्यांना विचारलं कसं वाटतय.. सुट्ल्यासारखं... आता खरी सुरुवात.. राहून गेलेलं सगळं करायची.... काय मस्त फ़िलिंग असेल नं ती.. but still yaar..30 yr job?


Tuesday, August 13, 2013

मासुमियत

बडा ही मासुम लगता था तुम्हारा चेहरा जब कोई अटपटेसे जवाबो के सवाल खो जाने से तुम रो पडते थे... तबसे आजतक ये डर लगा रहता है.... कही उन जवाबोंकी रेलगाडीमे तुम्हारी मासुमीयत न खो जाये...

हाक

अजुन किती काळ तिथल्या तिथेच घुटमळणार आहेस? स्वत: भोवती गोल गोल फिरत अजुन किती खोल खोल रुतायचयं तुला? हाकेच्या अंतरावर असतं रे सगळं पण हाक मारणं आपलं आपल्यालाच करावं लागतं... कधी,कुठे,कसं नाही ठाउक मला... आभाळाच्या पलिकडून तर कधी स्वत:च्याच गाभार्यातुन...पण प्रत्येक हाकेला ओ मिळतोच... बस एकबार  आवाज लगाके तो देखो...

Wednesday, June 26, 2013

उगाचच

खूप मेहनतीने, दमत भागत, अगदी जीव गोळा करुन उंचच उंच शिखराच्या शेवटच्या टोकाशी पोहोचाव अन नेमक त्याच क्षणी पायाखालचा दगड खळकन निसटून पुन्हा पायथ्याशी याव... असच काहीस होतंय..

तिला नं सुगंधाचं भारी वेड... पहाटेच्या दवात न्हालेल्या ओंजळभर पारिजातकाचा केशरी रंग त्याच्या मोहक गंधाबरोबरच तिच्या मनावरही चढायचा... देवघरातल्या धुपाचा , आजी उगाळत असलेल्या चंदनाचा, दुर्वांचा,बेलाचा...कशा कशाच्या म्हणून सुवासाने दरवळलेल्या पहाटघरात ती खुळ्यागत बहरायची....नव्या कोर्या वह्या पुस्तकांचा गंध तसा आता मागे सुटला पण त्याची जागा घेतली ती स्वयंमपाक्घरातल्या सुगंधि खजिन्याने.... ताजी ताजी कोथिम्बिर,लाल तिखट कांदा, हिरवागार कढीपत्ता.. निरनिराळे मसाले.... चरचरीत फोडण्या... कितीतरी हवेसे अन नकोसे वास भरलेली हि खोली...आईच्या मागे मागे फिरता फिरता आताशा तीही रमायला लागली ह्या नगरीत... पण संध्याकालि मात्र जराशी हिरमुसायची ती.. दुपारच्या खरपूस उन्हाच्या गंधानंतर उतरत्या सांजेचा हा उदास आसमंत नाही आवडायचा तिला..रात्रीची मात्र ओढ असायची तिला..त्या रातराणीच्या गंधासाठी...तिच्या सोबत मात्र पुन्हा बहरायची ती... तृप्ततेच्या आनंदाने पुन्हा कळिगत मिटायची ती.. पुन्हा उमलण्यासाठि.. खरचं गंधवेडी होती ती..

एक भलाथोरला वाडा .... मजबूत दगडी बांधकामाचा... त्याच्या पोटात तुळशीवृन्दावानाचा आखीव रेखीव चौक... सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात न्हालेला...त्याच्या चारही बाजूना नुकतीच स्वछ पाण्याने धुतलेली काळ्या कातळाची ओसरि... एकीकडे पितळी कड्यांची बंगइ... अन त्यावर ताजी ताजी चांगली ओंजळ भरून मोगर्याची फुल...
हे असाच काहीतरी एखाद्या फोटोफ्रेमसारख डोक्यात उतरतंय...गेले कित्येक दिवस..

"तुझ्या माझ्या घराघरात वावरणारी गृहिणी म्हणजे मध्यमवर्गीय गार्गीच ना गं? अत्यंत हुशार,कर्तबगार अन तरी संसाराला जखडलेली?" 
काल संध्याकाळी टीव्हीवर कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये ऐकलं हे वाक्य.. हि पुराणातली गार्गी म्हणजे हुशारीचं , बुध्हीमत्तेचं प्रतीक...गुहिणी पण अशीच ना गं? सगळ्याच काही उच्चशिक्षित नसतीलही पण कागदावरच्या डिग्र्यांपेक्शाहि १० पात जास्त काही येत असतं त्यांना.. ८ तास काम करून पगार आणणार्या उच्चपदस्थ मेनेजरइतकच काम हि गृहिणी २४X७ करत असते त्याचं भान तरी असतं का रे आपल्याला ? त्याच्या एवढच शिकलेली असताना ही निव्वळ संसाराची गरज म्हणुन स्वखुशीने ती हे गृहिणीपद सांभाळते तेव्हा तिचा आदर करायचा कि तिला महत्वाच्या निर्णयात डावलय्चं? ... मला मान्य आहे कि बर्याच घरात आता असं चित्र नसेलही ... पण तरी आपल्या आईचा जोब जेव्हा मुलांसाठी गोसिप्चा विषय होतो तेव्हा ह्या गार्गीची घुसमट खुपते...जेव्हा तुझी बायको घरीच असते? ह्या प्रश्नावर नवरा खाली मन घालून हो म्हणतो तेव्हा ह्या हुशारीचा अपमान होतोच..... नाही का?

काल महेंद्र काकांच्या ब्लोग वरची ताजी पोस्ट वाचली.. क्षमा...अजून डोक्यात घुमतेय.. आशय असा होता कि आयुष्याश्याच्या उत्तरार्धात जरा निवांतपण मिळालं की मन भूतकाळात डोकावतं... आनंदाचे, सुखाचे, दु:खाचे, अपयशाचे असे कित्येक क्षण सापडतात तिथे.. अन कधीतरी नकळतच का होईना पण काही क्षण पश्चातापाचेही दिसतात... कदाचित मनाच्या तळाशी ती बोच कायम असतेच.. कधीतरी आपण कुणाला तरी दुखावलेलं असतं... कुणाच्यातरी डोळ्यातल्या पाण्याचं कारण आपण असतो, रागाच्या भरात कोणाचा अपमान झालेला असतो... तेव्हा कळत नाही अन जेव्हा चूक उमगते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.. कधीकधी तर ज्याची माफी मागावी तोच ह्या जगात नसतो..तेव्हा उरते फक्त आयुष्यभराची बोचणी.... ह्या माफीचं खूप मोठं ओझं असतं दोस्तहो... उगाच कोण काय म्हणेल, माझा इगो मला परवानगी देईल का? ह्या भानगडीत पश्चाताप नको नं व्हायला हो नं? आज होळी.. सब गिले शिकवे दूर हो जाये दोस्तो.... बस एक मेसेज, एक काल, या फिर एक मुलाकात.... कुछ पुराने रीश्तोको एक मौका तो देके देखो.... शायद दिल को कुछ सुकून मिले जाये..

गच्ची आणि उन्हाळा

गच्ची आणि उन्हाळा... कूछ खास रिश्ता ही दोस्तो.... रणरणतं उन, घामाच्या धारा,परिक्क्षांचं ओझं.. ह्या सगळ्यात काही मोजक्याच गोष्टीची वाट बघितली जायची.. त्यातलंच एक म्हणजे गच्चीवर झोपणं.. होळी झाली कि सुरु व्हायची आमची भुणभुण आईच्या मागे ... पण परीक्षा आटोप्ल्यशिवाय ती कसली दाद देतेय आम्हा पोरांना..अन शेवटच्या पेपरच्या काही दिवस आधी मग ती आमच्या नकळत गच्ची साफ करून घ्यायची .... नको असलेलं सामान, कुलरचे पार्ट्स , रंगांचे डबे डुबे अंगणात दिसले कि एक हुरूप यायचा.. न त्याच आनंदात शेवटचा पेपर एकदम मस्त जायचा..अन मग सुरु व्हायची तयारी गच्चीवर झोपण्याच्या सोहळ्याची....दिवसभर टळ्टळित उन्हामुळे घरात डांबले गेलेली आमची बच्चेकंपनी उन्हं उतरायला लागल्या बरोबर बाहेर धूम ठोकायची.. मनसोक्त पळापळि झाली कि आमची टोळी गच्चीवर पळायची.... दिवसभर तापलेल्या गच्चीवर पाय भाजायचे पण त्या उत्साहात त्याचं काय? ह्या गरमागरम गच्चीवर मग पाणी शिंपलं जायचं... त्या बिचार्या गच्चीवर कमीच अन आमच्या अंगावरच जास्त असायचं पाणी... हि अशी छान शिम्पलेली गच्ची मग थंड होऊ द्यायची.. तोवर मागच्या अंगणात पाणी मारायचं.. कारण उन्ह्याल्यात रात्रीचं जेवणपण असच मागच्या अंगणात... मस्त अंगात पंगत बसायची... आंबट कैरीसोबत सुरु व्हायचे प्लानिंग रात्री जागवाय्चं.... जेवणं आटोपली कि बाबांसोबत गाद्या गच्चीवर नेण्याचा प्रोग्राम.. इतकेदा खालीवर करून तेव्हा पाय नाही दुखायचे पण.. गाद्या पसरून ठेवायच्या अन चुपचाप खाली यायचं.... आता गाडी वळायची ती आईस्क्रीम कडे..... आईस्क्रीम खाउन होईपर्यंत गच्चीवरच्या गाद्यापण वार्याने मस्त गारेगार झालेल्या असायच्या..... गुडुप अंधार असायचा.. आणि सुरु व्हायच्या भुताखेताच्या गोष्टी.. एकदम होरार अन सस्पेन्स असलेल्या.... गोष्ट ऐन रंगात आली असताना चुकून जिन्यावर जर कोणाची पावलं वाजली तर सोलिड फाटायची एकेकाची...पण तरी पुढे काय हा प्रश्न असायचा.... माहित नाही कसा पण ह्या गोष्टीचा अनलिमिटेड साठा आम्हा प्रत्येकाकडे असायचा..रात्रभर पण पुरेल इतका.. पण खालचं आवराआवर करून आई बाबा गच्चीवर आले कि नाईलाजाने झोपावं लागायचं.. काळ्याभोर आकाशाखाली त्या चांदण्या मोजत मोजत लागलेली शांत झोप आता ए.सीत सुद्धा लागत नाही..

इकडंच तिकडंच

आज सकाळी सकाळी एक साक्षात्कार झाला मला... एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जीजान एक करत असतो.. खूप मेहनत घेत असतो.. पण तरी ती गोष्ट साध्य होत नाही..अस का? तर जी गोष्ट आपण मिळवण्यासाठी धडपडत असतो नेमकी तीच गोष्ट आपल्याला मिळू नये म्हणून कोणीतरी खूप धडपडत असत... बस... कधी तो कमी पडतो तर कधी तुम्ही.. फरक इतकाच कि त्याच्या मेहनतीची,धडपडीची तीव्रता कधी कधी काळात नाही... बाकी Its merely a game of positive and negative efforts... Which part is heavier is result of the game..... So enjoy being in game...

काही नात्यांचे धागे असतात असेच सुटे सुटे .. एक बाजू मनात बांधलेली.. फार घट्ट नाही.. अन खूप वरवरची पण नाही... बस्स असणं महत्वाचं ठरतं काही नात्यांसाठी..... कधीतरी जुळून येण्याच्या अपेक्षेत आजही सुटीच राहिलेली काही अनामिक,समंजस नाती...

गिले ख्वाब यु हथेली पे ना सजा ए राही...क्या पता..अगली हि मोड पे शायद तुफ़ानोसे हाथ मिलना पडे...

कांच के डिब्बीया मे बंद हजारो ख्वाहिशे... दिखाई तो देते है उनके अगिनत रंग....बस मेहसूस नही होता वो उनके होने का एहसास...

उर फुटेस्तोवर पळायचं इथे बस्स.... ध्येय बिय सब झूठ रे..बस रेस में होना मंगता... जिंकणं वैगरे नशिबाच्या गोष्टी बॉस.. पण टिकणं महत्वाचं ... उगाचच आपलं ध्येय गाठायचंय ...मुझे मेरी मंझिल पानी है वैगरे च्या नादात मुळ प्रवाहाच्या बाहेर पडलो नाही म्हणजे मिळवलं रे ..जिवाच्या आकांताने ह्या अश्या पळण्याला जर जगणं म्हणायचं तर कठीण आहे बाबा .... कारण असं पळता पाळता एखाद्या तरी वळणाशी जोरदार कोलमडतोच.. अन अस ठेच लागून कोलमडलं कि जोर जोरात बाहेर येणारा आपलाच श्वासही अनोळखी भासतो म्हणे..सोच लो ...बाकी इस रेस में तो भागना है हि....

एखाद्या व्यक्तीला आपण आदर्श मनात असतो... तिचं वागणं, बोलणं, चालनं.. जस्ट अमेझिंग.. आणि आपल्याही नकळत आपण त्याच्या सारखाच वागत असतो... अन सहजच एक दिवस त्या व्यक्तीबद्दल अस काही काळात कि ती एकदम सामान्य वाटू लागते.. आपल्यासारखीच.. नाही तिचं मोठ्ठं होणं नाही कमी होत... बस तूच सामान्य असणं जाणवायला लागतं.. . पण म्हणून आदर्श बदलतो?

लिहिता लिहिता अलगद घरंगळावा नेमका शब्द अन तरी उमटत जावी एकच अर्थ नसलेली अखंड ओळ...तसा तू... अर्थ नसलेला.. अखंड....तरी अगदी नेमका...

आपण स्वत:च आपली एक वाट निवडतो... खड्तर.. हटके....बिकट..अन अशीच बरीच काहीशी....अगदी जिद्दीने ती वेगळी वाट कापायला सुद्धा लागतो...पण नेमक्या त्याच क्षणी बाजूने कोणीतरी सुळ्ळ्कन आपल्या समोर निघून जातो... त्याच त्या गुळगुळीत झालेल्या,वर्षानुवर्षे सगळ्यांनी वापरलेल्या, प्रत्येक वळणावर गाईड करणार्या वाटेवरून.. काय वाटत हो अश्यावेळी? जेलेसी? पश्चाताप? रेग्रेट? का नेमकं? ध्येय दोन्ही वाटांनी मिळणारच असतं... मग हा नव्याकोऱ्या वाटेचा अटाहास का? वेड ह्यालाच म्हणतात बहुदा... असामान्य लोकांचं समान वेड..(हटके करण्याचा अट्टाहास नाही दादा जिद्द असते... ती नवी कोरी वाट मनाला खुणावते अन tya वाटेने ध्येय मिळतेहि.. पण त्या एका क्शनाचं काय? यशाचे मार्ग बरेच असतात... मग आपला मार्ग नवा असताना चुकीचा तर नाही हा संभ्रम मनात येण चुकीचं तर नाही नं? मला तेच म्हणायचं आहे.... मळलेल्या घासुन्घासून गुळगुळीत झालेल्या वाटेवरुन जेव्हा कोणि आपल्या समोर जातो तेव्हा द्विधा मनस्थिती होणे svabhavik नाही का? हाच क्षण महत्वाचा... बरेच जन तिथूनच परततात न नेमके पुढे जातात)


चांगला भरभक्कम पैसा कमवत असतानाही लोक बेसिक गोष्टींसाठीसुद्धा का कंजुषी करतात? कष्टाचा,मेहनतीचा पैसा वैगरे ठीक आहे हो पण म्हणून लहान लहान गोष्टींसाठीसुद्धा मन मारायचं? का? कशासाठी? ऐशो आराम, चैन कोण करायला सांगताय?बस जे सहज शक्य आहे ते तरी उपभोग... सोबतच्या मित्रालाही द्याव लागेल म्हणून स्वत:साठीसुद्धा चोकोलेत न घेणारे बघितल कि वाईट वाटत..

पुन्हा पाउस

एखादं उनाड, मस्तीखोर पोर असतं नं, खूप दंगा करणारं... त्याची आई अगदी साधी, सोशिक.. अन बाबा आतून प्रेमळ पण बाहेरून खूप कडक, रागीट...आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हे लहानसं पोरगं दिवसभर उंडरत असतं.इकडे जा,तिकडे काहीतरी कर, एक ना दोन असंख्य खोड्या.... पण बाबा येईपर्यंतच हं.. ते आले कि सगळं चिडीचूप... पण आज अचानक काय झालं की बाबा जर लवकरच आले ऑफिस मधून, अन बघतात तो काय,दिवसभर खेळून भटकून कळ्कट्ट झालेला आपलाच मुलगा.. जाम चिडले ते.. तसाच फरफटत परसदारात नेउन.. स्वछ आंघोळ घातली.. सोबत आईला ओरडा होताच असं कसं लक्ष देत नाही म्हणून .... अन मुलाला पण चोप देण सुरूच.. बरेच दिवसांनी लाडक्या लेकाला मनसोक्त आंघोळ घालूनच शांत झाले ते.. 
आज अचानक आलेला मुसळधार पाउस मला असा दिसला.. आभाळबाबा अन धरणीमायेचा लेक हा निसर्ग मस्त चकाचक झाला.. घाबरला होता तोही जरा.. अवेळी आलेला बाबा नं.. अन पार्श्वभूमीला आभाळबाबाचा गडगडाट अन विजांचा मार होताच भीती घालायला... आई मात्र हासता होती.. दिलखुलास..

asach

तुला माहीतेय,एकवेळ अशी होती की कळपाच्या बाहेर राहून जीव घुसमटायचा माझा..सतत कोणाचीतरी सोबत हवी असायची...एकटं पडण्याची भीती ठोका चुकवायला पुरेशी असायची ... अन आता....आता शोधत असते पळवाटा .. गर्दीत असली नं की श्वासही असहकार पुकारतात हल्ली...तो मीपणाचा कोष आजकाल वरचेवर पुन्हा पुन्हा खुणावतोय... परतावं का मी ?

मला नं हा असा पाउस पण आवडतो... नुसता ऐकु येणारा...काळ्याकुट्ट अंधार्या रात्रीचा काजळकाळा पाउस... डोळे बंद करुन फ़क्त ऐकत राहावी ही... निसर्गाची रागदारी...

गिली मिट्टी की सौंधी खुशबू में लिपटे ऐेसे कई अनगिनत ख्वाब युंही बिखेर जाती है बारिशें..हरसाल... चलो इस बार उन्ही ख्वाबोंके कुछ बीज उसी गिली मिट्टी मे बोके देखते.. ख्वाहींशोंकी फसल शायद इस साल अच्छी आ जाए...

सरळ साधं सुतासारखं नातं अधुनमधुन डोरावणार्या गाठींशी अडकायला लागलं नं की संपतच रे सारं.. नंतर सुरू असतो फक्त लपंडाव.. मुखवट्यांचा..आपलंही तसंच काहीसं झालयं का रे?

देवा

देवा,
कसा आहेस बाबा? ठीक नक्कीच नसशील.. तेव्हढा दगडाचा नाहीस नं अजून तू... तुझ्याच त्या केदारनाथात काय चाललाय दिसतंय नं रे तुला? तुझ्या दर्शनासाठीच आले होते हजारो लोक देशाच्या कानाकोपर्यातून... तरी बघतोय नं त्यांचं काय झालाय? किती लोक त्या मलब्याच्याखालि समाधिस्थ झालेत तुला तर ठावूकच असेल... असो... जाब वैगरे नाही विचारायचा तुला... आणि विचारायचा तरी कुठल्या तोंडाने विचारू रे? आमचीच कारणी आम्हाला भोगावंच लागेल नं.... तरी मला सांग तू नेमका राहतोस कुठे रे? म्हणजे लहानपणापासून आम्हला शिकवाल जातं कि देव ( म्हणजे तू) सगळ्यांमध्ये असतोस. देवळात असते ती तुझी फक्त मुर्ती.. संकटात तू मदतीला येतो म्हणे ते पण मानवी रूपातच बहुदा.. म्हणजे असं सगळे मोठे लोक सांगायचे...मग तरी केदारनाथला असं का झालं? देशभरातल्या काही मोजक्या ठिकाणी तुझं वास्तव्य कसं रे? आणि मोजकं म्हणून तिथे वाट्टेल तशी गर्दी... भक्तीला ना नाही रे.. पण हि अशी अघोरी भक्ती? तुझा जीव नाही का रे घुसमटत.... असेलच म्हणा.. निसर्गात रमणारा तू.. त्याचीच नासधूस करून आम्ही तुझ्या घरांचा बाझार मांडला... तुझा राग साहजिक आहेच.. आज त्या अलक्नंदचा प्रवाह जागोजागी अडवला म्हणून ती बेभान झाली .. वाट फुटेल तिथे पळाली ... ज्या हिमलायाचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे त्यालाच कोरून कोरून आम्ही पोकळ केलाय .. चुकतोच रे आम्ही..पुन्हापुन्हा .... मरणांचही राजकारण करणार्यांची जात आमची ... अख्खा हिमालय प्लस्टिक्ने झाकायला कमी करणार नाही हे लोक...निसर्ग जपणाची तुझी साधी इच्छा कळत का नाही रे आम्हाला ? 
जाऊ दे सोड .. तू तरी कोणाकोणाला सुधरवणार? असो.. जे झालं ते झालं... paN निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तुझ्यावर पुन्हा अशी अघोरी वेळ न येओ हेच मागणं.. पुन्हा

Wednesday, May 29, 2013

Bayo


बयो..,
          किती अन कशाकशाच भांडवल करशील आता ? प्रत्येक घटनेमागची कारण शोधता शोधता एक दिवस तूच विस्मृतीत गेलेली घटना होशील गं... हे सुख दु:खाचे हिशोब असे नाहीच गं सुटत...उगाच कमावल्या गमावल्याच्या निरगाठी वाढण्याचीच शक्यताच जास्त त्यात...आणि अस अंधारात तरी किती दिवस काढायचे, सवय होईल बघ त्याचीच.. अन मग मुठभर कवडश्याची सुद्धा भीती वाटायला लागेल तुला... ऐकते आहेस न गं? तूच सांग मागून कोणाला काय मिळालायआजवर..अन इथेतर तुझा थेट दावा त्या विधात्याशी.... उत्तर नासलेल्या प्रश्नाचं नशीब का तुला ठावूक नाही बयो? कोश तोडण्यापेक्षा तो जपन अवघड..हो नं? पटतंय नं गं?
          शेवटी तू काय मी काय... संदर्भ बदलले तरी आपली माती एकच गं बयो...तुझी घुसमट कळतेय ती त्याचमुळे... पण तरी आपण वेगळ्या अन वेगळेपण जाणवत ते आला क्षण आपण कसा झेलतो ह्यावरून... मुक्तहस्ते 'तो' देतच असतो..आपली ओंजळ कशाने भरायची हे मात्र तुझ तूच ठरवायचं बयो... करशील एवढं?
--------------------------------------------------------------------------

गं,
          मला बयो म्हणालीस आता तुला काय संबोधु.... सखी, मैत्रीण, आई, माई, ताई, लेक, नात..तू नक्की आहेस तरी कोण ? म्हणून गं.... खूप अनोळखी भासतेस गं आज तू.... कि आज खरीखुरी ओळखतेय तुला? 
          किती अलगद बोलून गेलीस कोश जप म्हणून.. इतकं का सोप्पय गं ते? आणि आजवर वेगळं तरी काय केलंय मी? तेच तर जपत आलेय.. पण त्याच कोशाच्या गच्च बंद दाराआड आताशा घुसमट जाणवते गं... कळत नाही कशाची पण भीती दाटतेच...उत्तर शोधायचा सोस नाहीच गं..अन प्रश्न कारणं शोधण्याचा नाहीच मुळी... पण नेमक चुकलं कुठे हे तर शोधायला हवं नं.. तेच तर करतेय वर्षानुवर्ष.. पुन्हा नव्याने चुकत..
       एक मात्र खरच जाणवतय मला... माझच अनोळखी अस्तित्व.. सहज म्हणून भूतकाळात डोकावायची सुद्धा हिम्मत नाही गं आता.. पाय रुतला तिथेच तर... नुसत्या विचारानेच धडकी भरते

गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधीमी कशी होते मलाही आठवावे लागले

आठवतात का गं ह्या ओळी भट्साहेबांच्या....हम्म.. बाकी काय सांगु? तुला कळतच सारं... एकच नं गं आपण... तरी एक सांगु? आलेला प्रत्येक क्षण झेलायचा खूप प्रयत्न केला गं मी ...पण फाटक्या ॐजळिचं प्राक्तन माझं... कसं गं साठवायचं जगणं?
----------------------------------------------------------------------------------

बयो,
          पुढे लिहू कि नाही ह्या संभ्रमात आहे..तुला पटेल की नाही..रुचेल कि नाही. अन मुख्य म्हणजे मला तुझं भोगणं कमी करायचं आहे वाढवायचं नाही..तरी लिहितेय
         तर बयो, तुला माहितेय बयो म्हणजे काय? बयो म्हणजे हाक बाईपणाची.. ती तुला मला वेगळी अशी नाहीच मुळी. ती आहे आपल्यातल्या तिला...स्वत:च बाईपण न उमजलेल्या (किंवा नाकारलेल्या म्हणूया का गं ?) तिला.. म्हणून बयो..
        चल एक गम्मत सांगते तुला... एक नं अट्टल गुन्हेगारी कैदी असतो, जन्मठेपेची शिक्षा झालेला.... खूप वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्या वागणुकीत बराच बदल होतो.. अन म्हणून त्याला सोडून देतात.. पण गेले कित्येक दिवस बाहेरच्या जगाशी संबधच नसलेला तो ह्या गर्दीत भांबावून जातो..स्वच्छ सुर्यप्रकाशाही त्याला दिपवून टाकतो .. जो तो त्याच्याकडे अनोळखी नजरेने बघत असतो.. घरी येतो तर बायको, मुलगा झिडकारतात त्याला... त्याच्यातला बदल, चांगुलपणा सहन नाही होत त्यांना... मग काय.. तो बिचारा कैदी.. हताश निराश पुन्हा तुरुंगाकडे परततो... आहे कि नाही गंमत?हम्म..बयो तुझं तसं होऊ नये म्हणून सांगतेय.. अंधाराची सवय नको गं... अन असं स्वत:च्या कोशात जबरदस्तीने गुरफटत गेलं तर त्याचं सूरवंट तरी कसा गं व्हायचं ?  अगदी उत्तुंग भरारी एका झेपेत नसतेच गं जमत.. पण निदान पंख पसरायला तर शिक...
        कोणाची तरी आई, बहिण, बायको, सून, मुलगी असण्यापेक्षा तुझं बाई असणं जास्त महत्वाचं नाही का गं?फाटक्या ओंजळीच्या बाता करतेस पण त्या सांधाय्चा प्रयत्न तरी कर... जास्तच बोलून गेले का गं? नियती तरी कुठे कमी बोल लावते गं .. ..
-------------------------------------------------------------------------------------

गं,
          काय म्हणू मी तुला ? काय हा वेडेपणा चाललाय ? आणि मीही शतमूर्ख .. हे सगळं वाचतेय.. का ? काय तर म्हणे पंख पसरून उडायला शिक.... भरारी घे.. .. वाचण्याच्या नादात मला पण पटलं गं ते अन म्हटल उघडावे आपलेही पंख ...पण.. वळून पाहता दिसल्या फक्त छाटल्या गेल्यानंतरच्या भळ्भळत्या जखमा...भरारी घ्यायला पंख कुठे गं माझे ? सणसणुन कळ उठली काळजात ... का अश्या खपल्या काढतेस गं ? जिथे जन्मण्याच्याच हक्क नाही तिथे उडण्याचा अधिकार तरी कसा गं असणार हे का ठावूक नाही तुला ? पंख म्हणजे काय हे हि विसरलेय बघ मी आता.... तुला सांगते लहान होते नं तेव्हा खूप स्वप्न होती गं माझी... रंगबिरंगी आकाशात मोकळं उड्ण्याचं हि त्यातलाच एक....निळ्याभोर ढगांआडचं इंद्रधनुष्य आणायचं होतं मला... दादाच्या शाळेच्या पुस्तकात दिसायचं तसं पिवळधम्म उन अन रिमझिमणारा पाउस घ्यायचा होता मिठीत...... पण कसचं काय... जाऊ दे..जे आहे ते असाच स्वीकारलाय मी... बाईपणाची लाज नाही गं सवय झालीय मला आता.... पण तरी एक विचारू?
                  आकाशाचा रंग अजूनही तसाच आहे का गं?निळाभोर अस्मानी?
----------------------------------------------------------------------------------------------------------------

बयो,
          अगं तुला कळतय का, तुझ्या पोस्ट्कार्डाचं आता अंतर्देशीय पत्र झालाय....चला हे हि नसे थोडके... वाट मिळायचीच देरी कि पाझर फुटतोच बघ ... खूप बरं वाटतंय आज..पण तरी अस्वस्थ मन ..तुझे प्रश्न घरं पाडतात गं काळजाला...किती अन काय काय भोग गं हे तुझे..
        खरय तुझं भरारीच्या बाता मारतेय पण पंख कुठेत गं आपल्याकडे? बाईपणच्या जखमाच तर सांभाळतोय जन्मल्यापासून... किती लहान असतानापासून हे संस्कार घडताहेत गं आपल्यावर? मुलीच्या जातीने असं करायचं नाही, तिने इथे जायचं नाही.. सातच्या आत घरात.... कपड्यालत्या पासून ते अगदी खेळ्ण्यापर्यंत हेच ते बाईपण सतत आदळत राहिलं गं अंगाखांद्यावर.... तसं बघायला गेलं तर कमी पण नाही केलं काही..जेवणखाण, कपडेलत्ते, खेळ्भांडी .. अन हो शिक्षण सुद्धा.. लग्नाच्या बाजारात ते महत्वाचं म्हणून... मिळालं नाही ते फक्त माणूस म्हणून जगण्याचं स्वतंत्र्य.... हम्म.. तसंही स्वत:चे हक्क कधी मागितले गं आपण ? त्यात हा हि एक तसाच .. न मिळालेला ...
       कंटाळलिस नं? तेच ते जुनं पुराण ऐकावतेय नं मी? नवीन काय त्यात? ...हम्म.. खरय .. आहे जुनंपुराणं हे पण तरीही ते वर्तमान आहे बयो. अन तेच खुपत .. आजूबाजूला नजर टाकलीस नं तर दिसतील हजारो अश्या बयो आजही .. बंद दाराआड स्वत: ला बंदिस्त करून घेतलेल्या .. अन ह्या अश्या दारावर थाप पडली माझी तर काय होईल गं? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव इतकी बोचरी असते का गं?
--------------------------------------------------------------------------------------------------------

गं,
            दरवेळी कसे गं तुला इतके तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात? बाईमाणसाला नसावी गं इतकी उठाठेव प्रश्नांची... मुळात ह्या प्रश्नांची उत्तर शोधायला आपला परीघ तरी कुठेय हक्काचा? आपण सगळ्या बांधल्या गेलेलो त्या एका केन्द्रबिंदुशी..हम्म ..पण तो मात्र प्रत्येक वळणावर बदलत जातो.. बाप, भाऊ, नवरा, मुलगा झालंच तर नातुसुद्धा... आपला परीघ मात्र त्यांच्या त्रिज्येत....अन मोडायचं म्हट्लं तरी वर्तुळ कुठे गं मोडता येतं... साधं चौकटीबाहेर पाय टाकायची हिम्मत नाही। बाईपणाची त्रिज्या कशी गं वाढवायची?
          तू विचारतेस ह्या बंद कवाडावर तुझी थाप पडली तर काय होईल? माझं काय झालयं ते तर पाहतेच आहेस नं.. तेच होणार.. पहिल्या थापेसारशी जिवाचा थरकाप.. अन दुसर्याच क्षणी आशेचा किरण.. कोणीतरी काढेल बाहेर ह्या अंधार कोठडीतून... मदतीच्या हाताच्या नुसत्या कल्पनेनेच फुलारतो गं जीव.. अस्तीवाची दखल घेतली जाण्याची ती पहिली पायरी... पण त्याचवेळी आठवते तुझ्या कैद्याची गोष्ट... अंधार कोठडीत राहिल्यावर सुर्यप्रकाशाला घाबरणार्या कैद्याची गोष्ट.. आपलं ही तसचं नाही का गं.. रूढी परंपरा,घर कि इज्जत, खानदान का नाम... हे सगळं कैदेहून काय वाईट गं? पाय अडकतो तो इथेच..
       तरी तुला वाटतं मी कारणं देतेय? माझ्या ह्या कैदेला मी स्वत:च ओढवलाय ? मला मुक्त व्हायचाच नाहीये? ... अंधाराची सवय बरी नाही हे का मला पटत नाही गं... पण निदान इथेतरी माझं मीपण गवसतं हाच काय तो आधार.. तूच म्हणाली नं अस्तित्वाची जाणीव बोचरी असते म्हणून? मग ते नसलेलं काय वाईट?
                   भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
                   एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
    भट्साहेबांच्या ह्या ओळिपेक्षा वेगळ सांगु तुला? अंधाराच्या काळ्या रंगातही शेवटी बरेच रंग असतात हा शोध लागलाय मला..

Friday, March 22, 2013

आदर.. कितीदा मनापासून अन कितीदा सामाजिक दडपणातून? मुळात आदर हा कमवावा लागतो न.. बरेचदा शारीरिक वर्चस्वाने निर्माण होणारा आदर म्हणजे भीती असावी. अन मानसिक किंवा बौद्धिक आदर? हम्म तो तरी खरा असावा... शाळेत असतांना शिक्षकांचा,मोठ्या व्यक्तीचा आदर करा अस शिकवलं जायचं..पण ह्याच शिक्षकांचा आदर आपण भीतीपोटीच करायचो न....आणि आज त्याच आठवणी नकळत नतमस्तक व्हायला लावतात... आदर डेव्हलाप व्हावा लागतो खरतर नाहीतर उरते फक्त चमचेगिरी....
नात्याचही मोठं विचित्र असतं.. जितकं घट्ट पकडायला जावं तितकं निसटतं जातं..मुठित जीव गुदमरत असावा त्याचाही... कधी कधी वाटतं असं घुसमटण्यापेक्षा मुक्त करावं ह्या नात्याला.. घेउ द्यावा त्यालाही एक मोकळा श्वास...मनाला समजावत जातो मग आपण.. खरतरं एखाद्या गोष्टीची सवय केव्हाही वाईटच.. हो अगदी नात्याचीही.. हे मनही मोठं वेडं असतं.. अश्या जSSSरा दुर गेलेल्या नात्यांची सवयही मोडायला मोठं नाटकं करतं.... आपण सवयीचे गुलाम हेच खरं.. चला मोठ्या प्रयासाने मनाला समजावलं पण की बाबारे आता त्या व्यक्तीची सवय तु मोडायची... पुन्हा नाही असं अडकायचं आता.. तर नेमक्या त्याच हळव्या क्षणी हे हरवलेलं नातं परत येतं.. आणि हसतं आपल्या वेडेपणावर..... म्हणतं आपल्यालाच, वेडाबाई असं कसं गं आपलं नातं बदलणार.. बदलते ती परिस्थिती.. आणि कदाचित वेळही.. पण म्हणुन खरी नाती का अशी दुरावतात... खरं सांगु तेव्हा स्वतःच्याच वेडेपणावर एकाच वेळी रागही येतो अन् हसुही... खर्या खुर्या माणसांशी जोडलेल्या नात्यावरचा विश्वास उडु नये कधी हेच खरं..

भिंगरी

"काय की नुसत्या भटकत असता. आज ह्या शहरात उद्या त्या शहरात.. पायाला भिंगरी लावलीय जशी." इति आज्जी 
"अगं आजी कामं असतात गं, मिटींग साठी जावंच लागतं" मी 
" हो हो माहितेय मोठी कामाची ते.. आमच्यावेळी नव्ह्तं असं" आजी थोडी वैतागून अन थोडी काळजीत निघून गेली.. मला मात्र प्रश्न, कस काय आजीच्या काळात लोकं वर्षानुवर्ष एकाच गावी राहायचे? बाहेरच्या जगात काय चाललय ह्याचं काहीच सोयारसुतुक नसावं त्यांना? दळणवळणाची साधनं कमी होती, प्रसारमाध्यम कमी.. मान्य.. पण उत्सुकता पण कमी? नाही नं? आज आपण अगदी कमी वेळात जगाच्या ह्या टोकावरून त्या टोकावर जातो तरी असे अनेक भाग आहेत जिथपर्यंत माणसाचे पाय पोहचले नाहीत.. त्या भागातल्या लोकांचंही आयष्य असंच असेल मर्यादित? आपल्या पल्याडही एक जिवंत जग आहे ह्याची त्यांना जाणीव असेल? की ते ही आजी-आजोबांच्या काळात वावरत असतील अजूनही? हुश्श.. विचार विचार फक्त विचार..आजीला मात्र आता समजावून सांगावं लागेल ह्या भिंगरी लागल्या पायाची गरज..

देवराई

देवराई ... गर्द हिरव्या झाडांची ...टपटपणार्या थेंबांची.. जाळीतून पाझरणार्या हलक्या ओलसर प्रकाशाची ...देवराई.... सिनेमाचा नायक म्हणतो, आपलं मन सुद्धा एक देवराई असतं...वरवर दिसताना सुटं सुटं पण आत खोलवर मुळाशी एकसंध.... मुळात सिनेमाचा विषय आहे schizophrenia... खर्या आणि आभसी दुनियेच्या सीमेवर रेंगाळत ठेवणारा मनाचा एक विकार... ह्म्म....देवराई म्हणजे पण असचं नं....गर्द हिरव्या छताखाली वसलेलं गंधांचं,रंगांच,स्पर्शांचं आभासी जग.... खर्या खुर्या जीवांना वेडं लावणारं....
कृष्ण वाचताना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या स्त्रिया मनात नकळत घर करून जातात...राधा,द्रौपदी,कुंती... आणि रुक्मिणी? महाराणी रुक्मिणी..द्वारकेची राणी... कृष्णावर निस्सीम प्रेम करणारी.. भर स्वयंवरातुन पळवून आणलेली रुक्मिणी.... मला नेहमी प्रश्न पडतो की रुक्मिणीला राधेबद्दल काय वाटत असेल? कुतूहल? की असूया? कणखर, यादवराज जिच्या फक्त उल्लेखाने हळवा होतो त्या राधेचं नेमकं काय चित्र असेल रुक्मिणीच्या मनात?

रारंगढांग

रारंगढांग...उंचच उंच, आभाळाला भेदणारा नितळ अवाढव्य कातळ....ह्या हिमालयातल्या रारंगढांगातुन रस्ताबांधणीची कथा म्हणजे रारंगढांगाची कथा... पाहिलं तर साधं सोपं अन पाहीलं तर प्रचंड गुंतागुंत.. हिमालय म्हटलं की, पांढर्या बर्फाने आच्छादलेले शिखर, रो रो आवाज करत वाहणार्या नद्या, अप्रतिम सौंदर्याने नटलेला परिसर, पण हिमालय म्हणजे अजुन बरंच काही .. सततची बदलती हवा, क्षणाक्षणला रंग बदलता लहरी निसर्ग, जीवघेण्या दर्या हा सुद्धा हिमालयच...ह्या अश्या टोकाच्या बदलांचा मानवी मनावर होणारा परीणाम म्हणजे रारंगढांग.. अन ह्या रारंगढांगाला फोडुन त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द घेऊन ह्या हिमालयात पहिल्यांच आलेला एक सिविलियन ओफ़िसर विश्वनाथ ह्या कथेचा नायक.. सैन्याची शिस्त, अधिकारांची अरेरावी, दरिद्री पण प्रामाणिक तिबेटी कामगार , बेभरवश्या निसर्गाची भीती..सगळ्यांवर मात करत काम पुर्ण करण्याची कहाणी म्हणजे रारंगढांग.. पण ह्या व्यतिरिक्त राहतच काहीतरी, ग्यानचंद म्हणतो तसं " साब ,जब आदमी मर जाता है तो उस का क्या रहता है?... त्या माणसांची राहते फक्त यादगारी.. रस्त्याच्या कडेला फक्त एक सफेद चौथरा..ह्या एका फर्लांगात असे किती तरी चौथरे दिसतील साब..साब हम इतने भी बुजदिल नही। जंग हम ने भी देखी है... पण साहेब लढाईत समोरच्याच्या हातात बंदुक असते तशी आपल्या ही हातात असतेच नं तो तरी मरेल कीवा आपण तरी, पण...पण इथे तर रोजचीच लढाई.. कुठल्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं... कुठुन तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल , बसल्या जागी खेळ खल्लास.. दरडीचं कोसळणं , लण्ड स्लाईड, ब्रेक फ़ेल..काहीही होउ शकतं... एखाद्या वळणावर म्रुत्यु तुमची वाट बघत उभा असेल..पटकन गाडीत चढेल, तुमच्या बाजुला बसेल ,काहीवेळ प्रवास चालु राहिल अन पटकन तो म्हणेल," चलो दोस्त, टाईम खत्म हो गया" आणि मग काय उरतं मागे? चबुतरा...सतलजच्या काठाशी?"

संवाद

संवादाची किती हाव असते रे मनाला...कधी माणसांशी, कधी निर्जीव वस्तूंशी ,तर कधी चक्क स्वत:च्या मनाशी... जरा कुठे संधी मिळाली कि भरकटण आलच...पण तरी गर्दीत जीव गुदमरतो..मग मला सांग ह्या संवादाची नेमकी व्याख्या तरी काय? जे सभोवताली आहेत त्यांच्याशी एका लिमिट नंतर बोलताच येत नाही रे...अस का व्हाव?आणि हे अस बोलन खुंटलं कि घुसमट वाढते..सतत मनावर काही न काही उमटत असत... भल बुर काहीपण..अन हे काहीपण कोणाला तरी सांगून तपासून बघायची असते मनाची लवचिकता ...पण हे तपासून बघन हि योग्य ठिकाणी असायला हव न? गर्दी खुपते ती इथे.. अन साचत जात सगळ तळाशी.. जीव अडकतो तो इथे....माणसाने प्रक्टिकल असाव म्हणजे असे प्रश्न बोचत नाही म्हणे ... हम्म.. संवेदना माराव्याच लागतील आता बहुदा...

प्रिय मित्रा,

प्रिय मित्रा,
खरंतर लाडक्या म्हणणार होती, पण तुझ्या बाजूच्या 'तीचे' अन माझ्या बाजूच्या त्याचे वटारलेले डोळे आठवले आणि प्रिय वरच थांबले.. हो हो तुझ्या डोळ्यात दिसतेय मला उत्सुकता, आता पत्रात बित्रात वगैरे काय लिहितेय हि पोरगी? पण खरंतर तुला कळलय माझ्या मनातलं.. हे पत्र वगैरे फक्त सगळं तपासून चाचपून बघण्याचा जरिया रे .. 
हम्म.. तर कधीपासूनची ओळख आपली? बालवाडी( हो तेव्हा तेच होतं नं)? की ५वि तली रे ? बघ आता तर आठवत पण नाही.. हो पण एक आठवण मात्र ताजी आहे हं अजून.. एक नवीनच फ्याड काढलं होतं आपल्या हेड बाईंनी, काय तर म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी असे एका बेंचवर बसा त्यामुळे मुलं दंगा कमी करतील( यड्च्याप इय्डीया).. अन तू आलास नं माझ्या बाजूला. आम्हा मुलीचा ग्रुप चार टोकाला चार असा विभागाला गेला त्यामुळे नाईलाजनेच तुझ्याशी बोलणं आलं.. बाईचं डोकं सोलीड हं.. खरच वर्ग काही दिवस शांत होता.. पण त्या काही दिवसात मला मात्र मित्र मिळाला.. आजवरच्या माझ्या नात्यांच्या परिभाषेत एक नवीन नातं....परीक्षा अभ्यास ह्या चक्रात कधी १०वी आली कळलंच नाही... शाळा सुटणार ह्या हूरहुरीसोबतच आता हे मित्र मैत्रिणी असे रोज भेटणार नाहीत ह्याची घालमेल जास्त होती हो नं ?...
शाळा संपली अन कोलेज आलं.. पहिल्या दिवशी तू नव्हतासच सोबत माझ्या...थोडी घाबरेली मी वर्गात शिरले अन सेनिओर्स च्या रगींग ची आयती बळी ठरले अगदी रडायला टेकले होते रे त्या प्रकाराने...अन तू दिसलास.. नव्या चेहर्यात नवा मित्र.. तुझ्यासारखाच... हायसं वाटणं म्हणे काय ते कळलं मला त्या दिवशी..इतक्या बेमालूमपणे मला सोडवलसं त्या तडाख्यातून..मानलं बोस तुला..
"नवा चेहरा, नवा तू.. तरी असा कसा रे अगदी ओळखीचा?" पहिल्याच भेटीत क्याण्टिन मध्ये मी तुला विचारलं.. तू हसलास खळखळुन, अन म्हणालास "अगं सखे, मित्राची ओळख अशी नव्याने थोडीच होते? हा आता चेहरे अनेक भेटतील पुढेही पण मी सोबत असणारच" .. हम्म. तेही खरच म्हणा...तो बराच काही बोलत होता मी मात्र त्या सखीमधेच घुटमळलेली .. नाळ इथेही जोडली होतीच म्हणायची..
हो ..हा हा म्हणता तेही वळण आलाच आपल्या नात्याला... प्रेम.. कोलेज मध्ये अवतीभवती इतक्या जोड्या बघत होती न कि वाटायचं माझ्यापण प्रेमात पडावं की कोणी.. तुला सांगितलं नाही कधी पण मला नं तो आवडायचा.... त्यानेपण माझ्या प्रेमात पडावं म्हणुन काय काय केलं रे मी.. आता हसायला येतं पण तेव्हा तुझा राग यायचा तुला काहीच कसं कळत नाही म्हणुन.. कित्येक दिवस आपण बोललोच नव्हतो रे तेव्हा... मग माझी चिडचिड, त्रागा, अन हा राग काढायचा तरी कोणावर? तू तर नव्हतासच.. अन
अन तेव्हाच माझी ती अगदी खास मैत्रीण ( हो खासच.. हसू नकोस असा) मला म्हणाली अग तू त्याच्याच प्रेमात पडली आहेस.. म्हणजे तुझ्या हं.. काहितरीच काय ? अस्सं डोकं सट्कलं होतं नं.. उगाच आपलं तिला लेक्चर दिलं दोस्ती दोस्ती होती है असं काही नाही आमच्यात.. ब्ला ब्ला ब्ला.. पण खरं सांगायचं तर दोन मिनिट्स मीपण चरकलेच.. खरचं प्रेमात बिमात तर नाही नं पडले तुझ्या.. अन नेमका त्यादिवशी संध्याकाळी तू घरी आलास देवदास बनून..तुझा पडलेला चेहरा अन मी हसतेय वेड्यासारखी .. तुला सांगितलं होतं तरी तू आपला तिच्या मागे.... हसू नाहीतर काय करू.. दुपारचं भूत एव्हाना उतरलं होतंच .. त्यामुळे माझं हसू दाबत कसबसं तुला हसतं केलं.. गंमतच होती रे ती एकुण.. तुझ्या पहिल्या प्रेमभंगाची ( अजूनही हसू येतंय मला)... प्रेमबीम करण्या इतपत मोठे झालो होतो म्हणजे आपण.. मजाच आहे रे..
बघता बघता कोलेज संपलं, नोकर्या लागल्या.. भेटणं कमीच होत गेलं हळुहळु .... हो पण गरजेच्या वेळी हक्काची हाक मात्र तुलाच मारली नेहमी.. घरी लग्नाचे विषय व्हायला लागले.... त्यातूनच हा माझा नवरा निवडला.. कसली धाक धुक होती मनात.. तुझं मत घ्यावं तर तू तिकडे परदेशात.. (तेही गरजेचं होतं म्हणा).. पण तरी मला तू तेव्हा हवा होतास रे.. लग्नात आलास म्हणा अन ह्यांच्या सोबतच्या पहिल्याच भेटीत मला कानात सांगितलास.. सखे सुखी राहा बाळा.. नातं किती चटकन बदललंस रे.. अख्ख्या लग्नात राबराब राब्लास ... अन त्यानंतर मात्र माझ्या संसारतुन अलगद बाजूला झालास( असं तुलाच वाटायचं हं.. कारण आमच्या पहिल्याच भेटीत मी ह्यांना अट घातली होती तुझ्या मैत्रीची.. ) दिवस सरले .. तुही घरवाला झाला .. तुझी तीही तशी छान आहे रे.. स्वीकारलं मला सहज तुझी मैत्रीण म्हणून... गुरफटलो एकंदरीतच ह्या सगळ्या व्यापात..
आता उत्तरार्धात मात्र तुझी वरचेव?र आठवण येते रे ... तुला फोन करून न बोलताच ठेवून देते ते ह्यामुळेच...तुला कळतयं नं रे... तशी सुखी आहे रे मी ... नवरा अगदी लाखांत एक .. सगळे लाड पुरवतो , मुलं हुशार आणि गुणी ( मोठा यु.एस. ला असतो म्हट्लं)... माझा जोब, माझं घर, माझे लोकं .. ह्या सगळ्या माझेपणात छान रमलेय.. पण.. हम्म "हा पण मोठा वाईट गं वेडाबाई, नसतं ह्यात गुंतायचं" हेच म्हणालास नं आत्ता मनातल्या मनात ?..नाही रे सुटत हा पण.. सगळं असुनही नेमकं हरवल्याची जाणीव होतेय.. असं सुख चारही बाजूंनी ओसंडुन आलं नं की श्वास गुदमरतोय माझा ..तुझं होतं का रे असं कधी ? सुखाची अलर्जी झालेय का रे मला? भिती वाटतेय मला.. तुलातरी कळतेय नं रे ही भिती? ..कारण काळ सरकला ,चेहरे बदलले, तसा प्रत्येक वळणावर तू नव्या रुपात भेटतच आलास मला ..त्याच नात्याने.. मित्राच्या नात्याने .. कधी आधाराला, तरी कधी सावरण्याला तुझी सोबत होतीच... हक्काची सोबत...हो नं?
बघ असं होतं हल्ली माझं ..आपलीच रडकी कहाणी सांगत बसली.. तू कसा आहेस?, घरी कसे आहेत विचारलं पण नाही.. रागावणार नसशील तर अजून एक विचारू? जितका सहज तू मित्र झालास तशी मी तुझी मैत्रीण झाली का रे? इतका सगळा फाफट्पसारा लिहिला.. हा सल लिहायला मात्र तळ गाठावा लागला..

तशी उत्तराची घाई नाही.. अपेक्षा तर नाहीच नाही.. पण तरी.. वाट बघतेय..तुझ्या हाकेची

तुझी सखी..

Sunday, January 6, 2013

रोजच्या सरळ्सोट रस्त्यावर चालता चालता अचानक ठेच लागावी तसं कहीसं गाण्याच्या बाबतीतही होत असावं.. नाहीतर असंख्य वेळा ऐकलेल्या गाण्याच्या एखाद्याच ओळीशी मन असं अचानक का थबकावं??एखादा सुर, एखादीच ओळ, कींवा एखादा शब्दसुद्धा एक निराळाच अर्थ देवुन जातो... आजवर न उलगड्लेला.....
"कधीतरी आम्हा सगळ्याना घेउन चल नं रे घरी.. की आई ओरडेल मैत्रीणीना घरी नेलं तर??हा हा हा.. अरे बोल नं.." " नाही म्यड़म कोणी नाही ओरड्णार, आईच नाही मला, पण तुम्ही या घरी "... श्या कधीतरी बोलता बोलता नकळत समोरच्या व्यक्तीच्या जखमेवरची ही अशी खपली निघते.... काळजात उठलेली कळ त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतानाही हसत हसत तो विषयाला अशी काही कलाटणी देतो की आपण आवाक..... असे बोचणारे सल कसे सांभाळायचे???
उगाचच मनावर मळभ दाटून आलेलं असताना..... अस्पष्टशी हुरहूर नकळत ठळक होत जाताना.... खोलवर आत खळबळ माजली असताना... शफल मोड वरच्या गाण्यामधून नेमक गाणं वाजाव... अन डोळ्याni अचानक ओलसर होऊन जाव.. उगाचच???
'पर्वतांना' कोसळ्ताना पाहिलं आहेस कधी? नाही नं? पण तोल जातो रे कधीतरी त्यांचाही.. अन सामावतात ते 'दरीत'.... जितका 'पर्वत' उंच तितकीच ही 'दरी' खोल...तु कितीही नाकारलसं तरी तिचं अस्तित्व तुझ्याच भोवती विणलेलं... गहीरं..अन समंजस.....अशी सांभाळणारी.. सावरणारी ती असताना पर्वता तुला रे कसली काळजी..... तु निर्धास्त कोसळ.. ती आहेच पोटात घ्यायला सारं...... बरच काही दडवलेलं..लपवलेलं असत रे तिने.. अन म्हणूनच लोकं पर्वताला नाही तर दरीला घाबरतात..बहुदा..
अस्वस्थतेचा एक तुकडा नकळत मनात शिरावा ... उगवतीची सोबत होऊन पार मावळतीसाठी रेंगाळावा ... कोर्या कोर्या भाळी मग उलट्या सुलट्या शंकांचं जाळ ..अन पदरात क्षितिजाच दान देऊन जावा ....
अचानक अस शेवटाला पोहोचल कि नेमकी आठवते ती सुरुवात...मधली सारी वळण, उतार चढाव.... सगळ सगळ विसरायला होत मग ..अन नकळतच लागत जातो हिशोब निसटलेल्या क्षणांचा.... चुकलेल्या पावलांचा..अन न जपलेल्या आठवणींचाही..
एखादा दिवसच मुळात असाच उगवतो .. खूप खूप राग आलेला असतो ... अगदी नाकाचा शेंडा लाल अन डोळ्यात चीड असा राग ...पार दुपारपर्यंत धुमसत असत मन .. अन उतरत्या सांजेला अचानक जाणवत नेमक का रागावलो आहोत आपण ? कोणावर चीडलोय ? क्षणार्धात कळून चुकतो तेंव्हा आपल्याच रागाव्ण्यातला फोलपणा... अन मग उतरत जाते रात्र पाणावलेल्या डोळ्यात... मुस्मुसणाऱ्या नाकात...